शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा सदस्यांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:44 IST

दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : विरोधक उरलेच नाही, डॉक्टरांची पदे रिक्त, शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळच गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे.लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच सर्वसाधारण सभा होत आहे. दरम्यानच्या काळात सर्वांनी मिळून बांधकाम सभापती निमीष मानकर यांच्यावर अविश्वास ठराव पारित केला. तसेच शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्यावरही ४७ सदस्यांनी अविश्वास दर्शविला. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अविश्वासासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषदेत विरोधकच उरले नाही. सध्याच्या घडीला केवळ निमीष मानकर आणि नंदिनी दरणे हे दोनच सदस्य विरोधात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. गरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शिक्षण विभागाच्या गोंधळावरून स्थायी समिती सभेत खडाजंगी झाली होती. याशिवाय टँकर बंद केल्याने पाणी प्रश्नही गंभीर बनला आहे. या तीन महत्वाच्या समस्यांवर सदस्य नेमकी कोणती भूमिका घेतात याबाबत औत्सुक्य आहे. विरोधकच उरले नसल्याने आता सत्ताधाऱ्यांनाच प्रशासनाला जाब विचारावा लागणार आहे. तथापि नवीन पदांवर डोळा ठेऊन सदस्यांंची आक्रमकता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नवीन सभापतींची २१ जूनला निवडबांधकाम व अर्थ आणि शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी २१ जूनला निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही दोन्ही पदे सध्या रिक्त आहे. २१ जूनला ११ वाजता या पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. लगेच तासाभरानंतर नवीन सभापतींसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.अधिकाऱ्यांपुढे सर्वच हतबलजिल्हा परिषदेचे अधिकारी खुद्द पदाधिकाºयांचेही ऐकत नाही, अशी हतबलता पदाधिकाºयांनीच व्यक्त केली. यामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या समस्या सुटणार कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पदाधिकारी व सदस्यांनी या तीनही महत्वाच्या समस्या सोडवाव्यात अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.