शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी

By admin | Updated: July 3, 2014 23:48 IST

राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी

यवतमाळ : राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाअभावी मोठ्या आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. परंतु ही पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ आज दमडीही शिल्लक नाही, तेंव्हा शासनाने ही परिस्थिती समजून घेऊन शेतकऱ्यांना भरीव मागणी करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी नक्षत्रांमधले तब्बल तीन नक्षत्र सताड कोरडे गेल्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील समस्त बळीराजा हवालदिल झाला असून अस्मानी संकटाच्या साडेसातीत अडकला आहे. राज्यामध्ये सर्वत्र हीच परिस्थिती असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. शेतातील कोंब आलेली बियाणे जळून नष्ट झाली. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अश्रू कोरडे पडलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे अपेक्षेची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांपुढे फार मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट मोफत बियाणे देऊन किंवा दुबार पेरणीसाठी भरीव आर्थिक मदत करुन दिलासा द्यावा व त्यांच्यावरचे संकट तत्काळ दूर करावे, अशी महत्वपूर्ण मागणी यवतमाळ जिल्ह्याच्यावतीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. पावसाळा लांबणीवर पडला असल्याने केवळ शेतकरीच अडचणीत नसून हे एक सामाजिक संकट आहे. त्यामुळे याकरिता सरकारने पुढाकार घ्यावा, तसेच शेतकऱ्यांना या संकटाच्या काळात एकटे न सोडता भरीव मदत त्वरित जाहीर करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा आहे. या बाबत नुकतीच यवतमाळ जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राज्य सरकारकडे रवाना करण्यात आले असून सर्व स्तरातील नागरिकांनीसुद्धा याबाबत जागृत राहून शेतकऱ्यांसाठी भरीव मागणी करण्याचे आवाहन सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बुटे, अध्यक्ष मंगेश वैद्य, श्रीरंग रेकलवार, एम.एम. गुल्हाने, किशोर पोहणकर आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)