शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: July 23, 2014 23:50 IST

ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्या, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली़ मात्र तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अप-डाऊननुसार सुरू आहे़

डॉक्टरांचे अप-डाऊन : बोगस डॉक्टरांना मिळते चालना, ग्रामस्थ झाले त्रस्तमारेगाव : ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्या, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली़ मात्र तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अप-डाऊननुसार सुरू आहे़ त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत असून या संधीचा लाभ बोगस डॉक्टर घेत आहे़ग्रामीण जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण जनतेला सेवा दिली जाते. ग्रामीण जनतेसाठी मारेगाव तालुक्यात वेगाव, मार्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले. नवरगाव येथे आयुर्वेदिक दवाखाना, तर रोहपट येथे फिरते रूग्णालय स्थापन करण्यात आले. म्हैसदोडका येथे भरारी पथकही आहे. याशिवाय १५ गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रे आहे़ परंतु या सर्व आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा कारभार मनमानी सुरू आहे़ या केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टर मंडळी बाहेरगावावरून अप-डाऊन करतात. त्यामुळे रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही़ ग्रामस्थांना शेवटी तालुका ठिकाणाची वाट धरावी लागते. तोपर्यंत एखादी गंभीर रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते. गावात डॉक्टर राहात नसल्याने या संधीचा लाभ वैद्यकीय क्षेत्राचे थोडेफार ज्ञान असलेल्या लोकांनी घेतला आहे. किंबहुना आरोग्य केंद्रातील डाक्टरांनीच त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली, असे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. यामुळे जनतेच्या आरोग्याची सर्वत्र हेळसांड सुरू आहे़ या संदर्भात बरेचदा ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या़ परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही़ आरोग्य कर्मचाऱ्यांचे दूरपर्यंत मजबूत नेटवर्क असल्यामुळे ग्रामस्थांना आता तक्रार करावी तरी कुणाकडे, असा प्रश्न पडला आहे़ वैद्यकीय अधिकारी अप-डाऊन करीत असल्याने गावपातळीवरील परिचारीकाही गावात राहात नाही़ कधीतरी एखादेवेळी त्या गावाला भेट देतात़ नागरिकांना न भेटता अंगणवाडी सेविकेची भेट घेऊन, माहिती संकलन करून त्या निघूनही जातात़ गरोदर माता, लहान बाळ यांच्या आरोग्याबद्दल कसल्याही सूचना ग्रामीण महिलांना मिळत नाही़ त्यामुळे संगोपनाकडे दुर्लक्ष होते़ आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे़ अनेक आजार जोर पकडत आहे़ परंतु ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याबद्दल कोणत्याही सूचना मिळत नाही़ दूषित पाण्याच्या स्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही़ अशावेळी एखादा रूग्ण दगावला, तर या डॉक्टरवर कारवाई होण्याची गरज आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे तालुक्यात उडालेले धिंडवडे बघता रूग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी डॉक्टरांनी मुख्यालयी राहण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा ग्रामीण भागातील जनतेला तालुका ठिकाणी जाण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)