शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा सदस्यांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:44 IST

दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : विरोधक उरलेच नाही, डॉक्टरांची पदे रिक्त, शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळच गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे.लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच सर्वसाधारण सभा होत आहे. दरम्यानच्या काळात सर्वांनी मिळून बांधकाम सभापती निमीष मानकर यांच्यावर अविश्वास ठराव पारित केला. तसेच शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्यावरही ४७ सदस्यांनी अविश्वास दर्शविला. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अविश्वासासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषदेत विरोधकच उरले नाही. सध्याच्या घडीला केवळ निमीष मानकर आणि नंदिनी दरणे हे दोनच सदस्य विरोधात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. गरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शिक्षण विभागाच्या गोंधळावरून स्थायी समिती सभेत खडाजंगी झाली होती. याशिवाय टँकर बंद केल्याने पाणी प्रश्नही गंभीर बनला आहे. या तीन महत्वाच्या समस्यांवर सदस्य नेमकी कोणती भूमिका घेतात याबाबत औत्सुक्य आहे. विरोधकच उरले नसल्याने आता सत्ताधाऱ्यांनाच प्रशासनाला जाब विचारावा लागणार आहे. तथापि नवीन पदांवर डोळा ठेऊन सदस्यांंची आक्रमकता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नवीन सभापतींची २१ जूनला निवडबांधकाम व अर्थ आणि शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी २१ जूनला निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही दोन्ही पदे सध्या रिक्त आहे. २१ जूनला ११ वाजता या पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. लगेच तासाभरानंतर नवीन सभापतींसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.अधिकाऱ्यांपुढे सर्वच हतबलजिल्हा परिषदेचे अधिकारी खुद्द पदाधिकाºयांचेही ऐकत नाही, अशी हतबलता पदाधिकाºयांनीच व्यक्त केली. यामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या समस्या सुटणार कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पदाधिकारी व सदस्यांनी या तीनही महत्वाच्या समस्या सोडवाव्यात अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.