शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

धरण पुनर्बांधणीचे साडेचार कोटी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:48 IST

तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे.

ठळक मुद्देसाडेतेरा कोटींची तरतूद : नांदगव्हाण धरणाची पुनर्बांधणी रखडली, अखर्चित निधीला मुदतवाढ

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीसाठी आलेले साडेचार कोटी रुपये परत गेले आहे. या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटींची तरतूद आहे. तथापि पुनर्बांधणीचे काम अद्यापही प्राथमिक स्तरावरच सुरू आहे.गेल्या १२ वर्षांपूर्वी पावसाळ्यात नांदगव्हाण धरण फुटले होते. धरणाच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी सातत्याने सुरू होती. या धरणातून दिग्रस शहराला ३० वर्षांपर्यंत सतत पाणीपुरवठा होत होता. मात्र धरण फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला. या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी एकूण साडेतेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यात प्राथमिक प्रक्रियेसाठी साडेचार कोटींचा निधी राज्य शासनाने नगरपालिकेला दिला होता. मात्र या निधीचा वापर न झाल्यामुळे तो परत गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे.महसूल राज्यमंत्र्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून १३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करवून घेतला होता. मात्र नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पहिल्या टप्प्यातील साडेचार कोटींची रक्कमही निर्धारित वेळेत खर्च झाली नाही. हा निधी मार्च २०१७ पर्यंतच खर्च करायचा होता. पुनर्बांधणी निधीचा वापर योग्य पद्धतीने खर्च करण्यासाठी अनुभवी अरुणावती प्रकल्प विभागाला सुपूर्द करण्यात आला होता. तांत्रिक कारणांमुळे हा निधी खर्च झाला नसल्याची सबब आता पुढे केली जात आहे. आता हा निधी खर्च करण्यासाठी शासनाकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अवर सचिवांनी साडेचार कोटींचा निधी मार्च २०१८ पर्यंत खर्ची घालण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले जाते.या मुदतवाढीसाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष सदफजहा मो. जावेद, उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, जिल्हा नियोजन समितीची सदस्य केतन रत्नपारखी आदींनी पाठपुरावा केला.दिग्रसची पाणी समस्या मिटण्यास मदतधरण पुनर्बांधणीच्या निधी खर्चास मुदतवाढ देण्यात आल्याने दिग्रस शहराची पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गेली अनेक वर्ष याच धरणातून दिग्रसला पाणीपुरवठा होतो. मात्र तो संकटात सापडला होता. धरण पुनर्बांधणीमुळे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे दिग्रसकरांची पाण्याची समस्या मिटण्यास मदत होणार आहे.अखर्चित निधीची मुदत संपली म्हणजे निधी परत गेला, असे होत नाही. निधी खर्चास मुदतवाढ मिळविण्यासाठी नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार अखर्चित निधीला मुदतवाढ मिळाली. नांदगव्हाण धरणाची पुर्नउभारणी निश्चिच होणार आहे.- सदफजहा मो. जावेदनगराध्यक्ष, दिग्रस