शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचन वाढल्यास पाण्याची मोठी बचत

By admin | Updated: February 5, 2016 01:54 IST

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. ठिबक सिंचनाचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेल्यास पाण्याची मोठी बचत होईल.

प्रल्हादराव जगताप : वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्पयवतमाळ : पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविल्यास भूजल पातळीत मोठी वाढ होईल. ठिबक सिंचनाचे प्रमाण १०० टक्क्यांवर नेल्यास पाण्याची मोठी बचत होईल. खानापूरकर पॅटर्न, बॅरेजेस हेसुद्धा मोठ्या धरणांना सक्षम पर्याय आहे. राज्य व केंद्र सरकारने अशाच पद्धतीने जलसंचय करून भूजलसाठा वाढवावा. शेतकऱ्यांना धरणाची गरज नाही, मात्र पाण्याची आहे, असे मत धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव जगताप पाटील यांनी व्यक्त केले. येथे आयोजित डॉ. वि.भि. कोलते स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प त्यांनी गुंफले. प्रल्हादराव जगताप पुढे म्हणाले, ९५ गावाची हजारो हेक्टर सुपिक जमीन, एक हजार हेक्टर जैव विविधतेने समृद्ध जंगल पाण्याखाली घालून राजकारणातील काही मंडळी निम्न पैनगंगा प्रकल्पाची समर्थक बनली आहे. जीव देवू मात्र धरणासाठी जमीन देणार नाही आणि धरणही होवू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी केला. मोठी धरणे म्हणजे राजकारण्यांचे खाऊगिरीचे अड्डे झाले आहेत. निम्न पैनगंगाबाबत तर उद्घाटनापूर्वीच काम सुरू करण्याचा अफलातून प्रकार केला गेला. विस्थापितांमध्ये पद्धतशीर फूट पाडण्याचा धरण समर्थकांचा डावही संघर्ष समितीने हाणून पाडला. आज बुडित क्षेत्रातील ९५ टक्के लोक धरण विरोधक आहे. शासनाने खंबाळा प्रकरणात शेकडो लोकांवर खटले दाखल केलेले असले तरी आमची एकजूट अभेद्य असल्याचे ते म्हणाले. अ‍ॅड. येरावार, गावंडे गुरुजी आदी सहकाऱ्यांचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. व्याख्यानमालेतर्फे यावर्षीपासून शेतकरी चळवळीचे प्रणेते शरद जोशी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ‘योद्धा शेतकरी’ पुरस्कार दिला जात आहे. पहिल्या वर्षी हा पुरस्कार निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याचे १८ वर्ष नेतृत्त्व करणारे प्रल्हादराव जगताप पाटील यांना प्रदान करण्यात आला. माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, अप्पासाहेब वानखेडे, गजाभाऊ खर्चे, प्रा. रमाकांत कोलते यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये देवून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांतर्फे आपण हा पुरस्कार स्वीकारत असून मिळालेली रक्कम चळवळीसाठी देत असल्याचे प्रल्हादराव जगताप यांनी यावेळी जाहीर केले. संचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी, तर आभार प्रा. सीमा शेटे यांनी मानले. (वार्ताहर)