शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

गुमास्ता कायदा वेशीवर

By admin | Updated: January 14, 2015 23:16 IST

तालुक्यात अनेक दुकानदारांजवळ व्यवसाय परवाने नसताना देखील त्यांची दुकानदारी सुरूच आहे. यातून वर्षाकाठी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गुमास्ता कायद्याची काटेकोर

दिग्रस : तालुक्यात अनेक दुकानदारांजवळ व्यवसाय परवाने नसताना देखील त्यांची दुकानदारी सुरूच आहे. यातून वर्षाकाठी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गुमास्ता कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी असलेली यंत्रणाच सध्या निद्रिस्त असल्याने तालुक्यात गुमास्ता कायदा सर्रास पायदळी तुडविला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.कोणतेही नवीन दुकान अथवा प्रतिष्ठान सुरू करायचे असल्यास गुमास्ता कार्यालयाकडे त्याची रितसर नोंदणी करावी लागते. त्यानंतर सुरू होणारे नवीन प्रतिष्ठान अथवा दुकानदारास या कार्यालयाकडून परवाना देण्यात येतो. परवाना मिळण्याकरिता काही अंशी फी अर्थात महसूल भरावा लागतो. मात्र शहरात चौकाचौकात फुटपाथवरील तसेच रस्त्यावरील शेकडो पानटपरी, चहाटपरी, पाणीपुरी, हॉटेल यासह इतर तत्सम दुकाने सर्रास विनापरवाना सुरू आहे. मात्र संबंधित यंत्रणा यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. याचाच लाभ उचलत यंत्रणेच्या नाकावर टिच्चून बंदची पाटी असलेल्या दिवशीही ही दुकान ेसर्रास उघडी दिसतात. यातच गुमास्ता यंत्रणेची कार्यक्षमता पुढे येते. खासगी व्यावसायिकाचे दुकान असो अथवा प्रतिष्ठान त्यामध्ये काम करणारे कर्मचारी किंवा कामगारांना आठवड्यातून किमान एक दिवस संपूर्ण सुटी मिळणे आवश्यक आहे. मात्र दुकान किंवा प्रतिष्ठानांकडून कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुटीवरही गदा आणली जाते. अशा कर्मचाऱ्यांनी कौटुंबिक किंवा वैयक्तिक कामासाठी सुटी घेतल्यास त्यांना त्या दिवसाचा पगार मिळत नाही. आजारी सुटी घेतल्यावरही हीच परिस्थिती असते. मात्र गुमास्ता कायदा वेशीवर टांगून दुकाने किंवा प्रतिष्ठान बंदच्या दिवशी सुरू ठेवल्यास नोकरांना मात्र अतिरिक्त मोबदला दिला जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची एकप्रकारे ही पिळवणूक असून शासनाने त्यांना संरक्षण देण्याची मागणी होत आहे. शासनाच्या सबंधित विभागाकडून नियमितरित्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात येत नाही. नव्याने सुरू होत असलेल्या दुकानांनी गुमास्ता परवानगी घेतली अथवा नाही, याची तपासणी होत नाही आणि तसे रेकॉर्डही ठेवले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील एकूण दुकाने किती व त्यांच्यापासून शासनाला मिळणारे उत्पन्न किती, यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून यामध्ये नियमितता आणणे व्यावसायिक आणि शासन दोघांच्याही हिताचे आहे. (शहर प्रतिनिधी)