शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

ग्रामीणमध्ये नियोजनाअभावी तीव्रता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:36 IST

तालुक्यातील १२ गावात आत्तापासूनच पाणी टंचाईची झळ पोहोचायला लागली असून तातडीने उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : चाहुल पाणी टंचाईची, नागरिकांसह जनावरांचे हाल

ऑनलाईन लोकमतपांढरकवडा : तालुक्यातील १२ गावात आत्तापासूनच पाणी टंचाईची झळ पोहोचायला लागली असून तातडीने उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.प्रशासनाच्या केवळ कागदी घोडे नाचविण्याच्या धोरणामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. साखरा, घोन्सी पोड, अनुपोड, करंजी, जोगीन कवडा, बल्लारपूर, मारेगाव आदी गावात नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. संबंधित विभागाच्या योजना कागदोपत्री तयार असूनही काही गावांमध्ये विंधन विहिरी खोदण्याची तर काही गावामध्ये नादुरूस्त नळयोजना दुरूस्त करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झालीच नाही. जवळपास सर्वच गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी घटली असून विहिरी खोल गेल्याने आत्तापासूनच ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या गावांची यादी कमी होत नसून ती वाढतच आहे. पाणी प्रश्नांवर अनेकवेळा आढावा बैठका होतात. परंतु या आढावा बैठकाचा काही उपयोगच होताना दिसत नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासूनच पायपीट सुरू झाली आहे. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. हातपंपामधून पाणी येणे बंद झले आहे. येत्या काही दिवसातच पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. परंतु प्रशासनाने अद्यापही ठोस असे नियोजन केले नाही. शासकीय अधिकारी व जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई संदर्भात घेतलेल्या विंधन विहिरीवरून पाणी पुरवठा करणे, खासगी विहिरीला अधिग्रहीत करून विहिरींचा गाळ उपसणे, विहिरी खोल करणे, या उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. तातडीने ठोस नियोजन न केल्यास व त्याची अंमलबजावणी न केल्यास तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.