शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण ठाण्याचा प्रस्ताव धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:01 IST

तालुक्यातील १३५ गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळताना वणी व शिरपूर पोलिसांची दमछाक होत असताना दोन वर्षांपूर्वी वणीसाठी पाठविण्यात आलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रस्ताव अद्यापही प्रशासनाच्या दरबारी धूळ खात पडून आहे.

ठळक मुद्देवणी तालुका : दोन वर्षानंतरही शासनाकडून विचारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील १३५ गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळताना वणी व शिरपूर पोलिसांची दमछाक होत असताना दोन वर्षांपूर्वी वणीसाठी पाठविण्यात आलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रस्ताव अद्यापही प्रशासनाच्या दरबारी धूळ खात पडून आहे. विशेष म्हणजे वणीसह जिल्ह्यातील काही ठिकाणांसाठी पाठविण्यात आलेले प्रस्ताव मंजूर होऊन तेथे ठाणीही उघडण्यात आली. मात्र वणी तालुक्यातील नागरिकांना अद्यापही वणी ग्रामीण पोलीस ठाणे कधी होईल, याची प्रतीक्षा लागून आहे.गेल्या ५० वर्षांत वणी तालुक्याची संख्या कितीतरी पटीने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पोलीस बळ वाढविण्यात आले नाही. वणी शहराच्या लोकसंख्येने आता ७५ हजारांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी आता स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचे सध्या नियंत्रण असले तरी पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून छुप्या मार्गाने काही महाभाग अवैध व्यवसाय करीत आहेत.वणी व परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आहेत. त्यामुळे या भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना डोळ्यात तेल घालून पहारा करावा लागतो. वणी तालुक्यात वणी व शिरपूर अशी दोन पोलीस ठाणी आहेत.वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजूर कॉलरीसारखे सर्वदृष्ट्या संवेदनशिल गाव आहे. कोळसा व्यवसायामुळे ग्रामीण भागात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. या सर्व बाबींवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियंत्रण ठेवणे एका पोलीस ठाण्याच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांना कसरत करावी लागते.वणी, शिरपूर, मुकूटबन ठाण्याच्या फेररचनेकडेही दुर्लक्षवणी, शिरपूर, मुकूटबन ठाण्याच्या हद्दीत येणाºया गावांच्या अंतराचा विचार करताना या ठाण्याच्या क्षेत्र फेररचनेची गरज आहे. उकणी, भालर वसाहत ही गावे शिरपूर पोलीस ठाण्याला जोडण्यात आली आहेत. या गावांना शिरपूर पोलीस ठाणे २५ किलोमिटर अंतरावर पडते, तर या गावापासून वणी पोलीस ठाणे केवळ १५ किलोमिटरवर आहे. तालुक्यातील घोन्सा परिसरातील काही गावे मुकूटबन पोलीस ठाण्याला जोडण्यात आली आहे. मात्र या गावांना वणी पोलीस ठाणे जवळ पडते. पुरड गाव-शिरपूरचे अंतर ३५ कि.मी.आहे. मात्र या गावासाठी मुकुटबन पोलीस ठाणे कमी अंतराचे आहे.