शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

यवतमाळात कर्जमाफी दीड लाखाची, थकीत वीज बिल २.२५ लाखांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 09:49 IST

यवतमाळतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दीड लाखांची कर्जमाफी दिली तर दुसरीकडे वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाचे सव्वा दोन लाख रूपये मागितले. तशी देयके शेतकऱ्यांकडे पोहोचली आहेत.

ठळक मुद्देमहावितरणचा पराक्रम४५ हजार शेतकऱ्यांपुढे थकबाकीचा डोंगर

रूपेश उत्तरवार।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दीड लाखांची कर्जमाफी दिली. तर दुसरीकडे वीज कंपनीने अनेक शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाचे सव्वा दोन लाख रूपये मागितले. तशी देयके शेतकऱ्यांकडे पोहोचली आहेत.जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांकडे ७९० कोटींची वीज बिले थकली असल्याचा महावितरणचा दावा आहे. यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या जोडणीपासून थकीत बिलच भरलेले नाही. अशा शेतकऱ्यांना दीड ते दोन लाख रूपयांचे वीज बिल देण्यात आले असून ते त्वरित भरण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा वीज कापण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.सध्या शेतकऱ्यांजवळ कर्ज भरायलाच पैसे नाहीत. त्यामुळे कर्ज थकले होते. आता कृषीपंपाचे बील भरायला पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यवतमाळ तालुक्यातील जामडोहचे शेतकरी बजरंग नागदेव गोत्राळ यांना दोन लाख १६ हजार २६० रूपयांचे वीज बिल आले आहे. १९९० पासून त्यांचे बील थकीत असल्याची नोंद बिलावर करण्यात आली आहे. आता एकाचवेळी इतके पैसे भरायचे कसे, या काळजीमुळे गोत्राळ कुटुंबाचे जगणे कठीण झाले आहे.याच गावातील एन. टी. गोलाईत यांच्याकडे १९८० पासून वीज बिल थकीत असून त्यांना एक लाख ७१ हजार रूपयांची थकबाकी भरण्याच्या सूचना आहेत. सुंदराबाई अंजीकर या विधवा आहेत. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली. केवळ तीन वर्षांपासून त्यांचा पंप आहे. यानंतरही त्यांना ९० हजारांचे थकीत बिल आले आहे. हे बील भरायचे कसे, असा प्रश्न सुंदराबाईपुढे आहे.

तीन हजार ग्राहकांनी भरले बिलयवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार ग्राहकांनी एक महिन्याचे तीन हजारापर्यंतचे बिल भरण्याचा प्रयत्न केला आहे. यातून कंपनीकडे एक कोटी रूपये जमा झाले. मात्र कुणालाच सध्या तरी संपूर्ण थकबाकी भरता आली नाही.

हॉर्सपॉवर वापरात तफावतअनेक शेतकऱ्यांना मिळालेल्या वीज बिलात अधिक हॉर्सपॉवरच्या मीटरचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवर मीटरच बसविले नाहीत. यानंतरही हे रिडींग कसे, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

१६ तासाचे भारनियमन मीटरभाडे कसे?कृषीपंपांवर १६ तासांचे लोडशेडींग आहे. लाईन ट्रिप होणे, मध्यरात्री पुरवठा होणे, असे अनेक प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यातून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तरीही मीटर भाडे मात्र लावण्यात येते. यावर्षी तर विहिरींना पाणी नाही. अशा स्थितीत मीटर बिल भरायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

टॅग्स :Governmentसरकार