शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची दीड लाखांची कर्जमाफी नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:22 IST

छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात दीड लाखाच्या आतील कर्ज अंशत: माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्देअंशत: माफी : वन टाईम सेटलमेंटमध्ये शेतकरी अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजनेत दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात दीड लाखाच्या आतील कर्ज अंशत: माफ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.जिल्हा बँक, राष्ट्रीयीकृत बँका आणि ग्रामीण बँकांच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरल्यानंतर त्यांना दीड लाखापर्यंतचे सर्व कर्ज माफ केले जाणार होते. तशी घोषणा सरकारने केली होती. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. प्रत्यक्षात दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज अद्याप माफ झाले नाही. त्यांचे अंशत: कर्ज माफ झाले. उर्वरित रक्कम त्यांच्याकडे बाकीच आहे. या शेतकऱ्यांना आता नव्याने कर्जही मिळाले नाही. आजही हे शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.यासोबतच ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेत दीड लाखांवरील रक्कम भरल्यानंतर शेतकºयांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. काही शेतकऱ्यांनी दीड लाखावरील रक्कम भरल्यानंतर त्यांना आपण कर्जमाफीला पात्र नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचाही प्रचंड हिरमोड झाला आहे. परिणामी ही कर्जमाफी फसवी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.शेतकरी झिजवताहेत बँकांचे उंबरठेकर्जमाफीनंतरही अनेक शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळाले नाही. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा आहे. कर्जासाठी दररोज हजारो शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवित आहे. सर्वच बँकांच्या जिल्ह्यातील शाखांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. कर्जमाफीची ग्रीन यादी विविध तांत्रिक कारणामुळे रखडली आहे. ग्रीन यादीअभावी जिल्ह्यातील तब्बल ६८ हजार शेतकरी अद्यापही कर्जापासून मुक्त झाले नाही. त्यांच्या सातबाऱ्यांवर कर्ज असल्याने नवीन कर्ज मिळणे कठीण झाले आहे. खरीपाची पेरणी आटोपण्याच्या मार्गावर असतानाही शेतकऱ्यांच्या हातात दमडी पडली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना नाईलाजास्तव सावकाराच्या दारात उभे रहावे लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.