शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

शासनाच्या मोबदला भूमिकेने शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप

By admin | Updated: May 19, 2014 23:55 IST

नव्या भूसंपादन कायद्यांतर्गत शासकीय नोकरीऐवजी प्रकल्पग्रस्तांना केवळ पाच लाख रूपयांचा मोबदला देण्याची शासनाची भूमिका शेतकरी वर्गात असंतोष निर्माण करणारी ठरत

विलास ताजने - शिंदोला

नव्या भूसंपादन कायद्यांतर्गत शासकीय नोकरीऐवजी प्रकल्पग्रस्तांना केवळ पाच लाख रूपयांचा मोबदला देण्याची शासनाची भूमिका शेतकरी वर्गात असंतोष निर्माण करणारी ठरत असून हा मोबदला किमान १० लाख रूपये देण्याची मागणी शेतकरी करीत आहे़ केंद्र शासनाच्या या नव्या भूसंपादन कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या १९ मार्चला एका आदेशान्वये त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते़ सरकारी व खासगी प्रकल्पांसाठी कोणतीही जमीन संपादित करताना हा कायदा लागू होणार आहे़ राज्य शासनाच्या पूर्वीच्या भूसंपादन कायद्यान्वये हजारो हेक्टर शेतजमिनीचे अत्यल्प दराने अधिग्रहण करण्यात आले़ त्यापैकी काही शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतली़ अशा प्रकरणात प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍याही मिळाल्या नाही़ तसेच वाजवी मोबदलाही मिळालेला नाही़ त्यामुळे अशा जमिनींना नवा कायदा लागू करून मोबदला मिळावा, अशीही शेतकर्‍यांची मागणी आहे़ सरकारी नोकरीऐवजी पाच लाख रूपये देण्याचा प्रस्ताव नवीन भूसंपादन कायद्यात आहे. अशी प्रतीक्षा यादी एक लाखावर गेल्याने व यापुढे नोकर्‍यांची उपलब्धता शक्य होणार नसल्याने, हा नुकसान भरपाईचा प्रस्ताव देण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे़ या पार्श्वभूमीवर आपली जमीन कायमची गमविणार्‍या शेतकर्‍यांना वाजवी मोबदला अपेक्षित असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे़ व्यावसायीक किंवा घर बांधणी क्षेत्रासाठीसुध्दा नवा कायदा लागू करावा़ नुकसान भरपाई सहा महिन्यात मिळावी. त्यापेक्षा जास्त विलंब झाल्यास १५ टक्के व्याजदाराने भरपाई मिळावी. जमीन संपादनाची व मोबदल्याची प्रक्रिया तसेच वाद लवकर सुटण्यासाठी तालुका पातळीवर विशेष न्यायालय स्थापन करावे. ज्या कामासाठी जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे, त्याच कामासाठी अधिग्रहीत जमिनीचा वापर व्हावा. अधिग्रहणामुळे शेतकरी भूमिहीन होणार असेल, तर शक्यतोवर त्याला त्याच परिसरात नुकसान भरपाईसह जमीन मिळावी, अशा मागण्या नव्या भूसंपादन कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात करण्यात आल्या आहेत़