शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

धरण पुनर्बांधणीचे साडेचार कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:48 IST

तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे.

ठळक मुद्देसाडेतेरा कोटींची तरतूद : नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी रखडली, अखर्चित निधीला मुदतवाढ

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे. तथापि पुनर्बांधणीचे काम अद्यापही प्राथमिक स्तरावरच सुरू आहे.गेल्या १२ वर्षांपूर्वी पावसाळ्यात नांदगव्हाण धरण फुटले होते. धरणाच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी सातत्याने सुरू होती. या धरणातून दिग्रस शहराला ३० वर्षांपर्यंत सतत पाणीपुरवठा होत होता. मात्र धरण फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला. या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यात प्राथमिक प्रक्रियेसाठी साडेचार कोटींचा निधी राज्य शासनाने नगरपालिकेला दिला होता. मात्र या निधीचा वापर न झाल्यामुळे तो परत गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.महसूल राज्यमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करवून घेतला होता. मात्र नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पहिल्या टप्प्यातील साडेचार कोटींची रक्कमही निर्धारित वेळेत खर्च झाली नाही. हा निधी मार्च २०१७ पर्यंतच खर्च करायचा होता. पुनर्बांधणी निधीचा वापर योग्य पद्धतीने खर्च करण्यासाठी अनुभवी अरुणावती प्रकल्प विभागाला सुपूर्द करण्यात आला होता. तांत्रिक कारणांमुळे हा निधी खर्च झाला नसल्याची सबब आता पुढे केली जात आहे. आता हा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अवर सचिवांनी साडेचार कोटींचा निधी मार्च २०१८ पर्यंत खर्ची घालण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले जाते.या मुदतवाढीसाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष सदफजहा मो. जावेद, उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, जिल्हा नियोजन समितीची सदस्य केतन रत्नपारखी आदींनी पाठपुरावा केला.दिग्रसची पाणी समस्या मिटण्यास मदतधरण पुनर्बांधणीच्या निधी खर्चास मुदतवाढ देण्यात आल्याने दिग्रस शहराची पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गेली अनेक वर्ष याच धरणातून दिग्रसला पाणीपुरवठा होतो. मात्र तो संकटात सापडला होता. धरण पुनर्बांधणीमुळे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे दिग्रसकरांची पाण्याची समस्या मिटण्यास मदत होणार आहे.अखर्चित निधीची मुदत संपली म्हणजे निधी परत गेला, असे होत नाही. निधी खर्चास मुदतवाढ मिळविण्यासाठी नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार अखर्चित निधीला मुदतवाढ मिळाली. नांदगव्हाण धरणाची पुर्नउभारणी निश्चिच होणार आहे.- सदफजहा मो. जावेदनगराध्यक्ष, दिग्रस