शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:54 IST

तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. बुधवारी ३ वाजतानंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि गुरूवारपासून प्रचाराची रणधुमाळी १९ गावांमध्ये सुरू झाली.

ठळक मुद्दे२५ सदस्य बिनविरोध : तीन जागा रिक्त, ४२४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींमध्ये गुरूवारपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. बुधवारी ३ वाजतानंतर रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि गुरूवारपासून प्रचाराची रणधुमाळी १९ गावांमध्ये सुरू झाली. सरपंचपदासाठी पहिल्यांदाच थेट निवडणूक होत आहे. १९ सरपंचपदासाठी ७१ उमेदवार रिंगणात आहे, तर सदस्यांच्या १२९ जागांसाठी ३५३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. २५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर तीन जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत.जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका वणी तालुक्यात होत आहेत. त्यातही मोठमोठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. १९ सरपंचपदासाठी ८३ अर्ज व १५७ सदस्यपदासाठी ३७५ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती सरपंचपदासाठी ८३ व सदस्य पदासाठी ३६६ अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत सरपंचपदाच्या १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ७१ उमेदवार थेट सरपंचपदाची निवडणूक लढवित आहेत, तर सदस्यपदातील १३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ३५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यांपैकी २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. यामध्ये पुरड (नेरड) येथील सहा, अहेरी येथील पाच, वरझडी येथील पाच, वारगाव येथील चार, कळमना येथील तीन, तर केसुर्ली व चारगाव येथील प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. निर्जन असलेल्या अहेरी गावामध्ये फक्त सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. पाच सदस्य अविरोध आले आहेत, तर दोन जागांसाठी एकही नामांकन प्राप्त न झाल्याने त्या जागा रिक्त राहणार आहेत. पुरड (नेरड) येथे पहिल्यांदाच सहा जागा अविरोध ठरल्या आहेत. आता केवळ सरपंच व एका सदस्यासाठी निवडणूक होत आहे. वरझडी ग्रामपंचायतीमध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. शिंदोला, कळमना, कुरई, रांगणा, अहेरी, केसुर्ली, चारगाव, बोर्डा येथे सरपंचपदासाठी दोनच उमेदवार रिंगणात आहेत.ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी पक्ष पुढाºयांनी ताकद लावून प्रत्येक गावात आपल्या पक्षाचे समर्थक उमेदवार रिंगणात उतरविले आहे. बहुतांश गावांमध्ये भाजपा व शिवसेना या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.काँग्रेसकडून ऐनवेळी कार्यकारिणीत बदलकाँग्रेसने ऐनवेळी तालुका कार्यकारिणीत बदल घडवून कात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अनेक गावांमध्ये काँग्रेसला निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी करता आली नाही. १९ पैकी अधिकाअधिक सरपंच आपल्या पक्षाचे निवडून आणण्यासाठी भाजपा व सेना नेत्यांनी कंबर कसली आहे. चिखलगाव, शिंदोला, कुरई, वेळाबाई, मंदर, गणेशपूर या गावांच्या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचेही लक्ष लागले आहे. गावांमध्ये आचारसंहितेचा भंग होणार नाही, याकडे निवडणूक विभाग व पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन आहेत.