शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नेरमध्ये आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: December 31, 2016 01:08 IST

नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे

वरिष्ठांचे दुर्लक्ष : ग्रामीण यंत्रणा ढेपाळली नेर : नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना ही सेवा देण्यात चालढकल करत आहे. परिणामी नागरिकांना शहरात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावा लागत आहे. यात त्यांच्या वेळेचा अपव्यय होण्यासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडूनही ही बाब दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. प्राथमिक आरोग्य केंद्राला लगतची २५ ते ३० गावे जोडण्यात आलेली आहे. शिवाय उपकेंद्रांना पाच ते दहा गावे जोडली गेली आहे. याठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थानेही बांधण्यात आलेली आहे. आवश्यक त्या सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परंतु या निवासस्थानांचा वापर काही अधिकारी आणि कर्मचारीच करत आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र ठरलेल्यावेळी उघडले जात नाही. उघडले तरी अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोयीने येतात. रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत असतात. कित्येक तासपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर डॉक्टर दाखल होतात. तेही काही रुग्णांची तपासणी करून निघून जातात. गंभीर रुग्णांना तर या आरोग्यसेवेचा उपयोग फार कमी प्रमाणात होतो. एक तर डॉक्टर उपलब्ध होत नाही आणि झाले तरी तालुक्याच्या ठिकाणी हलविण्याचा सल्ला दिला जातो. साध्या साध्या आजारावरही उपचार करण्याचे टाळले जात असल्याचे प्रकार घडत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना तुसडेपणाची वागणूक दिल्या जात असल्याच्या तक्रारी होतात. संबंधित आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. आवश्यक तेवढे कर्मचारी या विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळेही तत्काळ आणि दर्जेदार आरोग्यसेवा नागरिकांना पुरविण्यात काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)