शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शासनाच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: November 4, 2014 22:48 IST

वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

नांदेपेरा : वणी तालुक्यात कापूस, सोयाबीन हे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या घरी साठवून आहे़ मात्र बाजारभावासंदर्भात शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.पिकांना योग्य दर देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने अद्याप पाऊल उचलले नाही. कापूस, सोयाबिनचा लागवड खर्च भरमसाठ वाढला आहे. निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. लावगड खर्च आणि दरात तफावत असल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे कापसाला किमान पाच हजार रुपये, तर सोयाबीनला किमान चार हजार रूपये प्रती क्विंटल हमी भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़ शासन दरबारी शेतकरी हिताचा निर्णय तत्काळ मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़ हमी भावासाठी शेतकऱ्यांनाच तडजोड करावी लागते़ शेतकऱ्यांना नेहमी संघर्ष का करावा लागतो, हा संघर्ष आमच्याच पदरी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. दूषित हवामान, वातावरणातील बदल, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची दडी, यामुळे ओढवलेल्या नापिकीने बळीराजा त्रस्त आहे. या आपत्तींमुळे एकरी उत्पादनात घट येऊन उत्पादन खर्चही वाढतो. सध्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल केवळ तीन हजार ५०० रूपये आहे. प्रत्यक्षात कापूस सहा रूपये प्रती किलोप्रमाणे वेचावा लागतो. एका क्विंटलला किमान ६00 रुपये वेचणीवर खर्च होतात. तत्पूर्वी निंदनासाठी किमान १५० रूपये मजुरी, फवारणीसाठी ३०० रूपये, तर लागवडीसाठी किमान हजार रुपयांचा खर्च होतो. तसेच ८०० रुपयांचे बियाणे, दीड हजारांची खते, घ्यावी लागतात. असा एकूण तीन हजार ९५० रुपयांच्या जवळपास खर्च एका क्विंटलसाठी होतो. (वार्ताहर)