शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शासनाच्या आदेशाला प्रशासनाचा खो

By admin | Updated: December 7, 2014 22:59 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोझा व त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आॅगस्ट २०१३ पासून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ केली आहे.

पुसद : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोझा व त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आॅगस्ट २०१३ पासून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ केली आहे. मात्र पुसद तालुक्यात शासनाच्या आदेशाला प्रशासनाने खो देत तब्बल १६ महिने उलटूनही कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केलेली नाही. परिणामी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष धुमसत आहे.शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता कर्मचाऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाविरुद्ध पुसद पंचायत समिती समोर ८ डिसेंबरपासून उपोषण व कामबंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पुसद तालुका शाखेच्यावतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला. पुसद तालुक्यात एकूण ११९ ग्रामपंचायती असून १८० गावे आहेत. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये शासनाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाने आॅगस्ट २०१३ पासून किमान वेतनवाढ व निर्धारित दरानुसार महागाई भत्ता मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाली असताना पुसद तालुक्यात मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत शासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. तसेच एप्रिल २०१४ पासून लोकसंख्येच्या परिमंडळानुसार मान्य आकृतिबंधातील कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेतन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार ५ फेब्रुवारी २०१४ पासून दोन महिन्यांचे १०० टक्के अनुदान जिल्हा परिषदेला मिळाले असून जिल्हा परिषदेने ते पंचायत समितीकडे वर्ग केले आहे. मात्र पंचायत समितीच्या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी पुसद पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहे. सोबतच या दरम्यान कामबंदही ठेवण्यात येणार आहे.या आंदोलनात ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मोहुर्ले, राजेंद्र राऊत, संजय मातीरे, माधव कांबळे, गणेश चव्हाण, संदीप राठोड, दादाराव राठोड, दत्तदिगंबर वानखडे, कैलास आडे, उकंडा राठोड, दुर्गादास राठोड, पांडुरंग कांबळे, रोहिदास चव्हाण, धोंडबा हाके आदींचा सहभाग राहणार आहे. (प्रतिनिधी)