शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

धरण पुनर्बांधणीचे साडेचार कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:48 IST

तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे.

ठळक मुद्देसाडेतेरा कोटींची तरतूद : नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी रखडली, अखर्चित निधीला मुदतवाढ

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे. तथापि पुनर्बांधणीचे काम अद्यापही प्राथमिक स्तरावरच सुरू आहे.गेल्या १२ वर्षांपूर्वी पावसाळ्यात नांदगव्हाण धरण फुटले होते. धरणाच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी सातत्याने सुरू होती. या धरणातून दिग्रस शहराला ३० वर्षांपर्यंत सतत पाणीपुरवठा होत होता. मात्र धरण फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला. या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यात प्राथमिक प्रक्रियेसाठी साडेचार कोटींचा निधी राज्य शासनाने नगरपालिकेला दिला होता. मात्र या निधीचा वापर न झाल्यामुळे तो परत गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.महसूल राज्यमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करवून घेतला होता. मात्र नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पहिल्या टप्प्यातील साडेचार कोटींची रक्कमही निर्धारित वेळेत खर्च झाली नाही. हा निधी मार्च २०१७ पर्यंतच खर्च करायचा होता. पुनर्बांधणी निधीचा वापर योग्य पद्धतीने खर्च करण्यासाठी अनुभवी अरुणावती प्रकल्प विभागाला सुपूर्द करण्यात आला होता. तांत्रिक कारणांमुळे हा निधी खर्च झाला नसल्याची सबब आता पुढे केली जात आहे. आता हा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अवर सचिवांनी साडेचार कोटींचा निधी मार्च २०१८ पर्यंत खर्ची घालण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले जाते.या मुदतवाढीसाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष सदफजहा मो. जावेद, उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, जिल्हा नियोजन समितीची सदस्य केतन रत्नपारखी आदींनी पाठपुरावा केला.दिग्रसची पाणी समस्या मिटण्यास मदतधरण पुनर्बांधणीच्या निधी खर्चास मुदतवाढ देण्यात आल्याने दिग्रस शहराची पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गेली अनेक वर्ष याच धरणातून दिग्रसला पाणीपुरवठा होतो. मात्र तो संकटात सापडला होता. धरण पुनर्बांधणीमुळे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे दिग्रसकरांची पाण्याची समस्या मिटण्यास मदत होणार आहे.अखर्चित निधीची मुदत संपली म्हणजे निधी परत गेला, असे होत नाही. निधी खर्चास मुदतवाढ मिळविण्यासाठी नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार अखर्चित निधीला मुदतवाढ मिळाली. नांदगव्हाण धरणाची पुर्नउभारणी निश्चिच होणार आहे.- सदफजहा मो. जावेदनगराध्यक्ष, दिग्रस