शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हरदडा परिसरातील आरोग्यसेवा कोलमडली

By admin | Updated: May 17, 2015 00:12 IST

नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने उमरखेड तालुक्यात आरोग्याच्या विविध सेवा....

गरिबांना आर्थिक भुर्दंड : ‘डॉक्टर आपल्या दारी’ योजना कागदावरप्रथमेश कवडे हरदडा नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने उमरखेड तालुक्यात आरोग्याच्या विविध सेवा सुरू केल्या. प्रत्येक गावापासून जवळच आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि काही ठिकाणी आरोग्य पथक निर्माण केले आहे. मात्र या ठिकाणी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवकाढूपणामुळे नागरिकांना या सेवेचा समाधानकारक लाभ होत नाही. जिल्ह्याचा आरोग्य विभागही या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या आजारावर उपचार घेण्यासाठी गरीब नागरिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जातात तेव्हा त्यांना अतिशय वाईट अनुभव येतो. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहात नाही. कनिष्ठ कर्मचारी उपचार करण्यासाठी पुढे येतात. काही ठिकाणी तर कनिष्ठ कर्मचारीसुद्धा राहात नाही. मोठ्या आशेने रुग्णालयात गेल्यानंतर उपचार न घेताच परतावे लागते. ग्रामीण भागात गंभीर रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहने उपलब्ध होत नाही. वाहन शोधण्यापर्यंत प्रकृती अधिक गंभीर होते. हा सर्व आटापिटा केल्यानंतर रुग्णालयापर्यंत पोहोचते. मात्र तेथे उपचारासाठी कुणीही उपलब्ध राहात नाही. प्रसंगी रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो. शासनाने ‘डॉक्टर आपल्या दारी’ ही योजना सुरू केली आहे. मात्र परिसरात या योजनेची पुरती वाट लागली आहे. रुग्णांना तत्काळ आणि दर्जेदार सेवा मिळावी, हा या योजनेमागील उद्देश आहे. याला हरताळ फासला गेला आहे. आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने निर्माण करण्यात आली आहे. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु अधिकारी, कर्मचारी या वास्तूचा उपयोग घेत नाही. सोयीच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यामुळे या वास्तू आता शोभेच्या वस्तू म्हणून जपल्या जात आहे. ग्रामीण भागातील ही दैना जिल्हा आरोग्य विभागाकडूनही दुर्लक्षित आहे. या केंद्रांना अपवादानेही भेटी दिल्या जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी मनमानी वागतात. शिवाय रुग्णांशी त्यांची वागणूक अतिशय उद्धट असते. या बाबीकडे जिल्हा परिषदने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाटशासकीय रुग्णालयांमध्ये योग्य सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्याचा फायदा परिसरातील बोगस डॉक्टर घेत आहेत. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा आहे. या नंतरही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नाही. ते देत असलेल्या औषधांविषयीही प्रश्नचिन्ह आहे.