शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

By admin | Updated: August 30, 2015 02:17 IST

ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे.

नागरिक बेजार : शिक्षकांसह तलाठी, ग्रामसेवकांच्या तालुक्यातून येरझारापोफाळी : ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तरीही बहुतांश कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असून सामान्य नागरिकांना मात्र हेलपाटे मारावे लागत आहे. जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांपासून तलाठी, ग्रामसेवकांपर्यंत सर्वच कर्मचारी तालुक्याच्या गावातून दररोज ये-जा करीत आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील कामकाजावर होत आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ये-जा करीत असल्याने शाळेच्या वेळा पाळल्या जात नाही. बऱ्याच शिक्षकांचे जाणे-येणे परिवहन महामंडळाच्या बसफेरीवर अवलंबून असते. त्यामुळेच शाळा सुटण्याच्या एक तासापूर्वीच शाळेतून निघण्याची घाई सुरू होते. विशेषत: महिला शिक्षिका सायंकाळच्या पूर्वीच घरी पोहोचण्याच्या घाईत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनियमितता येत आहे. तलाठी, ग्रामसेवक यांची तर एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे. तलाठी आणि ग्रामसेवक हे ग्रामीण जनता आणि प्रशासनातील दुवा असतात. मात्र शिक्षकांप्रमाणेच हे कर्मचारीही तालुक्यातून ये-जा करतात. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेस सर्वसामान्य जनतेला हे कर्मचारी उपलब्ध होत नाही. कर्मचाऱ्यांना वाटेल तेव्हा गावात अवतरतात. परंतु लोकांची कामे रेंगाळलेली असतानाही कित्येक दिवस गावात त्यांचे दर्शन घडत नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनाच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तलाठी आणि ग्रामसेवकाचे घर शोधत फिरावे लागते. हीच अवस्था कृषी सहायकांची आहे. शेतकरी आणि कृषी विभागात दुवा साधण्याचे काम कृषी सहायक करतो. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शेतीच्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन शासनाकडे अहवाल देणे, हे त्याचे काम आहे. मात्र हे कृषी सहायक सध्या गावात किंवा शेतात क्वचितच दिसतात. तालुक्याच्या मुख्यालयी राहून केवळ कागदोपत्री कारभार करीत आहेत. ज्या उद्देशासाठी कृषी सहायकांची नियुक्ती होते, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. (वार्ताहर)