शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाची तिवसा येथे धाव

By admin | Updated: May 15, 2014 01:37 IST

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असून घराघरात रुग्ण दिसत आहे

पांडुरंग भोयर ल्ल सोनखास

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असून घराघरात रुग्ण दिसत आहे. अनेक रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक आणि गटविकास अधिकारी तिवसा येथे बुधवारी सकाळीच पोहोचले. अस्वच्छतेमुळे तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असला तरी अद्यापही ग्रामपंचायत स्वच्छतेबाबत उदासीनच दिसत असून आज गावात स्वच्छतेची कोणतीही मोहीम हाती घेण्यात आली नाही. तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला. जवळपास ५० कुटुंबामध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात डायरियाची लागण होऊनही आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते. रुग्ण आपल्या परीने शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळीच आरोग्य विभागाची चमू तिवसा येथे दाखल झाली. डॉ.सुषमा खोडवे, डॉ. सरला सोनकर, डॉ.एम.पी. ढबाले, डॉ.ए.एम.जाधव, डॉ. पुष्पा येपुरे, डॉ.पी.बी. वानखेडे यांचे पथक तिवसा येथे दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ यवतमाळचे गटविकास अधिकारी घोंगडे आणि विस्तार अधिकारी सिकले तिवसा येथे पोहोचले.

आरोग्य विभागाच्या चमूने गावातील प्रत्येकाचे रक्तनमुने घेतले असून रुग्णांना सलाईन लावून औषधोपचारही केले आहे. दिवसभर आरोग्य विभागाची चमू तिवसा येथे तळ ठोकून होती. दरम्यान यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात १५ तर खासगी रुग्णालयात तीन रुग्ण उपचार घेत आहे. तिवसा येथे डायरियाची लागण होण्यामागचे मुख्य कारण अस्वच्छता आहे. परंतु ग्रामपंचायत दखल घ्यायला तयार नाही. आरोग्य चमू गावात असतानाही ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम मात्र हाती घेतली नाही. आजही गावात घाणीचे साम्राज्य दिसून आले. (वार्ताहर)