शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बेशरम उंचावून सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:18 IST

संपूर्ण जिल्हा बोंडअळीच्या प्रकोपाने उद्ध्वस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे मोठे नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी सरकारने नुकसान भरपाईची फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्याने शुक्रवारपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देचक्रीधरणे आंदोलन : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना घोषित मदत तातडीने द्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्हा बोंडअळीच्या प्रकोपाने उद्ध्वस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे मोठे नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी सरकारने नुकसान भरपाईची फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्याने शुक्रवारपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले.यावेळी अनेक आंदोलकांनी अंगात पोते घातले होते. गळ्यात बोंडअळीग्रस्त कापसाच्या बोंडांची माळ घातली होती. बेशरमाची झाडे उंचावून लक्षवेधी पद्धतीने सरकारचा निषेध नोंदविला.जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी तिरंगा चौकात धरणे दिले. १९ ते २५ जानेवारीपर्यंत हे आंदोलन विधानसभा मतदारसंघनिहाय चालणार आहे. दररोज एका मतदारसंघातील शेतकरी या आंदोलनात सहभाग नोंदविणार आहे. शुक्रवारी राळेगाव विधनसभा क्षेत्रातील शेतकºयांनी आंदोलन केले.हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना ३० ते ३७ हजार रूपये हेक्टरी मदत घोषित केली. बियाणे कंपन्या, केंद्र शासन, विमा कंपनी यांच्या मदतीने ही रक्कम दिली जाणार आहे. बियाणे कंपन्यांनी मदत देण्यापूर्वीच हात वर केले आहे. तर मोजक्याच शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने नुकसानभरपाई देण्याची कुठलीही घोषणा केली नाही. यामुळे शेतकºयांना मिळणाऱ्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहेत. सरकारने जाहीर केलेली मदत तत्काळ अदा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.यावेळी जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरी अराठे, अशोक बोबडे, अरुण राऊत, सुधीर जवादे, विलास भोयर, बाबासाहेब गाडे पाटील, प्रकाशचंद छाजेड, दिनेश गोगरकर, बाबू पाटील वानखडे, आनंदराव जगताप, अमित सरोदे, माजी पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी, रिता वाघमारे, निश्चल बोभाटे, शशिकांत देशमुख, राजेंद्र तेलंगे, श्रीकांत कापसे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.