शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

उमरखेडमध्ये मुंडण करून शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:55 IST

पैनगंगा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बोरी-चातारी येथील पात्रात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी तेराव्या दिवशी मुंडन करून शासनाची तेरवी केली. गेल्या १३ दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात धरणे आंदोलन सुरु आहे.

ठळक मुद्देपैनगंगेतील आंदोलनाचा तेरावा दिवस : नदीपात्रातच तेरवीचे जेवण, शासन-प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पैनगंगा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बोरी-चातारी येथील पात्रात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी तेराव्या दिवशी मुंडन करून शासनाची तेरवी केली.गेल्या १३ दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात धरणे आंदोलन सुरु आहे. शनिवारी हिमायतनगरचे तहसीलदार आशिष बिराजदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तीन दिवसात पिण्यासाठी नदीत पाणी सोडण्यात येईल असे सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी स्वत: भेट देऊन लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली.यानंतर आंदोलनाचा १३ वा दिवस असल्यामुळे शासन व प्रशासनाचा निषेध करून शेतकºयांनी मुंडन करून शासनाची तेरवी केली. यात उत्तमराव देवकते, अजब माने, श्रीराम वानखेडे, पांडुरंग कदम, राजू पतंगे, नारायण बेंद्रे, पुंजाराम वानखेडे, काशिनाथ वानखेडे आदींसह १३ शेतकऱ्यांनी मुंडन केले. त्यानंतर तेरवीचे भोजनही देण्यात आले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडलेले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.९० गावांतील शेतकरीगेल्या १३ दिवसापासून नदी काठावरील विदर्भ आणि मराठवाड्यातील ९० गावांतील शेतकरी, नागरिक धरणे आंदोलन करीत आहे. मात्र शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे शासनाची तेरवी करून शासनाचा निषेध म्हणून तेरवीचे भोजन करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाला जागे करण्यासाठी सर्व नागरिकांनी संघटितपणे लढा लढणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला.