शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
7
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
8
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
9
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
10
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
11
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
12
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
13
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
14
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
15
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
16
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
17
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
18
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
19
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
20
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...

सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

By admin | Updated: August 30, 2015 02:17 IST

ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे.

नागरिक बेजार : शिक्षकांसह तलाठी, ग्रामसेवकांच्या तालुक्यातून येरझारापोफाळी : ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तरीही बहुतांश कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असून सामान्य नागरिकांना मात्र हेलपाटे मारावे लागत आहे. जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांपासून तलाठी, ग्रामसेवकांपर्यंत सर्वच कर्मचारी तालुक्याच्या गावातून दररोज ये-जा करीत आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील कामकाजावर होत आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ये-जा करीत असल्याने शाळेच्या वेळा पाळल्या जात नाही. बऱ्याच शिक्षकांचे जाणे-येणे परिवहन महामंडळाच्या बसफेरीवर अवलंबून असते. त्यामुळेच शाळा सुटण्याच्या एक तासापूर्वीच शाळेतून निघण्याची घाई सुरू होते. विशेषत: महिला शिक्षिका सायंकाळच्या पूर्वीच घरी पोहोचण्याच्या घाईत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनियमितता येत आहे. तलाठी, ग्रामसेवक यांची तर एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे. तलाठी आणि ग्रामसेवक हे ग्रामीण जनता आणि प्रशासनातील दुवा असतात. मात्र शिक्षकांप्रमाणेच हे कर्मचारीही तालुक्यातून ये-जा करतात. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेस सर्वसामान्य जनतेला हे कर्मचारी उपलब्ध होत नाही. कर्मचाऱ्यांना वाटेल तेव्हा गावात अवतरतात. परंतु लोकांची कामे रेंगाळलेली असतानाही कित्येक दिवस गावात त्यांचे दर्शन घडत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनाच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तलाठी आणि ग्रामसेवकाचे घर शोधत फिरावे लागते. हीच अवस्था कृषी सहायकांची आहे. शेतकरी आणि कृषी विभागात दुवा साधण्याचे काम कृषी सहायक करतो. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शेतीच्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाकडे अहवाल देणे, हे त्याचे काम आहे. मात्र हे कृषी सहायक सध्या गावात किंवा शेतात क्वचितच दिसतात. तालुक्याच्या मुख्यालयी राहून केवळ कागदोपत्री कारभार करीत आहेत. ज्या उद्देशासाठी कृषी सहायकांची नियुक्ती होते, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. (वार्ताहर)