शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

कष्टाळू शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:52 IST

कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू : दाभडी येथून प्रहारच्या आसुड यात्रेला सुरूवात, आर्णी शहरात रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकार झुकलेच पाहिजे. दाभडी गावात येऊन नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा असा भाव देण्याचे कबूल केले होते. पण दाभडीच काय कुठेच शेतकऱ्यांचे भले झाले नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आसुड यात्रा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या दानवाला मानव करण्यासाठी यात्रेच्या समारोपाला भोकरदनमध्ये सर्वांनी यावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.प्रहार संघटनेच्या वतीने मंगळवारी दाभडी येथून आसुड यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी आमदार बच्चू कडू बोलत होते. यापूर्वीच्या शासनानेही शेतकऱ्यांची लूटच केली. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग आणला, पण तो पूर्ण लागू केला नाही. त्यामुळे आजचे आणि मागचे दोन्ही सरकार सारखेच आहे. शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतमालाला भाव दिला पाहिजे. पण आज उसाचा भाव कमी करून पाकिस्तानातून साखर आयात करण्याचे उफराटे धोरण राबविले जात आहे. लोकांना रोजगार नाही. पोटावर लाथ मारली जात आहे. पोटाचाच प्रश्न मिटलेला नाही अन् दुसरीकडे शौचालय बांधण्यास सांगितले जात आहे, अशी टीका आमदार कडू यांनी केली.नोटाबंदी करून देशाचा फायदा झाला नाही. उलट भाजपाच्याच नेत्यांनी यातून मोठा पैसा जमवला. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याकडे आजही दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे ‘वोटिंग’ करताना आता विचार केला पाहिजे. यांचे ‘सेटिंग’ उधळत शेतकरी विचाराचे आमदार सभागृहात पाठवावे लागतील. आज तेथे मी एकटा आहे. माझ्यासोबत अजून काही आमदार हवे. त्यासाठीच आसुड यात्रेतून जनजागृती करणार असल्याचे आमदार कडू म्हणाले. काही लोक मुंबईत बसूनच बोलतात. आम्ही थेट मोदींच्या गावात जाऊन आलो. जिथे जखम आहे, तिथेच इंजेक्शन देण्याचे काम प्रहारकडून होईल, असेही ते म्हणाले.नरेंद्र मोदींनी दाभडीत येऊन शेतकऱ्यांना स्वप्न दाखविले. तरीही शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. दाभडी दत्तक घेऊन विकास करण्याच्या घोषणा आमदार, खासदारांनी केल्या. पण गावात काहीच फरक पडला नाही. प्रहारने शेतकरी, शेतमजुरांना नेहमीच मदत केली. यापुढेही दाभडी गाव आम्ही दत्तक घेऊन समस्या मार्गी लावणार आहोत, अशी घोषणा यावेळी प्रहारचे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे यांनी केली.यावेळी प्रहारच्या पांढरवडाच्या नगराध्यक्ष वैशाली नहाते, कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, जिल्हाध्यक्ष विलास पवार, नितीन मिर्झापुरे, शिक्षक आघाडीचे सुभाष कुळसंगे, तालुकाध्यक्ष नीलेश आचमवार, शहराध्यक्ष अंकुश राजूरकर, श्रीकांत काळे यांच्यासह राज्यभरातील प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते.स्थानिक आमदार ‘ठुमक्यात’ मग्नआसुड यात्रेची सुरवात करताना दाभडी गावातील शेतकऱ्यांनीही आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आपल्या भावना व्यक्त केल्या. दिगांबर गुल्हाने हे शेतकरी म्हणाले, स्थानिक आमदार शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रश्नांकडे लक्ष देत नाही. उलट ते ‘ठुमके’ लावण्यातच मग्न आहेत. नरेंद्र मोदींनी आमच्या गावात येऊन आश्वासन दिले. आज मात्र कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यावेळी दाभडी गावातील रूख्मिणी विठ्ठल राठोड या शेतकरी महिलेच्या कुटुंबाला प्रहारकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर शेतकऱ्यांचे ‘काळे दिन’ अजून गेले नाही, म्हणून आपण काळा शर्ट घालून आलो, अशी टीप्पणी आमदार कडू यांनी केली.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू