शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी ‘आरोग्य’ही सज्ज

By admin | Updated: June 3, 2015 00:10 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक गावात आशा ...

पाच तालुक्यांवर लक्ष : मुंबईच्या सहसंचालकांनी घेतला आढावायवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना उपचार व मानसिक आधार दिला जाणार आहे. यासाठीच आरोग्य सहसंचालक डॉ. शशिकांत जाधव आणि मानसिक उपचार उपसंचालक डॉ. रेंगे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ, घाटंजी, कळंब, पांढरकवडा आणि राळेगाव या तालुक्यांमध्ये झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी खचलेल्या शेतकऱ्यांना आधार दिला जाणार आहे. नैराश्यातील शेतकऱ्यांचा गावागावात शोध घेऊन त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार दिला जाणार आहे. गावातील कुणाची आर्थिक स्थिती कशी आहे याची जाणीव गावात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना असते. गावातील आरोग्यदूत म्हणूनच त्या काम करीत आहेत. शासनस्तरावर आखण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या बहुतांश योजना आशांकडूनच राबविल्या जातात. आता आशांच्या माध्यमातून नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेतकरी मित्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार व डॉ. शरद मनोरे समुपदेशन आणि उपचार करणार आहेत. यासाठी आरोग्य सहसंचालक आणि मानसोपचार उपसंचालकांनी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. (कार्यालय प्रतिनिधी)