शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी

By admin | Updated: July 3, 2014 23:48 IST

राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी

यवतमाळ : राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ आज दमडीही शिल्लक नाही, तेंव्हा शासनाने ही परिस्थिती समजून घेऊन शेतकऱ्यांना भरीव मागणी करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी नक्षत्रांमधले तब्बल तीन नक्षत्र सताड कोरडे गेल्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील समस्त बळीराजा हवालदिल झाला असून अस्मानी संकटाच्या साडेसातीत अडकला आहे. राज्यामध्ये सर्वत्र हीच परिस्थिती असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. शेतातील कोंब आलेली बियाणे जळून नष्ट झाली. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अश्रू कोरडे पडलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे अपेक्षेची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांपुढे फार मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट मोफत बियाणे देऊन किंवा दुबार पेरणीसाठी भरीव आर्थिक मदत करुन दिलासा द्यावा व त्यांच्यावरचे संकट तत्काळ दूर करावे, अशी महत्वपूर्ण मागणी यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. पावसाळा लांबणीवर पडला असल्याने केवळ शेतकरीच अडचणीत नसून हे एक सामाजिक संकट आहे. त्यामुळे याकरिता सरकारने पुढाकार घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात एकटे न सोडता भरीव मदत त्वरित जाहीर करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा आहे. या बाबत नुकतीच यवतमाळ जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राज्य सरकारकडे रवाना करण्यात आले असून सर्व स्तरातील नागरिकांनीसुद्धा याबाबत जागृत राहून शेतकऱ्यांसाठी भरीव मागणी करण्याचे आवाहन सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बुटे, अध्यक्ष मंगेश वैद्य, श्रीरंग रेकलवार, एम.एम. गुल्हाने, किशोर पोहणकर आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)