शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारासाठी निकृष्ट धान्याचा पुरवठा

By admin | Updated: July 24, 2015 02:13 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत निकृष्ट धान्याचा पुरवठा करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.

वजनात दांडी : घाटंजी तालुक्यात मोठा गैरप्रकारघाटंजी : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत निकृष्ट धान्याचा पुरवठा करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. शिजवलेले धान्य खरंच सकस असेल काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. पोषण आहार योजनेची खानापूर्ती तेवढी सुरू आहे. या योजनेत नेमके कोणाचे खिसे गरम होत आहे हे तपासण्याची गरज पालकांमधून व्यक्त केली जात आहे. तालुक्याला प्राप्त झालेले धान्य निकृष्ट आहे. शिवाय तांदुळाच्या पोत्यांनाही गळती लागली आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासन अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविला जातो. यासाठी पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी असे दोन भाग करण्यात आले आहे. तालुक्यात पहिली ते पाचवीच्या १९८ शाळा असून विद्यार्थीसंख्या ९ हजार २५५ आहे. सहावी ते आठवीच्या ७३ शाळांमध्ये ५ हजार ६८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी शाळांकडून करण्यात आली. जून ते आॅगस्टच्या मागणीनुसार कमी-अधिक प्रमाणात धान्याचा पुरवठा करण्यात आला. प्राप्त झालेले धान्य पाहून शिक्षकही बुचकाळ्यात पडले. तूर डाळ आणि मूग डाळ निकृष्ट आहे. शिवाय त्यात मोठ्या प्रमाणात भेसळही आहे. या डाळी शिजत नसल्याच्या तक्रारी आहे. तांदुळाच्या काही पोत्यांना ओल लागली आहे. काही पोते हातशिवणीचे, फाटलेले तर काही सूतळीने गाठी मारून आहे. ५० किलोच्या पोत्यामध्ये पाच ते दहा किलो तांदूळ कमी भरत आहे. वजनाविषयी शंका आल्याने एका केंद्र शाळेवर मोजून दिलेले तांदूळाचे पोते अंगणवाडीच्या काट्यावर मोजले. त्यावेळी पाच किलो कमी भरले. शिवाय डाळीसुद्धा कमी भरल्या. दुसऱ्या एका शाळेवर दिलेले तांदूळ ५० किलोऐवजी ४५ किलोच भरले. संबंधित शिक्षकाने ५० किलोचा आग्रह धरल्याने पुरवठा करणाऱ्यांनी धान्य परत नेले. त्यानंतर आठ-दहा दिवसांनी या शाळेला तांदूळ देण्यात आला. दरम्यानच्या काळात विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले आहे. (तालुका प्रतिनिधी)महाराष्ट्र स्टेट कंझ्यूमर फेडरेशनचा पुरवठा संशयास्पदहिवरी : पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ शासकीय गोदामातून कंत्राटदारांमार्फत शाळांना पुरविला जातो. धान्यादी साहित्य महाराष्ट्र स्टेट कंझ्यूमर फेडरेशनमार्फत पुरविले जाते. त्यात तेल, वाटाणा, मूग डाळ, चवळी, चणा, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, मोहरीचा समावेश असतो. या साहित्यापासून तयार होणारा आहार सकस नसतो. अतिशय निकृष्ट पुरवठा केला जातो. पुरवठा करण्यापूर्वी कंत्राट देताना नमुना म्हणून धान्यादी साहित्य घेण्यात येते आणि त्याच दर्जाचा माल सर्व शाळांना पुरविणे आवश्यक आहे. मात्र निकृष्ट साहित्य पुरवून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. विरोधी पक्षही या विषयी बोलायला तयार नाही. त्यामुळे आता शासनानेच प्रत्येक शाळेला सॅम्पल साहित्याची किट पुरवावी, त्याच दर्जाचे साहित्य पुरवठ्याचे आदेश पुरवठादारांना द्यावे आणि गेली अनेक वर्षांपासून पुरवठा होत आलेल्या साहित्याची चौकशी करून सत्ते जनतेपुढे आणावे, असे मत व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)