शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

धान्य चोरीला गोदामातूनच फुटतात पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

यवतमाळ शहरातील शासकीय धान्य गोदामात सुरू असलेल्या गैरप्रकाराचा छडा लावण्यात आला. धान्याची चोरी गोदामातूनच होत असल्याचे धक्कादायक वास्तव स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली. शासकीय गोदामात परवानाधारक दुकानदारांना त्यांच्या कोट्याप्रमाणे धान्य मोजून दिले जाते. हे धान्य मोजण्यासाठी अजूनही परंपरागत तराजूचाच वापर केला जातो. यात दांडीला झटका दिल्याने अर्धा किलो, अधिकाऱ्याच्या वाट्याचे एक किलोचा दगड थेट पोत्याच्या बाजूने ठेवला जातो. ही चोरी राजरोसपणे सुरू आहे.

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाकडून गरिबांसाठी मोफत व सवलतीच्या दरात धान्य वितरित केले जाते. या योजना केंद्र व राज्य सरकार राबवितात. भरमसाठ धान्य शासकीय गोदामात येते. या गोदामात धान्य वितरित करताना मापात पाप केले जाते. परवानाधारक दुकानदारांना ही फसगत उघड्या डोळ्याने बघण्याशिवाय पर्याय नाही. नंतर काही जण हाच कित्ता परवाना दुकानातून धान्य वितरण करतानाही गिरवतात. यवतमाळ शहरातील शासकीय धान्य गोदामात सुरू असलेल्या गैरप्रकाराचा छडा लावण्यात आला. धान्याची चोरी गोदामातूनच होत असल्याचे धक्कादायक वास्तव स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली. शासकीय गोदामात परवानाधारक दुकानदारांना त्यांच्या कोट्याप्रमाणे धान्य मोजून दिले जाते. हे धान्य मोजण्यासाठी अजूनही परंपरागत तराजूचाच वापर केला जातो. यात दांडीला झटका दिल्याने अर्धा किलो, अधिकाऱ्याच्या वाट्याचे एक किलोचा दगड थेट पोत्याच्या बाजूने ठेवला जातो. ही चोरी राजरोसपणे सुरू आहे. याशिवाय ज्या परवानाधारक दुकानदाराकडे अधिकचे लाभार्थी आहेत, त्यांच्याकडे धान्याचे शंभरच्या जवळपास कट्टे जातात. अशा कट्ट्यांमध्ये  दहा ते बारा किलो धान्य कमी दिले जाते. त्यामुळे लाभार्थी संख्येनुसार धान्याची तूट झालेली असते. ही तूट काही परवानाधारक सहन करतात, तर काही जण आपणच कशाला नुकसान करून घ्यायचे, म्हणून लाभार्थ्यांच्या हक्काच्या  धान्याला कात्री लावतात. थम्ब लागत नाही, लिंक नाही, थम्ब देऊन द्या, नंतर धान्य घेऊन जा, अशी एक ना अनेक कारणे सांगून टाळले जाते. गरीब लाभार्थ्यांचे शोषण करण्याची ही मालिका सातत्याने सुरू आहे. इमाने इतबारे काम करणाऱ्या रेशन परवानाधारकांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर टाकला. मात्र, कुठलीच कारवाई झाली नाही. तक्रार केल्यास आपला परवानाच अडचणीत येईल, या भीतीने पुढे येत नाहीत. 

५० किलोत अडीच किलो धान्याची तूट - शासकीय गोदामातून धान्य मोजून देताना ५० किलो कट्यात अडीच किलो धान्य कमी दिले जाते. तराजूला पोते मोजण्याच्या बाजूने कापडात एक किलोचा दगड बांधला जातो. नंतर दांडीच्या नावाखाली मोजताना झटका दिला जातो. यात अर्धा ते पाऊण किलो धान्य कमी होते. याशिवाय रिकाम्या पोत्याचे वजन ६५० ग्रॅम इतके भरते, तेही ग्राह्य धरले जात नाही. ४८ किलो ६०० ग्रॅम इतक्या वजनाचेच धान्य एका कट्ट्यात ५० किलो म्हणून दिले जाते. 

गोदामात इलेक्ट्रॉनिक्स काटे का नाहीत?- धान्याची चोरी करता यावी, म्हणून शासकीय गोदामात आजही परंपरागत तराजूचाच वापर केला जातो. सर्वत्र डिजिटल वजन काटे लागलेले आहेत. रेशन वितरण करणाऱ्या परवानाधारक दुकानदारांनाही डिजिटल वजन काटे वापरण्याची सक्ती आहे. शासकीय गोदामात मात्र डिजिटल काटे अद्यापही लागलेले नाही. यामुळे चोरीचा प्रकार सुरूच आहे. या प्रकारात अधिकारीच गुंतलेले असल्याने तक्रार देण्यास कुणीही पुढे येवून बोलायला तयार नाही. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड