शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

गारपीट अहवालात सात तालुके माघारले

By admin | Updated: March 24, 2015 23:58 IST

जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतरही सात तालुक्यांनी आपला अहवाल अद्यापही पाठविला नाही.

लोकमत विशेषयवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतरही सात तालुक्यांनी आपला अहवाल अद्यापही पाठविला नाही. जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ तालुक्याचाही यात समावेश असून संबंधित तहसीलदारांची जिल्हाधिकाऱ्यांनी कानउघाडणी केल्याची माहिती आहे. दरम्यान गारपीटग्रस्तांना हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा झाली असून प्राप्त अहवालानुसार गारपिटीत ३२ हजार हेक्टरवरील रबी पीक उद्ध्वस्त झाले. यवतमाळ जिल्ह्यात २८ फेब्रुवारी, १, ९ आणि १० मार्च रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे रबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने आयुक्त कार्यालयाकडे पाठविला. त्यानंतर अंतिम अहवाल तत्काळ तयार करण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी कृषी आणि महसूल विभागाला संयुक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील संपूर्ण नुकसानीचा अहवाल २० मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाला पाठविण्याचे आदेश होते. मात्र यवतमाळ, मारेगाव, झरी, वणी, केळापूर, महागाव आणि उमरखेड या तालुक्यांनी आपले अहवालाच जिल्हा प्रशासनाकडे पाठविले नाही. केवळ सर्वेक्षण सुरू आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. नऊ तालुक्यांनी अहवाल पाठविले. इतरांनी का पाठविले नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या तहसीलदारांनी अहवाल तयार करून पाठविला. त्या उपरही काही तालुक्यांचा अहवाल अद्याप प्राप्तच झाला नव्हता. अहवालच आला नाही तर मदत देणार तरी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. गारपिटीने नुकसान झालेल्या भागांमध्ये मदत वाटपासाठी निकष ठरविणे आले आहे. यामध्ये ५० टक्के आतील आणि ५० टक्के वरील क्षेत्राचे नुकसान असे दोन वर्ग करण्यात आले आहे. शेतकऱ्याच्या शेतात एकूण क्षेत्रापैकी ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असेल तरच शेतकरी मदतीस पात्र ठरणार असल्याचे महसूल प्रशासनाने आपल्या अध्यादेशात म्हटले आहे. ५० टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस मुकणार आहे. फळबागांना हेक्टरी २५ हजाराचे अनुदान दिले जाणार आहे. तर ओलिताच्या क्षेत्रासाठी हेक्टरी १५ हजाराची आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी दहा हजार हेक्टरी मदत दिली जाणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी २० हजाराची मदत आणि वाहून गेलेल्या जमिनीला २५ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. मात्र अद्यापही सात तालुक्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. तो अहवाल नेमका कधी प्राप्त होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे गारपीटग्रस्तांना मदत वितरणास विलंब होण्याची चिन्हे आहेत. त्यातच चार तालुक्यांना फेरआढावा सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे फेरआढावा घेण्यासही वेळ लागणार आहे. एकंदरित निसर्गासोबतच प्रशासनही शेतकऱ्यांच्या जीवावर उठले तर नाही ना असा प्रश्न आता विचारला जात आहे. (शहर वार्ताहर)