शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

By admin | Updated: August 29, 2015 02:41 IST

फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे.

केवळ येरझारा : अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष दारव्हा : फेब्रुवारी २०१४ मध्ये गारपीट व वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे देऊळगाव (वळसा) येथील शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरूच आहे. त्यावेळी झालेल्या नुकसानानंतर महसूल व कृषी विभागाने संयुक्त सर्वे करून अहवाल दिला होता. त्या अहवालात पिकाचे ५० टक्केच्या वर नुकसान झाल्याचे दाखविल्यानंतरही अद्यापपर्यंत मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. २८ फेब्रुवारी २०१४ ला झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे देऊळगाव येथील शेतकरी अंकुश दत्ताप्य लाभसेटवार यासह अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गारपीटीमुळे लाभसेटवार यांच्या शेतातील चन्याचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु वर्षभरानंतरही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. या गारपिटीनंतर झालेल्या संयुक्त सर्वेत लाभसेटवार यांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले. गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या स्वाक्षरीनिशी तसा अहवालसुद्धा प्रशासनाला देण्यात आला. परंतु प्रत्यक्ष मदतीच्या यादीत मात्र लाभसेटवार यांच्यासह काही शेतकऱ्याचे नाव नव्हते. त्यामुळे कृषी व महसूल अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या लोकशाही दिनात तक्रार केली तेव्हा १६ जून २०१५ ला त्यांना त्यांच्या शेतात हरभरा पिकाचा पेरा नसल्याने ते मोबदल्यास पात्र ठरत नसल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णत: कोलमडला असल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची अंकुश लाभसेटवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, चौकशी करून मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)