शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

आत्महत्या रोखण्यासाठी ‘आरोग्य’ही सज्ज

By admin | Updated: June 3, 2015 00:10 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक गावात आशा ...

पाच तालुक्यांवर लक्ष : मुंबईच्या सहसंचालकांनी घेतला आढावायवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना उपचार व मानसिक आधार दिला जाणार आहे. यासाठीच आरोग्य सहसंचालक डॉ. शशिकांत जाधव आणि मानसिक उपचार उपसंचालक डॉ. रेंगे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ, घाटंजी, कळंब, पांढरकवडा आणि राळेगाव या तालुक्यांमध्ये झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी खचलेल्या शेतकऱ्यांना आधार दिला जाणार आहे. नैराश्यातील शेतकऱ्यांचा गावागावात शोध घेऊन त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार दिला जाणार आहे. गावातील कुणाची आर्थिक स्थिती कशी आहे याची जाणीव गावात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना असते. गावातील आरोग्यदूत म्हणूनच त्या काम करीत आहेत. शासनस्तरावर आखण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या बहुतांश योजना आशांकडूनच राबविल्या जातात. आता आशांच्या माध्यमातून नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेतकरी मित्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार व डॉ. शरद मनोरे समुपदेशन आणि उपचार करणार आहेत. यासाठी आरोग्य सहसंचालक आणि मानसोपचार उपसंचालकांनी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. (कार्यालय प्रतिनिधी)