शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

यवतमाळात कर्जमाफी दीड लाखाची, थकीत वीज बिल २.२५ लाखांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 09:49 IST

यवतमाळतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दीड लाखांची कर्जमाफी दिली तर दुसरीकडे वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाचे सव्वा दोन लाख रूपये मागितले. तशी देयके शेतकऱ्यांकडे पोहोचली आहेत.

ठळक मुद्देमहावितरणचा पराक्रम४५ हजार शेतकऱ्यांपुढे थकबाकीचा डोंगर

रूपेश उत्तरवार।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दीड लाखांची कर्जमाफी दिली. तर दुसरीकडे वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाचे सव्वा दोन लाख रूपये मागितले. तशी देयके शेतकऱ्यांकडे पोहोचली आहेत.जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांकडे ७९० कोटींची वीज बिले थकली असल्याचा महावितरणचा दावा आहे. यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या जोडणीपासून थकीत बिलच भरलेले नाही. अशा शेतकऱ्यांना दीड ते दोन लाख रूपयांचे वीज बिल देण्यात आले असून ते त्वरित भरण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा वीज कापण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.सध्या शेतकऱ्यांजवळ कर्ज भरायलाच पैसे नाहीत. त्यामुळे कर्ज थकले होते. आता कृषीपंपाचे बील भरायला पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यवतमाळ तालुक्यातील जामडोहचे शेतकरी बजरंग नागदेव गोत्राळ यांना दोन लाख १६ हजार २६० रूपयांचे वीज बिल आले आहे. १९९० पासून त्यांचे बील थकीत असल्याची नोंद बिलावर करण्यात आली आहे. आता एकाचवेळी इतके पैसे भरायचे कसे, या काळजीमुळे गोत्राळ कुटुंबाचे जगणे कठीण झाले आहे.याच गावातील एन. टी. गोलाईत यांच्याकडे १९८० पासून वीज बिल थकीत असून त्यांना एक लाख ७१ हजार रूपयांची थकबाकी भरण्याच्या सूचना आहेत. सुंदराबाई अंजीकर या विधवा आहेत. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. केवळ तीन वर्षांपासून त्यांचा पंप आहे. यानंतरही त्यांना ९० हजारांचे थकीत बिल आले आहे. हे बील भरायचे कसे, असा प्रश्न सुंदराबाईपुढे आहे.

तीन हजार ग्राहकांनी भरले बिलयवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार ग्राहकांनी एक महिन्याचे तीन हजारापर्यंतचे बिल भरण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कंपनीकडे एक कोटी रूपये जमा झाले. मात्र कुणालाच सध्या तरी संपूर्ण थकबाकी भरता आली नाही.

हॉर्सपॉवर वापरात तफावतअनेक शेतकऱ्यांना मिळालेल्या वीज बिलात अधिक हॉर्सपॉवरच्या मीटरचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवर मीटरच बसविले नाहीत. यानंतरही हे रिडींग कसे, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

१६ तासाचे भारनियमन मीटरभाडे कसे?कृषीपंपांवर १६ तासांचे लोडशेडींग आहे. लाईन ट्रिप होणे, मध्यरात्री पुरवठा होणे, असे अनेक प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यातून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तरीही मीटर भाडे मात्र लावण्यात येते. यावर्षी तर विहिरींना पाणी नाही. अशा स्थितीत मीटर बिल भरायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

टॅग्स :Governmentसरकार