शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

ग्रामपंचायतींची तिजोरी रिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:56 IST

ग्रामपंचायतींनी गृहकर वसूल करू नये, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.

अर्थचक्र थांबले : करवसुली नाही, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले यवतमाळ : ग्रामपंचायतींनी गृहकर वसूल करू नये, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुणावनीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात एकही रुपयाही जमा झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे अर्थचक्र थांबले आहे. ग्रामपंचायतींच्या गृहकर वसुलीला १ एप्रिलपासून स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती आहे. गृहकराच्या निर्धारणासंदर्भात खटला सुरू असल्याने न्यायालयाने निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील एक हजार २०७ ग्रामपंचायतीमध्ये मार्च अखेर गृहकरातून १९ कोटी ७६ लाख ४३ हजार १७० रुपये इतके उत्पन्न अपेक्षित होते. वसुली बंद असल्याने ग्रामपंचायतींची दैनंदिन कामे खोळंबली आहेत. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलपासून वेतन नाही. (कार्यालय प्रतिनिधी) पाणीपुरवठा योजनेचा प्रश्नपाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्लिचिंग पावडर खरेदी, गावातील गवत निर्मूलन, नाली सफाई यासारखी कामे पूर्णत: थांबली आहेत. केवळ पाणी करवसुलीतून आलेल्या रकमेवर जेमतेम खर्च भागविण्यात येत आहे. आजही अनेक ग्रामपंचायतींकडे गृहकर आणि पाणीकर वसुलीशिवाय दुसरा कोणताच शाश्वत उत्पन्नाचा मार्ग नाही. त्यामुळे गावचा कारभार कसा चालवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमबाह्य प्रकाराला जन्मकाही ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून शासनाच्या विविध निधीतील रक्कम दैनंदिन कामांसाठी वापरली जात आहे. मात्र हा प्रकार नियमबाह्य असल्याने पदाधिकारी व ग्रामसेवकांच्या अंगलट येणार आहे. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने कसेबसे दिवस काढणे सुरू असल्याचे ग्रामसेवकांकडून सांगण्यात येते. तसेही दिवळीनंतरच गृहकर वसुलीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आता ही पूर्णत: बंद असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.