शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सातवीच्या पुस्तकात येणार गुरुजींचे नाटक

By admin | Updated: February 2, 2017 00:37 IST

शालेय पाठ्यपुस्तके घडविणारी ‘बालभारती’ यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करताना राज्यातील शिक्षकांना लेखक होण्याची संधी देणार आहे.

नवा अभ्यासक्रम : बालभारतीकडून शिक्षकांना लेखक होण्याची संधी अविनाश साबापुरे   यवतमाळ शालेय पाठ्यपुस्तके घडविणारी ‘बालभारती’ यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करताना राज्यातील शिक्षकांना लेखक होण्याची संधी देणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून शिक्षकांनी लिहिलेली एकांकिका पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने घेतला आहे. पुढील सत्रात इयत्ता सातवी व नववीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यासाठी नवी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात शिक्षकांनीच लिहिलेला एकांकिका हा नाट्यप्रकार समाविष्ट केला जाणार आहे. शालेय उपक्रमांच्या निमित्ताने अनेक शिक्षक नाट्य, काव्य लेखन करीत असतात. मात्र, ही साहित्यनिर्मिती केवळ एखाद्या कार्यक्रमापुरतीच मर्यादित राहते. आता यातील दर्जेदार साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट होणार असल्याने त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. शिवाय, शिक्षकांच्या सर्जनशीलतेलाही अधिक वाव मिळणार आहे. सातवी ते नववीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांकडून बालभारतीने २७ जानेवारीपर्यंत एकांकिका मागविल्या आहेत. एका शिक्षकाला जास्तीत जास्त तीन एकांकिका पीडीएफ फॉर्मेटमध्ये बालभारतीकडे ई-मेल करता येईल. विशेष म्हणजे, मराठी, इंग्रजी, हिंदी यापैकी कोणत्याही भाषेतील एकांकिका स्वीकारली जाणार आहे. एकांकिकेचा विषय विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुरूप असावा, एवढीच अट आहे. शिवाय, संबंधित एकांकिका आपण लिहिलेली असल्याबाबत शिक्षकांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. राज्यभरातून आलेल्या एकांकिकांपैकी उत्तम ठरणाऱ्या साहित्यकृतींचा सातवी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकात समावेश केला जाणार आहे.