शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नगराध्यक्ष उतरले यवतमाळच्या रस्त्यांवर

By admin | Updated: August 25, 2016 01:41 IST

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना यवतमाळचे नगराध्यक्ष विकास कामे करुन घेण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तयारी निवडणुकीची : सार्वजनिक कामांना आली गती, रखडलेली कामे लागली मार्गी यवतमाळ : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना यवतमाळचे नगराध्यक्ष विकास कामे करुन घेण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मतदारांच्या नजरेत ही निवडणुकीची तयारी असली तरी रखडलेल्या सार्वजनिक कामांना मात्र वेग आला आहे. आठ ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्याने यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाली आहे. त्यातच आगामी नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने अनेकांनी नगरपरिषदेची धुरा सांभाळण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. वास्तविक नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप निघालेले नाही. ते निघाल्यानंतरच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक आखाड्यात कुण्या संवर्गातील नागरिकांनी उतरावे, हे स्पष्ट होणार आहे. मात्र नगराध्यक्ष आणि आरक्षण सोईचे न आल्यास नगरसेवक पद मिळविण्यासाठी कित्येकांनी तयारी चालविली आहे. यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाचे नवे आरक्षण कुणाच्या सोईचे निघणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याची चर्चा सुरू असतानाच विद्यमान नगराध्यक्ष सुभाष राय अचानक रस्त्यावर दिसू लागले आहेत. यवतमाळ शहर व वाढीव कार्यक्षेत्रातील अनेक विकास कामे रखडली होती. ही रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचा ध्यास सुभाष राय यांनी घेतल्याचे दिसते. अशा कामांच्या ठिकाणी नगराध्यक्ष स्वत: तासन्तास उभे राहत असल्याचे, काम पूर्ण होईस्तोवर ठिय्या मांडून बसत असल्याचे सकारात्मक चित्र यवतमाळकरांना पहायला मिळत आहे. खुद्द नगराध्यक्ष स्पॉटवर हजर असल्याने शासकीय यंत्रणाही पूर्णवेळ हजर राहत असल्याचे आणि कामाचा वेगही प्रचंड वाढत असल्याचा अनुभव यवतमाळकरांनी घेतला आहे. नगराध्यक्ष आपल्या देखरेखीत विविध विकास कामे पूर्णत्वास नेत असल्याने त्या-त्या भागातील नागरिक प्रचंड समाधान व्यक्त करीत आहे. नगराध्यक्षांच्या रस्त्यावर उतरण्याच्या भूमिकेमागील राजकारण काहीही असो, यवतमाळकरांची रखडलेली कामे मात्र वेगाने पूर्णत्वाकडे जात असल्याचे समाधान त्या-त्या भागातील जनतेच्या चेहऱ्यावर पहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले नसताना आणि ते कोण्या संवर्गातील निघेल हे स्पष्ट नसताना सुभाष राय यांनी रस्त्यावर उतरण्याची घेतलेली भूमिका ही केवळ यवतमाळच्या विकासासाठी असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिक म्हणतात, विलंब झाला... !नगराध्यक्षांनी हीच तत्परता गेल्या दोन वर्षात दाखविली असती तर शहराचा कायापालट झाला असता, असा सूरही नागरिकांमधून ऐकायला मिळतो आहे. तर राजकीय पक्षांकडून नगराध्यक्षांचे अचानक रस्त्यावर उतरणे हा पॉलिटिकल स्टंट आणि आगामी निवडणुकीची तयारी असल्याची टीका केली जात आहे. नगराध्यक्ष खरोखरच तत्पर असतील तर त्यांनी गेली दोन वर्ष एकदाही विकास कामांच्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरण्याची तसदी का घेतली नाही, असा सवाल राजकीय गोटातून उपस्थित केला जात आहे.