शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पालकमंत्र्यांचे अल्टिमेटम फुसकेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

योजनेच्या कामासाठी खराब केलेले रस्ते चांगले करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्र दिले. रस्त्याची दुरुस्ती, तर दूर कामासाठीचा खर्चही दिला नाही. एकूण १२ कोटींची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली. त्यातील एक पैसाही दिला नाही. त्यामुळे योजनेपोटी मजिप्राला द्यावयाचे ११ कोटी ५६ लाख रुपये थांबविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिली. मेडिकल चौक ते मेडिकल कॉलेज प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी प्राधिकरणाला सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळ शहराकरिता पिण्याचे पाणी आणण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या अमृत योजनेने शहरवासीयांना हैराण करून सोडले आहे. जागोजागी होत असलेले खोदकाम नागरिकांच्या जिवावर उठले आहे. योजना तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी यवतमाळच्या पालकमंत्र्यांनी कंत्राटदाराला दिलेले तीन अल्टिमेटमही फुसका बार ठरले आहे. या कंत्राटदाराच्या डोक्यावर कोणाचा हात आहे, असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एप्रिल २०१७ मध्ये या योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. अडीच वर्षांत ही योजना पूर्ण करायची होती. पाच वर्षांचा कालावधी लोटूनही योजना  अपूर्णच आहे, काम अंतिम टप्प्यात आहे, एवढेच उत्तर यंत्रणेकडून दिले जात आहे. योजनेच्या कामामुळे लोकांना त्रास  होत आहेत. हा विषय पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हाती घेतला. प्रत्येक दौऱ्यावेळी त्यांनी या योजनेचा आढावा घेतला. कंत्राटदाराला अल्टिमेटम देण्यात आला. असा प्रकार तीनवेळा घडला. शेवटच्या ऑगस्ट महिन्यातील अल्टिमेटमनंतर सात महिन्यांचा कालावधी लोटला. तरीही योजना पूर्णत्वास जाण्याची चिन्हे नाहीत. आता पालकमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योजनेच्या कामासाठी शहरभर पाईपलाईनचे जाळे पसरविण्यात आले आहे. जागोजागी लिकेज निघत आहे. ही तपासणी करण्यासाठी अवाढव्य खड्डे खोदण्यात येत आहेत. अशाच एका प्रकारात येथील चर्च रोडवर पाण्यात बुडून एका व्यक्तीचा  ६ सप्टेंबर २०२१ रोजी मृत्यू  झाला. त्याची चौकशी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी मजिप्राचे अधिकारी, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी, कंत्राटदार यांचे बयाण नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले आहे.  

नगरपरिषदेने ११ कोटी थांबविले - योजनेच्या कामासाठी खराब केलेले रस्ते चांगले करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाला वारंवार पत्र दिले. रस्त्याची दुरुस्ती, तर दूर कामासाठीचा खर्चही दिला नाही. एकूण १२ कोटींची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली. त्यातील एक पैसाही दिला नाही. त्यामुळे योजनेपोटी मजिप्राला द्यावयाचे ११ कोटी ५६ लाख रुपये थांबविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिली. मेडिकल चौक ते मेडिकल कॉलेज प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी प्राधिकरणाला सूचना केल्या. अखेर हे काम जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या रकमेतून केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

 रस्त्यावरून चालायचे कसे? या ठिकाणी होतो त्रास- वीर वामनराव चौकात काॅंक्रीट टाकून ठेवले. - शिवाजी गार्डनजवळ खड्ड्यात फक्त माती टाकली- एसटी कार्यशाळेजवळचा खड्ड्याहून सहा महिने लोटले - पळसवाडी वसाहतीच्या नवीन रस्त्याची चाळणी केली. - मेडिकल काॅलेज चौकात मातीच्या ढिगाऱ्याचे थडगे - वाघापूर बायपासवर लिकेजसाठी अवाढव्य खड्डा खोदला- नवीन टाकलेल्या अंतर्गत पाईपलाईनमुळे भरवस्तीत झरे 

वाघापुरातील घटना गंभीर, मदतीचा हात द्या  - वाघापूर येथे टेकडीवर संतुलन टाकी (एमबीआर) बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणी टेस्टिंग करताना सटकलेल्या पाईपने वाघापुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घरातून पुरासारखे पाणी वाहून गेले. या घटनेचा टेकडीखाली वास्तव्य असलेल्या १४ कुटुंबाला फटका बसला. याची भरपाई कंत्राटदाराने द्यावी, अशी रास्त मागणी होत आहे.  

अमृत योजनेसंदर्भात मजिप्रा अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेतली जाते. सध्या दोन झोनचे काम पूर्ण झाले आहे. योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाघापूर टेकडी येथील घटनेची चौकशी करून अहवाल मागविला आहे. या प्रकरणात लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कंत्राटदाराने द्यावी, अशा सूचना केली आहे. शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा मजिप्राला सांगितले जाईल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी,

अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही महिन्यातच पूर्ण होईल. या कामासाठी खोदलेले रस्ते बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. मात्र डांबरीकरणाची कंत्राटात तरतूद नाही. त्यामुळे या कामासाठीच्या खर्चाचा हिशेब पालिकेला मागितला आहे. त्यानुसार रक्कम दिली जाईल. वाघापूर येथे नुकसान झालेल्या लोकांना वस्तू रुपात मदत करण्यात आली. त्यांची घरे धुवून स्वच्छ करून दिली. - निखिल कवठळकरउपविभागीय अभियंता,मजीप्रा.

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणguardian ministerपालक मंत्री