शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा सदस्यांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:44 IST

दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : विरोधक उरलेच नाही, डॉक्टरांची पदे रिक्त, शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळच गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे.लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच सर्वसाधारण सभा होत आहे. दरम्यानच्या काळात सर्वांनी मिळून बांधकाम सभापती निमीष मानकर यांच्यावर अविश्वास ठराव पारित केला. तसेच शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्यावरही ४७ सदस्यांनी अविश्वास दर्शविला. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अविश्वासासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषदेत विरोधकच उरले नाही. सध्याच्या घडीला केवळ निमीष मानकर आणि नंदिनी दरणे हे दोनच सदस्य विरोधात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. गरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शिक्षण विभागाच्या गोंधळावरून स्थायी समिती सभेत खडाजंगी झाली होती. याशिवाय टँकर बंद केल्याने पाणी प्रश्नही गंभीर बनला आहे. या तीन महत्वाच्या समस्यांवर सदस्य नेमकी कोणती भूमिका घेतात याबाबत औत्सुक्य आहे. विरोधकच उरले नसल्याने आता सत्ताधाऱ्यांनाच प्रशासनाला जाब विचारावा लागणार आहे. तथापि नवीन पदांवर डोळा ठेऊन सदस्यांंची आक्रमकता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नवीन सभापतींची २१ जूनला निवडबांधकाम व अर्थ आणि शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी २१ जूनला निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही दोन्ही पदे सध्या रिक्त आहे. २१ जूनला ११ वाजता या पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. लगेच तासाभरानंतर नवीन सभापतींसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.अधिकाऱ्यांपुढे सर्वच हतबलजिल्हा परिषदेचे अधिकारी खुद्द पदाधिकाºयांचेही ऐकत नाही, अशी हतबलता पदाधिकाºयांनीच व्यक्त केली. यामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या समस्या सुटणार कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पदाधिकारी व सदस्यांनी या तीनही महत्वाच्या समस्या सोडवाव्यात अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.