शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

सीटी स्कॅनसाठी ग्रामीणांची परवड

By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागांतर्गत समन्वय नसल्याने प्रचंड अनागोंदी आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागतो.

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागांतर्गत समन्वय नसल्याने प्रचंड अनागोंदी आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागतो. येथील क्ष-किरण विभागात सीटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांची परवड होत आहे. कोणीच वाली नसल्याने जायचे कोठे, असा प्रश्न रुग्णांसमोर निर्माण झाला आहे. येथे डॉक्टरांकडून कॉन्ट्रास हे औषध बाहेरून विकत आणायला लावले जाते. त्यानंतरच सीटी स्कॅन केला जातो. यवतमाळ तालुक्यातील गणगाव येथील ज्योतिराम परसराम पवार यांना घशाचा त्रास असल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात तपासणी केली. येथील नाक-कान-घसा विभागातील डॉक्टरांनी तपासणी करून ज्योतिराम पवार यांना सीटी स्कॅन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी ज्योतीरामने नंबर लावला. त्या प्रमाणे त्याला सीटी स्कॅन विभागाकडून १८ जुलै ही तारीख देण्यात आली. ठरल्याप्रमाणे ज्योतीराम १८ जुलैला सकाळी रेडिओलॉजी विभागात पोहोचला. तेथे डॉक्टरांनी त्याला कॅनुला, कॉन्ट्राससाठी इंजेक्शन आणि सिरिन हे बाहेरून खरेदी करण्यास सांगितले. तब्बल हजार रुपयांची औषधी घेऊन ज्योतीराम रुग्णालयात आला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याने हे औषध घेतले. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी कॅनुला लावून इंजेक्शन देणार असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र कोणताच डॉक्टर फिरकला नाही. शेवटी संपूर्ण विभाग बंद झाल्याने आल्या पावली परत जाण्याची वेळ ज्योतिरामवर आली. या बाबत रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, असा प्रकार नियमित चालतो, तुम्हीही घराकडे जा, असा सल्ला त्याने दिल्याचे ज्योतीरामने ‘लोकमत’ला सांगितले. सीटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांची परवड होते. नेमका काय प्रकार आहे याबाबत विभाग प्रमुख डॉ.सातघरे यांच्याकडे विचारणा केली असता, सीटी स्कॅन करण्यापूर्वी कॉन्ट्रास लावताना नाक-कान-घसा विभागातील डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक आहे. यामध्ये रुग्णाला रिअ‍ॅक्शन येण्याची शक्यता राहते. त्यामुळे सहा तासापर्यंत रुग्णाला दाखल करून घेण्याचीही गरज पडते. त्यानंतरच कॉन्ट्रास देवून सिटी स्कॅन करता येते. यासाठीच नाक-कान-घसा विभागातील डॉक्टरांना कॉल करण्यात आला. परंतु दुपारी २ वाजेपर्यंत नाक-कान-घसाचे डॉक्टर आले नाही, असे रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ.सातघरे यांच्याकडून सांगण्यात आले. परिणामी ज्योतीरामचे सिटी स्कॅन झाले नाही, असेही सांगितले. या संपूर्ण प्रकारात ज्योतीरामला नाहक आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. रुग्णालयातील दोन विभागातच समन्वय नसल्याचे यावरून स्पष्ट होते. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना या अन्यायाबाबत दाद कोठे मागायची, हेही माहीत नाही. सकाळी ९ पासून दुपारी २ पर्यंत थांबल्यानंतर ज्योतिराम गावाकडे हताशपणे परत गेला. गावातीलच व्यक्तीने ‘लोकमत’कडे तक्रार करण्यास सांगितल्यानंतर ज्योतिरामने आपली आपबिती कथन केली. (कार्यालय प्रतिनिधी)