शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

ग्रामपंचायतींची तिजोरी रिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:56 IST

ग्रामपंचायतींनी गृहकर वसूल करू नये, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

अर्थचक्र थांबले : करवसुली नाही, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले यवतमाळ : ग्रामपंचायतींनी गृहकर वसूल करू नये, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुणावनीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात एकही रुपयाही जमा झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे अर्थचक्र थांबले आहे. ग्रामपंचायतींच्या गृहकर वसुलीला १ एप्रिलपासून स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती आहे. गृहकराच्या निर्धारणासंदर्भात खटला सुरू असल्याने न्यायालयाने निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील एक हजार २०७ ग्रामपंचायतीमध्ये मार्च अखेर गृहकरातून १९ कोटी ७६ लाख ४३ हजार १७० रुपये इतके उत्पन्न अपेक्षित होते. वसुली बंद असल्याने ग्रामपंचायतींची दैनंदिन कामे खोळंबली आहेत. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलपासून वेतन नाही. (कार्यालय प्रतिनिधी) पाणीपुरवठा योजनेचा प्रश्नपाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्लिचिंग पावडर खरेदी, गावातील गवत निर्मूलन, नाली सफाई यासारखी कामे पूर्णत: थांबली आहेत. केवळ पाणी करवसुलीतून आलेल्या रकमेवर जेमतेम खर्च भागविण्यात येत आहे. आजही अनेक ग्रामपंचायतींकडे गृहकर आणि पाणीकर वसुलीशिवाय दुसरा कोणताच शाश्वत उत्पन्नाचा मार्ग नाही. त्यामुळे गावचा कारभार कसा चालवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमबाह्य प्रकाराला जन्मकाही ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून शासनाच्या विविध निधीतील रक्कम दैनंदिन कामांसाठी वापरली जात आहे. मात्र हा प्रकार नियमबाह्य असल्याने पदाधिकारी व ग्रामसेवकांच्या अंगलट येणार आहे. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने कसेबसे दिवस काढणे सुरू असल्याचे ग्रामसेवकांकडून सांगण्यात येते. तसेही दिवळीनंतरच गृहकर वसुलीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आता ही पूर्णत: बंद असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.