शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

भूजल पातळी घसरली

By admin | Updated: May 30, 2016 00:05 IST

अपुऱ्या पावसाने जिल्ह्याची भूजल पातळी अर्धा मीटरने घसरली आहे. १६ तालुक्यांतील १२०० गावांना याचा जबर फटका बसला आहे.

भूजल सर्वेक्षण : जिल्ह्यात सर्वाधिक घट कळंब तालुक्यामध्ये यवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्याची भूजल पातळी अर्धा मीटरने घसरली आहे. १६ तालुक्यांतील १२०० गावांना याचा जबर फटका बसला आहे. कळंब तालुक्याच्या भूजल स्रोतात सर्वाधिक घट झाली आहे. मान्सून लांबल्यास स्थिती बिकट होण्याचा धोका भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्याचा भूभाग हा ब्लॅक बेसॉल्टपासून तयार झाला आहे. या दगडाचा गुणधर्म अधिक काळ पाणी साठवून ठेवणे हा मुळातच नाही. यामुळे पावसाळयात थोडा पाऊस आला तरी विहिरी ओढे दुथडी भरून वाहतात. उन्हाळा सुरू होताच भूजल पातळी घसरते. यामुळे मुबलक पाऊस कोसळला तरी उन्हाळयात पाणीटंचाई निर्माण होते. गतवर्षी अपुरा पाऊस पडल्याने पाण्याचे स्रोत वेळेपूर्वीच कोरडे पडण्याच्या प्रक्रि येला सुरूवात झाली. यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. १६ तालुक्यांतील ६४ वॉटरशेडमध्ये येणाऱ्या १७९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.४५ मीटरने घसरली आहे. सर्वेक्षण अहवालानुसार कळंब तालुक्यात सर्वाधिक ०.५८ मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत या ठिकाणी सर्वाधिक भीषण स्थिती आहे. सर्वात कमी घट घाटंजी तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. या ठिकाणी ०.३२ मीटरने घसरण झाली आहे. (शहर वार्ताहर)भूजल पातळी घसरणे ही बाब चिंताजनक आहे. मात्र भविष्यात या स्थितीवर मात करण्यासाठी रिचार्ज शाप खोदले जात आहे. जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग असणार आहे.- राजेश सावळे, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक