शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

यवतमाळात कर्जमाफी दीड लाखाची, थकीत वीज बिल २.२५ लाखांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 09:49 IST

यवतमाळतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दीड लाखांची कर्जमाफी दिली तर दुसरीकडे वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाचे सव्वा दोन लाख रूपये मागितले. तशी देयके शेतकऱ्यांकडे पोहोचली आहेत.

ठळक मुद्देमहावितरणचा पराक्रम४५ हजार शेतकऱ्यांपुढे थकबाकीचा डोंगर

रूपेश उत्तरवार।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दीड लाखांची कर्जमाफी दिली. तर दुसरीकडे वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाचे सव्वा दोन लाख रूपये मागितले. तशी देयके शेतकऱ्यांकडे पोहोचली आहेत.जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांकडे ७९० कोटींची वीज बिले थकली असल्याचा महावितरणचा दावा आहे. यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या जोडणीपासून थकीत बिलच भरलेले नाही. अशा शेतकऱ्यांना दीड ते दोन लाख रूपयांचे वीज बिल देण्यात आले असून ते त्वरित भरण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा वीज कापण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.सध्या शेतकऱ्यांजवळ कर्ज भरायलाच पैसे नाहीत. त्यामुळे कर्ज थकले होते. आता कृषीपंपाचे बील भरायला पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यवतमाळ तालुक्यातील जामडोहचे शेतकरी बजरंग नागदेव गोत्राळ यांना दोन लाख १६ हजार २६० रूपयांचे वीज बिल आले आहे. १९९० पासून त्यांचे बील थकीत असल्याची नोंद बिलावर करण्यात आली आहे. आता एकाचवेळी इतके पैसे भरायचे कसे, या काळजीमुळे गोत्राळ कुटुंबाचे जगणे कठीण झाले आहे.याच गावातील एन. टी. गोलाईत यांच्याकडे १९८० पासून वीज बिल थकीत असून त्यांना एक लाख ७१ हजार रूपयांची थकबाकी भरण्याच्या सूचना आहेत. सुंदराबाई अंजीकर या विधवा आहेत. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. केवळ तीन वर्षांपासून त्यांचा पंप आहे. यानंतरही त्यांना ९० हजारांचे थकीत बिल आले आहे. हे बील भरायचे कसे, असा प्रश्न सुंदराबाईपुढे आहे.

तीन हजार ग्राहकांनी भरले बिलयवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार ग्राहकांनी एक महिन्याचे तीन हजारापर्यंतचे बिल भरण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कंपनीकडे एक कोटी रूपये जमा झाले. मात्र कुणालाच सध्या तरी संपूर्ण थकबाकी भरता आली नाही.

हॉर्सपॉवर वापरात तफावतअनेक शेतकऱ्यांना मिळालेल्या वीज बिलात अधिक हॉर्सपॉवरच्या मीटरचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवर मीटरच बसविले नाहीत. यानंतरही हे रिडींग कसे, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

१६ तासाचे भारनियमन मीटरभाडे कसे?कृषीपंपांवर १६ तासांचे लोडशेडींग आहे. लाईन ट्रिप होणे, मध्यरात्री पुरवठा होणे, असे अनेक प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यातून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तरीही मीटर भाडे मात्र लावण्यात येते. यावर्षी तर विहिरींना पाणी नाही. अशा स्थितीत मीटर बिल भरायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

टॅग्स :Governmentसरकार