शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

कपाशीवर बोंडअळ्यांची ‘गुलाबी गँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 22:11 IST

बीटी कपाशीवर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात असला, तरी यंदा वणी उपविभागातील कपाशी पिकावर अळ्यांच्या गुलाबी गँगने हल्ला चढविला आहे.

ठळक मुद्देफवारणीलाही जुमानेना : प्रत्येक बोंडात अळी, वणी उपविभागात प्रकोप, शेतकºयांचा वैताग

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बीटी कपाशीवर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात असला, तरी यंदा वणी उपविभागातील कपाशी पिकावर अळ्यांच्या गुलाबी गँगने हल्ला चढविला आहे. वणी तालुक्यासह मारेगाव व झरी तालुक्यात कपाशीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचा वैताग वाढला आहे. गंभीर बाब ही की, कोणत्याही फवारणीला या अळ्या जुमानत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.फवारणीमुळे विषबाधेच्या घटना घडल्यानंतर कृषी विक्रेत्यांनी फवारणीची औषधे विकणे बंद केल्याने अळ्यांचे हे संकट अधिकच गडद बनले आहे. वणी, झरी व मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे पिक घेतले जाते. यंदा मात्र या पिकावर कधी नव्हे ते गुलाबी अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. वणी उपविभागात फवारणीमुळे विषबाधेच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्यात. त्यामुळे शेतात फवारणी करण्यासाठी मजुर मिळेनासे झाले. त्यातच कृषी विक्रेत्यांनी कारवाईच्या भितीने फवारणीची औैषधे विकणेच बंद केले. त्यात २ नोव्हेंबरपासून कृषी विक्रेत्यांचा संप सुरू होत आहे. परिणामी आता काय करावे, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.वरवर कपाशीचे पीक चांगले दिसत असले तरी बोंड फोडून पाहिल्यानंतर त्यात गुलाबी अळी असल्याचे दिसून येते. ही अळी संपूर्ण बोंड पोखरून काढत आहे. यामुळे कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शेतकºयांवर संकटांची मालिकाएकीकडे रोगांच्या प्रादुर्भावाने पिके धोक्यात आली असताना त्यावर फवारणी करण्यासाठी औषधे मिळत नाहीत. औैषधे मिळाली तर विषबाधेच्या भितीने फवारणीसाठी मजूर मिळत नाहीत. या संकटाशी शेतकरी झुंजत असताना वीज वितरण कंपनीने शेतकºयांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू केले आहे. पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. सिंचनाअभावी ही पिके वाळण्याची शक्यता आहे. पिके हाती येण्याच्या स्थितीत असताना रानडुक्कर, रोह्यांचे कळप शेतात शिरून पिके उद्ध्वस्त करीत आहेत. संकटांच्या या मालिकेने शेतकरी खचून गेला आहे. गेल्या २० वर्षांत अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही, असे निंबाळा येथील शेतकरी राजेंद्र आसेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बोंडअळीच्या त्रासाने दोन एकर पºहाटीवर फिरविला नांगरसहा एकरातील कपाशीच्या प्रत्येकच बोंडात गुलाबी अळीचा प्रकोप झाला. त्यामुळे वैतागलेल्या एका शेतकºयाने बुधवारी सहापैकी दोन एकरातील कपाशीवर नांगर फिरविला. देवीदास पोरजलवार असे सदर शेतकºयाचे नाव असून तो झरी तालुक्यातील पाटण येथील रहिवासी आहे. पाटण गावालगतच त्याचे शेत आहे. आणखी एक एकरमधील कपाशीचे पीक काढून टाकणार असल्याचे देवीदासने ‘लोकमत’ला सांगितले. यंदा बोंडअळीमुळे एकरी केवळ चार क्विंटल कापूस झाला. बोंडअळीमुळे पुढे झाडांना कापूस फुटेल याची कोणतीच शाश्वती नसल्याने आपण कपाशीचे पिक काढून फेकल्याचे तो म्हणाला.