शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सीटी स्कॅनसाठी ग्रामीणांची परवड

By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागांतर्गत समन्वय नसल्याने प्रचंड अनागोंदी आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागतो.

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभागांतर्गत समन्वय नसल्याने प्रचंड अनागोंदी आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना सहन करावा लागतो. येथील क्ष-किरण विभागात सीटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांची परवड होत आहे. कोणीच वाली नसल्याने जायचे कोठे, असा प्रश्न रुग्णांसमोर निर्माण झाला आहे. येथे डॉक्टरांकडून कॉन्ट्रास हे औषध बाहेरून विकत आणायला लावले जाते. त्यानंतरच सीटी स्कॅन केला जातो. यवतमाळ तालुक्यातील गणगाव येथील ज्योतिराम परसराम पवार यांना घशाचा त्रास असल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात तपासणी केली. येथील नाक-कान-घसा विभागातील डॉक्टरांनी तपासणी करून ज्योतिराम पवार यांना सीटी स्कॅन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी ज्योतीरामने नंबर लावला. त्या प्रमाणे त्याला सीटी स्कॅन विभागाकडून १८ जुलै ही तारीख देण्यात आली. ठरल्याप्रमाणे ज्योतीराम १८ जुलैला सकाळी रेडिओलॉजी विभागात पोहोचला. तेथे डॉक्टरांनी त्याला कॅनुला, कॉन्ट्राससाठी इंजेक्शन आणि सिरिन हे बाहेरून खरेदी करण्यास सांगितले. तब्बल हजार रुपयांची औषधी घेऊन ज्योतीराम रुग्णालयात आला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याने हे औषध घेतले. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी कॅनुला लावून इंजेक्शन देणार असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र कोणताच डॉक्टर फिरकला नाही. शेवटी संपूर्ण विभाग बंद झाल्याने आल्या पावली परत जाण्याची वेळ ज्योतिरामवर आली. या बाबत रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, असा प्रकार नियमित चालतो, तुम्हीही घराकडे जा, असा सल्ला त्याने दिल्याचे ज्योतीरामने ‘लोकमत’ला सांगितले. सीटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णांची परवड होते. नेमका काय प्रकार आहे याबाबत विभाग प्रमुख डॉ.सातघरे यांच्याकडे विचारणा केली असता, सीटी स्कॅन करण्यापूर्वी कॉन्ट्रास लावताना नाक-कान-घसा विभागातील डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक आहे. यामध्ये रुग्णाला रिअ‍ॅक्शन येण्याची शक्यता राहते. त्यामुळे सहा तासापर्यंत रुग्णाला दाखल करून घेण्याचीही गरज पडते. त्यानंतरच कॉन्ट्रास देवून सिटी स्कॅन करता येते. यासाठीच नाक-कान-घसा विभागातील डॉक्टरांना कॉल करण्यात आला. परंतु दुपारी २ वाजेपर्यंत नाक-कान-घसाचे डॉक्टर आले नाही, असे रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ.सातघरे यांच्याकडून सांगण्यात आले. परिणामी ज्योतीरामचे सिटी स्कॅन झाले नाही, असेही सांगितले. या संपूर्ण प्रकारात ज्योतीरामला नाहक आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. रुग्णालयातील दोन विभागातच समन्वय नसल्याचे यावरून स्पष्ट होते. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना या अन्यायाबाबत दाद कोठे मागायची, हेही माहीत नाही. सकाळी ९ पासून दुपारी २ पर्यंत थांबल्यानंतर ज्योतिराम गावाकडे हताशपणे परत गेला. गावातीलच व्यक्तीने ‘लोकमत’कडे तक्रार करण्यास सांगितल्यानंतर ज्योतिरामने आपली आपबिती कथन केली. (कार्यालय प्रतिनिधी)