शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

भूमिअभिलेखचा जीआर शेतकऱ्यांसाठी त्रासदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST

महागाव : सातबाराप्रमाणे आपले क्षेत्र असावे म्हणून शेतकरी २० ते २५ वर्षांतून किमान एकदा आपल्या शेताची मोजणी करतात. मात्र, ...

महागाव : सातबाराप्रमाणे आपले क्षेत्र असावे म्हणून शेतकरी २० ते २५ वर्षांतून किमान एकदा आपल्या शेताची मोजणी करतात. मात्र, भूमिअभिलेख विभागाचा नवीन निर्णय त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे.

अनेक गावांत धुरा, बंधारा, वहिवाटीचा रस्ता आदींचे वाद असतात. हे वाद वर्षानुवर्षे चालतात. वाद विकोपाला गेल्यानंतर सामंजस्याने शेताची मोजणी करणे व ताब्यातील जमिनीची हद्द कायम करणे, हा एकमेव मार्ग असतो. मात्र, मोजणीचा खर्च शेतकऱ्यांच्या आटोक्याबाहेर असल्याने वारंवार मोजणीच्या फंदात शेतकरी पडत नाही. सध्या भूमिअभिलेखचा जीआर मोजणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीत आणत असून, बहुतांश शेतकऱ्यांचे मोजणीसाठी भरलेले पैसे वाया जात आहे.

नवीन जीआर दुरुस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे शेतकरी गोविंदराव देशमुख यांनी आमदार नामदेव ससाने यांच्या निदर्शनास आणून दिले. या जीआरमध्ये पोट हिस्से हद्द कायम करण्याकरिता एखाद्या जरी हिस्सेदाराने स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यास, संपूर्ण गट नंबरची मोजणी व हद्द कायम पेंडिंग ठेवली जाते. यात निष्कारण इतर हिस्सेदारावर अन्याय होतो. वास्तविक मोजणीचा अर्ज दाखल करताना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सर्वांच्या संमतीचा लेख असतो. तरीसुद्धा हा हिस्सा फार्म नंबर चार (संमतीपत्र) महत्त्वाचे ठरते. या फॉर्मवर एकाची जरी स्वाक्षरी नसेल तर इतरांना न्यायालयात जाण्याचा सल्ला भूमिअभिलेख कार्यालयाकडून शेतकऱ्यांना दिला जातो. यातून मूळ हेतू बाजूला राहून न्यायालयाच्या वाऱ्या कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो.