शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हरदडा परिसरातील आरोग्यसेवा कोलमडली

By admin | Updated: May 17, 2015 00:12 IST

नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने उमरखेड तालुक्यात आरोग्याच्या विविध सेवा....

गरिबांना आर्थिक भुर्दंड : ‘डॉक्टर आपल्या दारी’ योजना कागदावरप्रथमेश कवडे हरदडा नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने उमरखेड तालुक्यात आरोग्याच्या विविध सेवा सुरू केल्या. प्रत्येक गावापासून जवळच आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि काही ठिकाणी आरोग्य पथक निर्माण केले आहे. मात्र या ठिकाणी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवकाढूपणामुळे नागरिकांना या सेवेचा समाधानकारक लाभ होत नाही. जिल्ह्याचा आरोग्य विभागही या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या आजारावर उपचार घेण्यासाठी गरीब नागरिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जातात तेव्हा त्यांना अतिशय वाईट अनुभव येतो. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहात नाही. कनिष्ठ कर्मचारी उपचार करण्यासाठी पुढे येतात. काही ठिकाणी तर कनिष्ठ कर्मचारीसुद्धा राहात नाही. मोठ्या आशेने रुग्णालयात गेल्यानंतर उपचार न घेताच परतावे लागते. ग्रामीण भागात गंभीर रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहने उपलब्ध होत नाही. वाहन शोधण्यापर्यंत प्रकृती अधिक गंभीर होते. हा सर्व आटापिटा केल्यानंतर रुग्णालयापर्यंत पोहोचते. मात्र तेथे उपचारासाठी कुणीही उपलब्ध राहात नाही. प्रसंगी रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो. शासनाने ‘डॉक्टर आपल्या दारी’ ही योजना सुरू केली आहे. मात्र परिसरात या योजनेची पुरती वाट लागली आहे. रुग्णांना तत्काळ आणि दर्जेदार सेवा मिळावी, हा या योजनेमागील उद्देश आहे. याला हरताळ फासला गेला आहे. आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने निर्माण करण्यात आली आहे. यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु अधिकारी, कर्मचारी या वास्तूचा उपयोग घेत नाही. सोयीच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यामुळे या वास्तू आता शोभेच्या वस्तू म्हणून जपल्या जात आहे. ग्रामीण भागातील ही दैना जिल्हा आरोग्य विभागाकडूनही दुर्लक्षित आहे. या केंद्रांना अपवादानेही भेटी दिल्या जात नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी मनमानी वागतात. शिवाय रुग्णांशी त्यांची वागणूक अतिशय उद्धट असते. या बाबीकडे जिल्हा परिषदने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाटशासकीय रुग्णालयांमध्ये योग्य सोयी-सुविधा उपलब्ध होत नसल्याचा फायदा परिसरातील बोगस डॉक्टर घेत आहेत. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा आहे. या नंतरही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नाही. ते देत असलेल्या औषधांविषयीही प्रश्नचिन्ह आहे.