शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था

By admin | Updated: September 24, 2014 23:42 IST

गावागावात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे. अल्प मानधनात कर्मचारी दिवसभर राबत असतात. परंतु त्यांच्या भविष्याची कोणतीही तरतूद दिसत नाही. एवढेच नाही तर

वसंतनगर : गावागावात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे. अल्प मानधनात कर्मचारी दिवसभर राबत असतात. परंतु त्यांच्या भविष्याची कोणतीही तरतूद दिसत नाही. एवढेच नाही तर त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कुणी पुढाकार घेतानाही दिसत नाही.ग्रामीण भागात विविध योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवकांना ग्रामपंचायत कर्मचारी सहाय्यभूत ठरतो. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, दिवाबत्ती, अंगणवाडी, समाजमंदिर आदींची देखभाल या कर्मचाऱ्यांना करावी लागते. परंतु त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागते. एप्रिल २०१४ पासून शासनाच्या नियमानुसार दोन हजार ५०० रुपये त्यांच्या मानधनात वाढ झाली. मात्र अद्यापही मिळाली नाही. पूर्वी दोन हजार ६०० रुपये ग्रामपंचायत देत असते आणि एप्रिलपासून दोन हजार ६०० ग्रामपंचायत आणि शासनाकडून दोन हजार ५०० म्हणून पाच हजार १०० रुपये त्यांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु अद्यापही २६०० रुपयावरच त्यांना काम करावे लागत आहे. वरिष्ठही त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. विशेष म्हणजे त्यांचे भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात आले. १०० रुपये स्वत:चे आणि शासनाचे १०० रुपये अशा पद्धतीने जमा करण्यात आले. परंतु अनेक कर्मचाऱ्यांचे खातेसुद्धा बंद पडले आहे. दिवसभर गावातील समस्या सोडवत राबायचे. परंतु शासन मात्र त्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. यामुळे कर्मचारी आता आंदोलनाच्या तयारीत आहे.(वार्ताहर)