शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

गारपीटग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

By admin | Updated: August 29, 2015 02:41 IST

फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे.

केवळ येरझारा : अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष दारव्हा : फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे. त्यावेळी झालेल्या नुकसानानंतर महसूल व कृषी विभागाने संयुक्त सर्वे करून अहवाल दिला होता. त्या अहवालात पिकाचे ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचे दाखविल्यानंतरही अद्यापपर्यंत मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. २८ फेब्रुवारी २०१४ ला झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे देऊळगाव येथील शेतकरी अंकुश दत्ताप्य लाभसेटवार यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गारपीटीमुळे लाभसेटवार यांच्या शेतातील चन्याचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु वर्षभरानंतरही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. या गारपिटीनंतर झालेल्या संयुक्त सर्वेत लाभसेटवार यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले. गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या स्वाक्षरीनिशी तसा अहवालसुद्धा प्रशासनाला देण्यात आला. परंतु प्रत्यक्ष मदतीच्या यादीत मात्र लाभसेटवार यांच्यासह काही शेतकऱ्याचे नाव नव्हते. त्यामुळे कृषी व महसूल अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या लोकशाही दिनात तक्रार केली तेव्हा १६ जून २०१५ ला त्यांना त्यांच्या शेतात हरभरा पिकाचा पेरा नसल्याने ते मोबदल्यास पात्र ठरत नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: कोलमडला असल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची अंकुश लाभसेटवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, चौकशी करून मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)