शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

आरोग्य विभागाची तिवसा येथे धाव

By admin | Updated: May 15, 2014 01:37 IST

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असून घराघरात रुग्ण दिसत आहे

पांडुरंग भोयर ल्ल सोनखास

यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असून घराघरात रुग्ण दिसत आहे. अनेक रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक आणि गटविकास अधिकारी तिवसा येथे बुधवारी सकाळीच पोहोचले. अस्वच्छतेमुळे तिवसा येथे डायरियाचा उद्रेक झाला असला तरी अद्यापही ग्रामपंचायत स्वच्छतेबाबत उदासीनच दिसत असून आज गावात स्वच्छतेची कोणतीही मोहीम हाती घेण्यात आली नाही. तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला. जवळपास ५० कुटुंबामध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात डायरियाची लागण होऊनही आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते. रुग्ण आपल्या परीने शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले आणि आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळीच आरोग्य विभागाची चमू तिवसा येथे दाखल झाली. डॉ.सुषमा खोडवे, डॉ. सरला सोनकर, डॉ.एम.पी. ढबाले, डॉ.ए.एम.जाधव, डॉ. पुष्पा येपुरे, डॉ.पी.बी. वानखेडे यांचे पथक तिवसा येथे दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ यवतमाळचे गटविकास अधिकारी घोंगडे आणि विस्तार अधिकारी सिकले तिवसा येथे पोहोचले.

आरोग्य विभागाच्या चमूने गावातील प्रत्येकाचे रक्तनमुने घेतले असून रुग्णांना सलाईन लावून औषधोपचारही केले आहे. दिवसभर आरोग्य विभागाची चमू तिवसा येथे तळ ठोकून होती. दरम्यान यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात १५ तर खासगी रुग्णालयात तीन रुग्ण उपचार घेत आहे. तिवसा येथे डायरियाची लागण होण्यामागचे मुख्य कारण अस्वच्छता आहे. परंतु ग्रामपंचायत दखल घ्यायला तयार नाही. आरोग्य चमू गावात असतानाही ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम मात्र हाती घेतली नाही. आजही गावात घाणीचे साम्राज्य दिसून आले. (वार्ताहर)