शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
2
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
3
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
4
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
5
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
6
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
7
New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
8
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
9
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
10
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
11
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
12
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
13
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
14
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
15
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
16
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
17
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने
18
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
19
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
20
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अधिकाºयांकडून सभागृह, सदस्यांची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:34 IST

गेल्या १ सप्टेंबरच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेनंतर अधिकाºयांनी सभागृह व सदस्यांची बदनामी केल्याचा आरोप खुद्द अध्यक्षांनीच केला आहे.

ठळक मुद्देअध्यक्षांचा आरोप : आयुक्तांकडे कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या १ सप्टेंबरच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेनंतर अधिकाºयांनी सभागृह व सदस्यांची बदनामी केल्याचा आरोप खुद्द अध्यक्षांनीच केला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी विरूद्ध अधिकारी, असा सामना रंगला होता. सभेत सदस्यांनी लोकशाही पद्धतीने विकास कामांबाबत चर्चा केली. कुठल्याही अधिकाºयांबाबत पूर्वग्रहदूषित भावनेने चर्चा केली नाही. असंवैधानिक शब्दांचा वापर अथवा अपशब्द उच्चारला नाही, असा दावा अध्यक्षांनी केला. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्षांच्या निर्देशानुसार खाते प्रमुखांनी उभे राहून उत्तर देणे अभिप्रेत आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यास कोणताही सदस्य अधिकाºयांना धारेवर धरत नाही, असा आपला अनुभव असल्याचे अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी म्हटले आहे.सर्वसाधारण सभा सुरळीत पार पडल्यानंतर सदस्यांनी प्रश्न विचारले म्हणून सर्व अधिकाºयांनी संघटित होऊन आपल्याला निवेदन दिल्याचेही अध्यक्षांनी स्पष्ट केले. हे निवेदन म्हणजे एकप्रकारे सभागृहालाच आव्हान असल्याचा आरोप त्यांनी केला. एखादा ठराव नियमबाह्य असेल, तर अधिकाºयांनी त्यावर आपले मत देणे अपेक्षित असते. मात्र तसे कोणतेही मत अधिकाºयांनी नोंदविले नाही, असा आरोपही त्यांनी केला. सभागृहात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याऐवजी अधिकाºयांनी सभागृहालाच आव्हान दिल्याचा आरोप अध्यक्षांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.वरिष्ठांची परवानगी नाहीअधिकाºयांनी वरिष्ठांची परवानगी न घेताच सभागृह आणि सदस्यांबाबत तक्रार सादर केल्याने जिल्हा परिषदेची बदनामी झाल्याचा आरोप अध्यक्षांनी केला. अधिकाºयांचे हे वर्तन नियमबाह्य आहे. त्यामुळे संबंधित सर्व अधिकाºयांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी अध्यक्ष माधुरी आडे यांनी आयुक्तांकडे केली. यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी विरूद्ध लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद अद्याप धुमसत असल्याचे स्पष्ट झाले. या वादातूनच सीईओ रजेवर तर गेले नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.