शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

अर्ध्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा कागदावरच

By admin | Updated: August 21, 2015 02:56 IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या.

महागाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या. ग्रामसेवकांच्या रिक्त पदाने निम्म्या पेक्षा अधिक ठिकाणी शिक्षकांनी ग्रामसभेचे कामकाज कागदावर नोंदवून सोपस्कार पार पाडले. महागाव तालुक्यात ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहे. तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींसाठी ६६ पदे मंजूर आहे. त्यापैकी ४१ ग्रामसेवक कार्यरत होते. त्यापैकी पाच जणांची बदली, सहा जण निलंबित आणि तीन जण कायम रिकामे आहे. तर तीन ग्रामसेवकांची निवृत्ती अगदी तोंडावर आली आहे. तर पोपुलवाड नावाचा ग्रामसेवक अडीच वर्षांपासून विना परवानगी गैरहजर आहे. त्यामुळे ७६ ग्रामपंचायतीचा कारभार केवळ २६ ग्रामसेवकांच्या भरोश्यावर सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामसभेला सरपंचासोबतच ग्रामसेवकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु ७६ ग्रामपंचायती आणि २६ ग्रामसेवक अशा परिस्थितीत ग्रामसभा घेण्याचा प्रश्न निर्माण झाला. शेवटी शिक्षकांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाला. २२ ठिकाणी शिक्षकांनी ग्रामसभेचे सोपस्कार पार पाडले. घरकुल, शौचालय, प्लास्टिक निर्मूलन, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा तीन टक्के निधी अपंगावर खर्च, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामसभेत समित्या स्थापन करणे, आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती तयार करणे, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, सिंचन विहिरींची प्रतीक्षा यादी, ग्रामस्तरीय दक्षता समिती आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु शिक्षकांना या बाबीची माहिती नाही. त्यामुळे केवळ शासकीय सोपस्कार पार पाडून महत्वाच्या विषयावर चर्चाच झाली नाही. विशेष म्हणजे ७६ ग्रामपंचायतीसाठी १२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांना ग्रामसभेला हजर रहावयाचे होते. परंतु ७६ ठिकाणी १२ अधिकारी एकाच वेळी कसे उपस्थित राहतील हा ही प्रश्नच आहे. एका दिवशी आठ ग्रामसभा घेता येणे शक्य नाही. ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने विकास कामांचा बोजवारा उडत असून आता ग्राम विकासासाठी ग्रामसेवकांची नियुक्ती कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)