शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

आनंदवनातील आनंदी भावना

By admin | Updated: June 11, 2014 23:39 IST

ज्यांना हात-पाय नाहीत, हाताला बोटे नाहीत, पहायला नेत्र नाहीत, संवादासाठी वाचा नाही, अशा शेकडो पीडितांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांच्या जीवनातील आनंद १०० शिक्षकांनी केवळ बुकातच नाही,

शासन दरबारी प्रकल्प दुर्लक्षित : शिक्षकांचा आमटेशी संवादवणी : ज्यांना हात-पाय नाहीत, हाताला बोटे नाहीत, पहायला नेत्र नाहीत, संवादासाठी वाचा नाही, अशा शेकडो पीडितांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांच्या जीवनातील आनंद १०० शिक्षकांनी केवळ बुकातच नाही, तर आपल्या डोळ्यांनी टिपला़ त्यांच्याशी दोन तास साधलेला संवाद तर शिक्षकांची मने हेलावून गेला़वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात सुरू आहे़ प्रशिक्षणात सहभागी ९४ शिक्षक व सहा तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी रविवारी वरोरा येथील आनंदवन प्रकल्पाला क्षेत्रभेट दिली़ अपंग, कुष्ठरोगी यांची जीवन जगण्यासाठी व ते सुखकर करण्यासाठी सुरू असलेली धडपड सुदृढांनाही लाजवणारी होती़ प्रत्येक जण आपल्याला जमेल त्या कामात गुंग होता़ टाकाऊ पदार्थापासून ग्रीटींग कार्ड, वॉलपीस बनविणे, लेदर वर्क्स, तीन चाकी सायकली बनविणे, कापड बनविणे, छपाई, शोभेच्या वस्तू बनविणे, असे अनेक उद्योग या प्रकल्पात असून जीवनाला आवश्यक असणारे धान्य, दूध, भाजीपाला सर्व याच ठिकाणी हेच अपंग निर्माण करतात़ २१ जून १९५१ रोजी केवळ एका कुष्ठरोग्याला घेऊन डॉ़बाबा आमटे यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. तेथे ८२५ जोडपी, अंध, मूक, बधीर आहेत. त्यांची शेकडो बालके आनंदाने नाचत-बागडत आहे़ शिक्षकांनी त्यांच्या भावना टिपल्या़ नामवंत संगीतकार व गायकांना लाजवणारा ‘स्वरानंदवन’ हा आर्केस्ट्रा आंधळ्या, मुक्या, बहीऱ्या, लंगड्यांनी सादर केला, तेव्हा सर्व शिक्षक भारावून गेले़ येथे ‘एकत्र जेवण, एकत्र जीवन’ या मंत्राला अनुसरून सर्व गोडी-गुलाबीने राहतात़ जीवनात कायमचे आलेले दु:खही सर्व जण विसरून गेल्याचे पाहायला मिळते़ मात्र जेव्हा शिक्षकांनी डॉ़विकास आमटे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा शासनाप्रती विचारमंथन करण्याची वेळ आली़ शरीराला होणाऱ्या महारोगापेक्षा मनाला होणारा महारोग भयावह असल्याचे डॉ़आमटे यांनी स्पष्ट केले़ देशातील भ्रष्टाचार हा महारोग नाही काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ कुष्ठरोगाविषयीचे अनेक गैरसमज त्यांनी स्पष्ट केले़ दुर्र्दैवाने भारतात सर्वात जास्त कुष्ठरोगी असल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले़ पीडितांच्या जखमांवर फुंकर घालण्याच्या या प्रकल्पाला शासनाची कवडीची मदत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)