शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गुमास्ता कायदा वेशीवर

By admin | Updated: January 14, 2015 23:16 IST

तालुक्यात अनेक दुकानदारांजवळ व्यवसाय परवाने नसताना देखील त्यांची दुकानदारी सुरूच आहे. यातून वर्षाकाठी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गुमास्ता कायद्याची काटेकोर

दिग्रस : तालुक्यात अनेक दुकानदारांजवळ व्यवसाय परवाने नसताना देखील त्यांची दुकानदारी सुरूच आहे. यातून वर्षाकाठी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गुमास्ता कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी असलेली यंत्रणाच सध्या निद्रिस्त असल्याने तालुक्यात गुमास्ता कायदा सर्रास पायदळी तुडविला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.कोणतेही नवीन दुकान अथवा प्रतिष्ठान सुरू करायचे असल्यास गुमास्ता कार्यालयाकडे त्याची रितसर नोंदणी करावी लागते. त्यानंतर सुरू होणारे नवीन प्रतिष्ठान अथवा दुकानदारास या कार्यालयाकडून परवाना देण्यात येतो. परवाना मिळण्याकरिता काही अंशी फी अर्थात महसूल भरावा लागतो. मात्र शहरात चौकाचौकात फुटपाथवरील तसेच रस्त्यावरील शेकडो पानटपरी, चहाटपरी, पाणीपुरी, हॉटेल यासह इतर तत्सम दुकाने सर्रास विनापरवाना सुरू आहे. मात्र संबंधित यंत्रणा यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. याचाच लाभ उचलत यंत्रणेच्या नाकावर टिच्चून बंदची पाटी असलेल्या दिवशीही ही दुकान ेसर्रास उघडी दिसतात. यातच गुमास्ता यंत्रणेची कार्यक्षमता पुढे येते. खासगी व्यावसायिकाचे दुकान असो अथवा प्रतिष्ठान त्यामध्ये काम करणारे कर्मचारी किंवा कामगारांना आठवड्यातून किमान एक दिवस संपूर्ण सुटी मिळणे आवश्यक आहे. मात्र दुकान किंवा प्रतिष्ठानांकडून कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुटीवरही गदा आणली जाते. अशा कर्मचाऱ्यांनी कौटुंबिक किंवा वैयक्तिक कामासाठी सुटी घेतल्यास त्यांना त्या दिवसाचा पगार मिळत नाही. आजारी सुटी घेतल्यावरही हीच परिस्थिती असते. मात्र गुमास्ता कायदा वेशीवर टांगून दुकाने किंवा प्रतिष्ठान बंदच्या दिवशी सुरू ठेवल्यास नोकरांना मात्र अतिरिक्त मोबदला दिला जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची एकप्रकारे ही पिळवणूक असून शासनाने त्यांना संरक्षण देण्याची मागणी होत आहे. शासनाच्या सबंधित विभागाकडून नियमितरित्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात येत नाही. नव्याने सुरू होत असलेल्या दुकानांनी गुमास्ता परवानगी घेतली अथवा नाही, याची तपासणी होत नाही आणि तसे रेकॉर्डही ठेवले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील एकूण दुकाने किती व त्यांच्यापासून शासनाला मिळणारे उत्पन्न किती, यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून यामध्ये नियमितता आणणे व्यावसायिक आणि शासन दोघांच्याही हिताचे आहे. (शहर प्रतिनिधी)