शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सहा हजार हेक्टरवरील पीक झाले भुईसपाट

By admin | Updated: February 8, 2016 02:38 IST

वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पशुधनाचीच हानी केली नाही, तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट केले आहे.

यवतमाळ : वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पशुधनाचीच हानी केली नाही, तर शेतशिवारातील उभे पीक नष्ट केले आहे. यवतमाळ वन विभागात आतापर्यंत दोन हजार ८४५ हेक्टरवरील उभे पीक नष्ट केले आहे. गत पाच वर्षातील हे सर्वात मोठे नुुकसान आहे. जिल्ह्यातील नुकसानीचे हे प्रमाण ६ हजार हेक्टरवर आहे. अवैध वृक्षतोडीने वनसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन्यप्राण्यांनी गाव आणि शेतशिवाराकडे धाव घेतली. यातून शेतीचे गणित बिघडले आहे. वन्यप्राण्याच्या दहशतीने शेतकऱ्यांनी कुठले पीक घ्यावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.किडीचे आक्रमण, अवेळी आलेला पाऊस आणि वातावरणाच्या बदलापाठोपाठ वन्यप्राण्याच्या हल्ल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याचा अल्प मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र ही रक्कम पिकांचे नुकसानही भरून काढू शकत नाही. पिकांच्या नुकसानीपोटी वनविभाग शेतक ऱ्यांना १००० रूपयापासून १० हजारापर्यंत मदत देणार आहे. नुकसान ८० टक्के असल्यास २५ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. मात्र वनविभागाने पंचनामे करून १००० ते १५०० रूपयांच्याच मदतीची शिफारस केली आहे. यातून बियाण्याचा खर्च निघणे कठीण झाले आहे. (शहर वार्ताहर)जंगलालाच कुंपण करण्याची मागणीरोही, रानडुक्कर, कोल्हे, हरीण यासह विविध वन्यप्राण्यांनी शेतातील उभे पीक नष्ट करण्यास सुरूवात केली. हे प्राणी शेतशिवारात शिरू नये म्हणून जंगलालाच कुंपण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र हा खर्च न परवडणार आहे. यामुळे वनविभागाने या पर्यायाला नकार दिला आहे. असा आहे जिल्ह्याचा अहवालवन्यप्राण्याच्या धुमाकुुळाने २०१० मध्ये ३९८८ हेक्टरचे नुकसान केले. २०११ मध्ये ४४१४ हेक्टर, २०१२ मध्ये ५८७ हेक्टर, २०१३ मध्ये ८७३ हेक्टर, २०१४ मध्ये ५४६ हेक्टर, २०१५ मध्ये यवतमाळ वनवृत्त २८४६ हेक्टर, जिल्हा क्षेत्र ६००० हेक्टर आहे. वन्यप्राण्याने ४६ जनावरांची शिकार केली. या हल्ल्यात एका इसमाचा बळी गेला.