शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सावळी परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस, पिकांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:35 IST

सावळी सदोबा : वन्य प्राणी संरक्षण कायद्यामुळे जंगलग्रस्त भागातील प्रत्येक पशु व प्राण्यांना कायद्याचे संरक्षण मिळाले. मात्र, हा कायदा ...

सावळी सदोबा : वन्य प्राणी संरक्षण कायद्यामुळे जंगलग्रस्त भागातील प्रत्येक पशु व प्राण्यांना कायद्याचे संरक्षण मिळाले. मात्र, हा कायदा शेतकऱ्यांसाठी प्राणघातक ठरत आहे. शेत शिवारात रात्री आणि भरदिवसा वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत आहे.

परिसरातील शेतकरी दिवस-रात्र शेताची राखण करूनही वन्यप्राणी जुमानत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतात पेरलेले उगवलेच नाही. त्यामुळे अनेकांनी दुबार पेरणी केली. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. आता वन्यप्राणी शेत शिवारात शिरून पिकांची नासाडी करीत आहे. वनविभागाचे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरूच आहे. वन्यप्राणी पिकांत शिरून कोवळ्या पिकांचा फडशा पाडत आहे. शासनाकडून मोबदला मिळतो. मात्र तो वेळेवर मिळत नाही. त्यातही तो तोकडा असतो. तुटपुंजा मोबदला मिळत असल्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाल्याचे विष्णू पवार यांनी सांगितले.