शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

धनगर समाज आरक्षणासाठी सरकारला अल्टीमेटम

By admin | Updated: December 13, 2015 02:39 IST

भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला घटनादत्त अधिकार मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

पत्रपरिषद : धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीचा इशारायवतमाळ : भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला घटनादत्त अधिकार मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. सत्ता आल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीतच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असे खुद्द विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांनी अद्यापही याची पूर्तता केली नाही. या शासनाला डिसेंबर २०१६ च्या हिवाळी अधिवेशनापर्यंत आरक्षणासाठी अल्टीमेटम दिला असल्याचे धनगर समाज आरक्षण समितीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप धवने यांनी पत्रपरिषदेत सांगितले.राज्यघटनेत अनुसूचित जमातीसंदर्भात निर्देशित केलेल्या कलम ३६ मध्ये धनगड या जातीचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात धनगडचा अपभ्रंश होवून धनगर झाला आहे. केवळ या एका कारणासाठी ६८ वर्षांपासून धनगर समाज घटनादत्त अधिकारापासून वंचित राहिला आहे. यासाठी धनगर समाज संघर्ष समितीने संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले होते. निवडणूकपूर्व काळात विरोधी पक्षात असलेल्या भाजपाच्या तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी धनगरांना अनुसूचित जमातीचा अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला एक वर्षाचा कार्यकाळ कामासाठी लागतो म्हणून संघर्ष समितीने फार तगादा लावला नाही. मात्र आता एक वर्ष लोटूनही शासनकर्ते टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशॉलॉजीकडून आरक्षणाबाबत पडताळणी केल्यानंतरच निर्णय घेण्याची भाषा करत आहे. धनगर हाच धनगड असल्याचे भक्कम पुरावे उपलब्ध आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल, ग्रामपंचायत अधिनियमामध्ये अनुसूचित जमाती नसलेला धनगरांचा नामोल्लेख हे पुरावे भक्कम आहे. त्यानंतरही पडताळणीची औपचारिक अट शासनाने टाकली आहे. भाजप व शिवसेनेलाच धनगर समाजाने संपूर्ण राज्यात भरघोस मतदान केले. त्यामुळे त्यांची सत्ता आली. राज्यात एक कोटी ४० लाख इतकी धनगरांची लोकसंख्या आहे. शासनाने दिलेला शब्द पाळला नाहीतर धनगर समाज पुढच्या निवडणुकीत युती सरकारला आपली ताकद दाखवून देईल, असाही इशारा यावेळी समितीच्या सदस्यांनी दिला. पत्रपरिषदेला डॉ.संदीप धवने, पांडुरंग खांदवे, अविनाश जानकर, मधुकर चिव्हाणे, कृष्णराव कांबळे, विठ्ठलराव पुच्चे, गजानन मसाळे, योगेश कमनर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)