शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

ठिबक सिंचन वाढल्यास पाण्याची मोठी बचत

By admin | Updated: February 5, 2016 01:54 IST

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. ठिबक सिंचनाचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेल्यास पाण्याची मोठी बचत होईल.

प्रल्हादराव जगताप : वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्पयवतमाळ : पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. ठिबक सिंचनाचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेल्यास पाण्याची मोठी बचत होईल. खानापूरकर पॅटर्न, बॅरेजेस हेसुद्धा मोठ्या धरणांना सक्षम पर्याय आहे. राज्य व केंद्र सरकारने अशाच पद्धतीने जलसंचय करून भूजलसाठा वाढवावा. शेतकऱ्यांना धरणाची गरज नाही, मात्र पाण्याची आहे, असे मत धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव जगताप पाटील यांनी व्यक्त केले. येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प त्यांनी गुंफले. प्रल्हादराव जगताप पुढे म्हणाले, ९५ गावाची हजारो हेक्टर सुपिक जमीन, एक हजार हेक्टर जैव विविधतेने समृद्ध जंगल पाण्याखाली घालून राजकारणातील काही मंडळी निम्न पैनगंगा प्रकल्पाची समर्थक बनली आहे. जीव देवू मात्र धरणासाठी जमीन देणार नाही आणि धरणही होवू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी केला. मोठी धरणे म्हणजे राजकारण्यांचे खाऊगिरीचे अड्डे झाले आहेत. निम्न पैनगंगाबाबत तर उद्घाटनापूर्वीच काम सुरू करण्याचा अफलातून प्रकार केला गेला. विस्थापितांमध्ये पद्धतशीर फूट पाडण्याचा धरण समर्थकांचा डावही संघर्ष समितीने हाणून पाडला. आज बुडित क्षेत्रातील ९५ टक्के लोक धरण विरोधक आहे. शासनाने खंबाळा प्रकरणात शेकडो लोकांवर खटले दाखल केलेले असले तरी आमची एकजूट अभेद्य असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. येरावार, गावंडे गुरुजी आदी सहकाऱ्यांचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. व्याख्यानमालेतर्फे यावर्षीपासून शेतकरी चळवळीचे प्रणेते शरद जोशी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘योद्धा शेतकरी’ पुरस्कार दिला जात आहे. पहिल्या वर्षी हा पुरस्कार निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याचे १८ वर्ष नेतृत्त्व करणारे प्रल्हादराव जगताप पाटील यांना प्रदान करण्यात आला. माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, अप्पासाहेब वानखेडे, गजाभाऊ खर्चे, प्रा. रमाकांत कोलते यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये देवून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांतर्फे आपण हा पुरस्कार स्वीकारत असून मिळालेली रक्कम चळवळीसाठी देत असल्याचे प्रल्हादराव जगताप यांनी यावेळी जाहीर केले. संचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी, तर आभार प्रा. सीमा शेटे यांनी मानले. (वार्ताहर)