शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नगराध्यक्ष उतरले यवतमाळच्या रस्त्यांवर

By admin | Updated: August 25, 2016 01:41 IST

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना यवतमाळचे नगराध्यक्ष विकास कामे करुन घेण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तयारी निवडणुकीची : सार्वजनिक कामांना आली गती, रखडलेली कामे लागली मार्गी यवतमाळ : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना यवतमाळचे नगराध्यक्ष विकास कामे करुन घेण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मतदारांच्या नजरेत ही निवडणुकीची तयारी असली तरी रखडलेल्या सार्वजनिक कामांना मात्र वेग आला आहे. आठ ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्याने यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाली आहे. त्यातच आगामी नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने अनेकांनी नगरपरिषदेची धुरा सांभाळण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. वास्तविक नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप निघालेले नाही. ते निघाल्यानंतरच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुक आखाड्यात कुण्या संवर्गातील नागरिकांनी उतरावे, हे स्पष्ट होणार आहे. मात्र नगराध्यक्ष आणि आरक्षण सोईचे न आल्यास नगरसेवक पद मिळविण्यासाठी कित्येकांनी तयारी चालविली आहे. यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाचे नवे आरक्षण कुणाच्या सोईचे निघणार, कोण कोणत्या पक्षाकडून लढणार याची चर्चा सुरू असतानाच विद्यमान नगराध्यक्ष सुभाष राय अचानक रस्त्यावर दिसू लागले आहेत. यवतमाळ शहर व वाढीव कार्यक्षेत्रातील अनेक विकास कामे रखडली होती. ही रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचा ध्यास सुभाष राय यांनी घेतल्याचे दिसते. अशा कामांच्या ठिकाणी नगराध्यक्ष स्वत: तासन्तास उभे राहत असल्याचे, काम पूर्ण होईस्तोवर ठिय्या मांडून बसत असल्याचे सकारात्मक चित्र यवतमाळकरांना पहायला मिळत आहे. खुद्द नगराध्यक्ष स्पॉटवर हजर असल्याने शासकीय यंत्रणाही पूर्णवेळ हजर राहत असल्याचे आणि कामाचा वेगही प्रचंड वाढत असल्याचा अनुभव यवतमाळकरांनी घेतला आहे. नगराध्यक्ष आपल्या देखरेखीत विविध विकास कामे पूर्णत्वास नेत असल्याने त्या-त्या भागातील नागरिक प्रचंड समाधान व्यक्त करीत आहे. नगराध्यक्षांच्या रस्त्यावर उतरण्याच्या भूमिकेमागील राजकारण काहीही असो, यवतमाळकरांची रखडलेली कामे मात्र वेगाने पूर्णत्वाकडे जात असल्याचे समाधान त्या-त्या भागातील जनतेच्या चेहऱ्यावर पहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले नसताना आणि ते कोण्या संवर्गातील निघेल हे स्पष्ट नसताना सुभाष राय यांनी रस्त्यावर उतरण्याची घेतलेली भूमिका ही केवळ यवतमाळच्या विकासासाठी असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नागरिक म्हणतात, विलंब झाला... !नगराध्यक्षांनी हीच तत्परता गेल्या दोन वर्षात दाखविली असती तर शहराचा कायापालट झाला असता, असा सूरही नागरिकांमधून ऐकायला मिळतो आहे. तर राजकीय पक्षांकडून नगराध्यक्षांचे अचानक रस्त्यावर उतरणे हा पॉलिटिकल स्टंट आणि आगामी निवडणुकीची तयारी असल्याची टीका केली जात आहे. नगराध्यक्ष खरोखरच तत्पर असतील तर त्यांनी गेली दोन वर्ष एकदाही विकास कामांच्या पाहणीसाठी रस्त्यावर उतरण्याची तसदी का घेतली नाही, असा सवाल राजकीय गोटातून उपस्थित केला जात आहे.