शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन लिस्टमुळे हिरवे स्वप्न करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:19 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा होऊन दोन वर्षे लोटली. मात्र अद्याप कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. आॅनलाईन आणि आॅफलाईनच्या कारभारात ग्रीन लिस्ट अडकल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न जागीच करपत आहे.

ठळक मुद्देआॅफलाईन कारभार : वनटाईम सेटलमेंटला पैसे आणायचे कुठून?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा होऊन दोन वर्षे लोटली. मात्र अद्याप कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. आॅनलाईन आणि आॅफलाईनच्या कारभारात ग्रीन लिस्ट अडकल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न जागीच करपत आहे.ग्रीन लिस्टसाठी आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यामुळे कर्ज वितरण वेगाने होईल, असा दावा राज्य शाससनाने केला होता. प्रत्यक्षात दोन वर्षे लोटली तरी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. यामुळे वैतागलेले शेतकरी आता थेट सरकारच्या दारापर्यंत धडकले. तरीही ग्रीन लिस्ट पुढे सरकण्याचे नाव घेत नाही. मान्सून सोबत कर्जमाफीची प्रक्रीया लांबल्याने शेती पडित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील तीन लाख २६ हजार २४० शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले. त्यातील दोन लाख २० हजार ४२९ शेतकºयांचीच ग्रीन लिस्ट आत्तापर्यंत प्रसिद्ध झाली. ११७६ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जमाफी या शेतकºयांना मिळाली. एक लाख पाच हजार ८११ शेतकºयांचे नाव अद्याप कर्जमाफीच्या यादीत आले नाही. कर्जमाफीस पात्र शेतकºयांची नावे आधी या ग्रीन लिस्टमध्ये येतात.त्यानंतर त्यांना नवीन कर्ज वितरित केले जाते. ही ग्रीन लिस्ट प्रसिद्ध करण्याची जबाबदारी हब सेंटरवर आहे. ते सेंटर मुंबईत आहे. मंत्रालयही तेथेच आहे. तरीही हब सेंटरची प्रक्रिया खोळंबली आहे. परिणामी कर्जमाफीची प्रक्रिया १५ व्या ग्रीन लिस्टच्या यादीवरच थांबून आहे. यापुढे याद्या सरकल्या नाही.आता बँक स्तरावरून नव्याने थकीत शेतकºयांची माहिती आॅफलाईन मागविण्यात आली. मग आॅनलाईन प्रक्रिया का राबविली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकरी मेटाकुटीस आले आहे. दुसऱ्या वर्षाचा हंगाम तोंडावर असताना कर्ज मिळाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी सावकारांसमोर हात पसरण्याशिवाय पर्याय नाही. यातून पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू होण्याचा धोका वाढला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांची नावे दोनदा असणे, कर्ज रकमेत तफावत, आयएफएससीकोड चुकणे यासह अनेक त्रुटी कर्जमाफीच्या यादीत आहे. वर्षभरापासून त्रुटी दुरूस्त झाल्या नाही. यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.सेटलमेंटनंतर कर्जाची खात्री काय?दीड लाखावरील रकमेची परतफेड केल्यास प्रकरण वनटाईम सेटलमेंटमध्ये जाते. नंतर असे शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरणार आहे. आता वर्षभरापासून दीड लाखाच्या आत कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. मग वनटाईम सेटलमेंटचे पैसे भरल्यानंतर कर्ज मिळण्याची खात्री काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परतफेड करूनही कर्ज मिळाले नाही, तर पेरणी करायची कशी, असाही प्रश्न आहे. त्यामुळे कर्जमाफीची वनटाईम सेटलमेंट प्रक्रिया खोळंबली आहे.