शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

शासनाची दीड लाखांची कर्जमाफी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:22 IST

छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात दीड लाखाच्या आतील कर्ज अंशत: माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्देअंशत: माफी : वन टाईम सेटलमेंटमध्ये शेतकरी अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात दीड लाखाच्या आतील कर्ज अंशत: माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरल्यानंतर त्यांना दीड लाखापर्यंतचे सर्व कर्ज माफ केले जाणार होते. तशी घोषणा सरकारने केली होती. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. प्रत्यक्षात दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज अद्याप माफ झाले नाही. त्यांचे अंशत: कर्ज माफ झाले. उर्वरित रक्कम त्यांच्याकडे बाकीच आहे. या शेतकऱ्यांना आता नव्याने कर्जही मिळाले नाही. आजही हे शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.यासोबतच ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेत दीड लाखांवरील रक्कम भरल्यानंतर शेतकºयांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. काही शेतकऱ्यांनी दीड लाखावरील रक्कम भरल्यानंतर त्यांना आपण कर्जमाफीला पात्र नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचाही प्रचंड हिरमोड झाला आहे. परिणामी ही कर्जमाफी फसवी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.शेतकरी झिजवताहेत बँकांचे उंबरठेकर्जमाफीनंतरही अनेक शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळाले नाही. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा आहे. कर्जासाठी दररोज हजारो शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवित आहे. सर्वच बँकांच्या जिल्ह्यातील शाखांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. कर्जमाफीची ग्रीन यादी विविध तांत्रिक कारणामुळे रखडली आहे. ग्रीन यादीअभावी जिल्ह्यातील तब्बल ६८ हजार शेतकरी अद्यापही कर्जापासून मुक्त झाले नाही. त्यांच्या सातबाऱ्यांवर कर्ज असल्याने नवीन कर्ज मिळणे कठीण झाले आहे. खरीपाची पेरणी आटोपण्याच्या मार्गावर असतानाही शेतकऱ्यांच्या हातात दमडी पडली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना नाईलाजास्तव सावकाराच्या दारात उभे रहावे लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.