शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

ग्रामीणमध्ये नियोजनाअभावी तीव्रता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:36 IST

तालुक्यातील १२ गावात आत्तापासूनच पाणी टंचाईची झळ पोहोचायला लागली असून तातडीने उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : चाहुल पाणी टंचाईची, नागरिकांसह जनावरांचे हाल

ऑनलाईन लोकमतपांढरकवडा : तालुक्यातील १२ गावात आत्तापासूनच पाणी टंचाईची झळ पोहोचायला लागली असून तातडीने उपाययोजना न केल्यास पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.प्रशासनाच्या केवळ कागदी घोडे नाचविण्याच्या धोरणामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे पाणी टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. साखरा, घोन्सी पोड, अनुपोड, करंजी, जोगीन कवडा, बल्लारपूर, मारेगाव आदी गावात नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. संबंधित विभागाच्या योजना कागदोपत्री तयार असूनही काही गावांमध्ये विंधन विहिरी खोदण्याची तर काही गावामध्ये नादुरूस्त नळयोजना दुरूस्त करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झालीच नाही. जवळपास सर्वच गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी घटली असून विहिरी खोल गेल्याने आत्तापासूनच ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या गावांची यादी कमी होत नसून ती वाढतच आहे. पाणी प्रश्नांवर अनेकवेळा आढावा बैठका होतात. परंतु या आढावा बैठकाचा काही उपयोगच होताना दिसत नाही. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासूनच पायपीट सुरू झाली आहे. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. हातपंपामधून पाणी येणे बंद झले आहे. येत्या काही दिवसातच पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार आहे. परंतु प्रशासनाने अद्यापही ठोस असे नियोजन केले नाही. शासकीय अधिकारी व जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई संदर्भात घेतलेल्या विंधन विहिरीवरून पाणी पुरवठा करणे, खासगी विहिरीला अधिग्रहीत करून विहिरींचा गाळ उपसणे, विहिरी खोल करणे, या उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. तातडीने ठोस नियोजन न केल्यास व त्याची अंमलबजावणी न केल्यास तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.