शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

अर्ध्या ग्रामपंचायतीत ग्रामसभा कागदावरच

By admin | Updated: August 21, 2015 02:56 IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या.

महागाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश असताना महागाव तालुक्यातील अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा केवळ कागदावरच पार पडल्या. ग्रामसेवकांच्या रिक्त पदाने निम्म्या पेक्षा अधिक ठिकाणी शिक्षकांनी ग्रामसभेचे कामकाज कागदावर नोंदवून सोपस्कार पार पाडले. महागाव तालुक्यात ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहे. तालुक्यात ७६ ग्रामपंचायतींसाठी ६६ पदे मंजूर आहे. त्यापैकी ४१ ग्रामसेवक कार्यरत होते. त्यापैकी पाच जणांची बदली, सहा जण निलंबित आणि तीन जण कायम रिकामे आहे. तर तीन ग्रामसेवकांची निवृत्ती अगदी तोंडावर आली आहे. तर पोपुलवाड नावाचा ग्रामसेवक अडीच वर्षांपासून विना परवानगी गैरहजर आहे. त्यामुळे ७६ ग्रामपंचायतीचा कारभार केवळ २६ ग्रामसेवकांच्या भरोश्यावर सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामसभेला सरपंचासोबतच ग्रामसेवकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु ७६ ग्रामपंचायती आणि २६ ग्रामसेवक अशा परिस्थितीत ग्रामसभा घेण्याचा प्रश्न निर्माण झाला. शेवटी शिक्षकांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाला. २२ ठिकाणी शिक्षकांनी ग्रामसभेचे सोपस्कार पार पाडले. घरकुल, शौचालय, प्लास्टिक निर्मूलन, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा तीन टक्के निधी अपंगावर खर्च, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामसभेत समित्या स्थापन करणे, आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती तयार करणे, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना, सिंचन विहिरींची प्रतीक्षा यादी, ग्रामस्तरीय दक्षता समिती आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु शिक्षकांना या बाबीची माहिती नाही. त्यामुळे केवळ शासकीय सोपस्कार पार पाडून महत्वाच्या विषयावर चर्चाच झाली नाही. विशेष म्हणजे ७६ ग्रामपंचायतीसाठी १२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांना ग्रामसभेला हजर रहावयाचे होते. परंतु ७६ ठिकाणी १२ अधिकारी एकाच वेळी कसे उपस्थित राहतील हा ही प्रश्नच आहे. एका दिवशी आठ ग्रामसभा घेता येणे शक्य नाही. ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने विकास कामांचा बोजवारा उडत असून आता ग्राम विकासासाठी ग्रामसेवकांची नियुक्ती कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)