शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:54 IST

तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. बुधवारी ३ वाजतानंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि गुरूवारपासून प्रचाराची रणधुमाळी १९ गावांमध्ये सुरू झाली.

ठळक मुद्दे२५ सदस्य बिनविरोध : तीन जागा रिक्त, ४२४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. बुधवारी ३ वाजतानंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि गुरूवारपासून प्रचाराची रणधुमाळी १९ गावांमध्ये सुरू झाली. सरपंचपदासाठी पहिल्यांदाच थेट निवडणूक होत आहे. १९ सरपंचपदासाठी ७१ उमेदवार रिंगणात आहे, तर सदस्यांच्या १२९ जागांसाठी ३५३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. २५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर तीन जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत.जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका वणी तालुक्यात होत आहेत. त्यातही मोठमोठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. १९ सरपंचपदासाठी ८३ अर्ज व १५७ सदस्यपदासाठी ३७५ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती सरपंचपदासाठी ८३ व सदस्य पदासाठी ३६६ अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सरपंचपदाच्या १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ७१ उमेदवार थेट सरपंचपदाची निवडणूक लढवित आहेत, तर सदस्यपदातील १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ३५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यांपैकी २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. यामध्ये पुरड (नेरड) येथील सहा, अहेरी येथील पाच, वरझडी येथील पाच, वारगाव येथील चार, कळमना येथील तीन, तर केसुर्ली व चारगाव येथील प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. निर्जन असलेल्या अहेरी गावामध्ये फक्त सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. पाच सदस्य अविरोध आले आहेत, तर दोन जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्याने त्या जागा रिक्त राहणार आहेत. पुरड (नेरड) येथे पहिल्यांदाच सहा जागा अविरोध ठरल्या आहेत. आता केवळ सरपंच व एका सदस्यासाठी निवडणूक होत आहे. वरझडी ग्रामपंचायतीमध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. शिंदोला, कळमना, कुरई, रांगणा, अहेरी, केसुर्ली, चारगाव, बोर्डा येथे सरपंचपदासाठी दोनच उमेदवार रिंगणात आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी पक्ष पुढाºयांनी ताकद लावून प्रत्येक गावात आपल्या पक्षाचे समर्थक उमेदवार रिंगणात उतरविले आहे. बहुतांश गावांमध्ये भाजपा व शिवसेना या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसकडून ऐनवेळी कार्यकारिणीत बदलकाँग्रेसने ऐनवेळी तालुका कार्यकारिणीत बदल घडवून कात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अनेक गावांमध्ये काँग्रेसला निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी करता आली नाही. १९ पैकी अधिकाअधिक सरपंच आपल्या पक्षाचे निवडून आणण्यासाठी भाजपा व सेना नेत्यांनी कंबर कसली आहे. चिखलगाव, शिंदोला, कुरई, वेळाबाई, मंदर, गणेशपूर या गावांच्या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचेही लक्ष लागले आहे. गावांमध्ये आचारसंहितेचा भंग होणार नाही, याकडे निवडणूक विभाग व पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन आहेत.