शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

शासकीय बाजार समिती डबघाईस

By admin | Updated: July 15, 2015 03:07 IST

वणी तालुक्याची ओळख कापूस उत्पादक तालुका म्हणून आहे. येथे ६० एकर जागा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली.

आसिफ शेख  वणीवणी तालुक्याची ओळख कापूस उत्पादक तालुका म्हणून आहे. येथे ६० एकर जागा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. मात्र आता ही बाजार समितीच डबघाईस आली आहे. कोट्यवधींची मालमत्ता असूनही समिती आर्थिक अडचणीत आहे. समितला उत्पन्न मिळवून देणारे तब्बल १०८ गाळेही धूळखात पडले आहे. वणी तालुक्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस पिकासाठी हा तालुका सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथे आजूबाजूच्या तालुक्यातीलच नव्हे, तर बाहेर जिल्ह्यातील कापूसही पूर्वी विक्रीस येत होता. पूर्वी कापसाच्या हंगामात या बाजार समितीत पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती. आंध्रप्रदेश, तेलंगणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर व अन्य ठिकाणाहून कापसाच्या खरेदीसाठी मोठे व्यापारी या समितीत येत होते. या समितीत कापसाच्या भावासंदर्भात मोठे आंदोलनही झाले होते. त्यात एक शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात ठारही झाला होता. त्यावेळी ही बाजार समिती राज्यात प्रसिद्धीस आली होती. मात्र आज हिच बाजार समिती आर्थिक अडचणीत सापडली आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला देणारी समिती आता अखेरच्या घटका मोजत आहे. शासनाचे आर्थिक धोरण, खासगी बाजार समितीमुळे या शासकीय बाजार समितीचे अस्तित्त्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे खरे मित्र अडते व व्यापाऱ्यांनी या समितीकडे पाठ फिरविल्याने बाजार समिती डबघाईस येत आहे. खासगी बाजार समितीसोबत स्पर्धा असल्याने ‘सेस‘ कमी करण्यात आला. परिणामी आता समितीचा नफाही आटला आहे.येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीला पुढील वर्षी २०१६ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहे. या समितीत सध्या १०४ व्यापारी, अडते, ६८ सहकारी संस्थाचे ८०७ सदस्य, वसंत जिनिंग व सहकारी खरेदी विक्री संस्थेचे ३५ सभासद आहे. त्याचबरोबर १०१ गावांमधील ७११ सभासद आहेत. सुरू वर्षात या बाजार समितीला एक कोटी एक लाख उत्पन्न प्राप्त झाले. मात्र तरीही समिती आर्थिक अडचणीत का सापडली, हा मोठा प्रश्न आहे. या बाजार समितीसाठी दुमजली वास्तू उभारण्यात आली आहे. त्यातील दुसरा मजला सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. काही खोलीमधील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहे. त्याचबरोबर रेकॉर्ड रूमचीही अवस्था दयनीय झाली आहे. वास्तू जीर्ण झाल्याने तेथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहे. बाजार समितीकडे निधी नसल्याने या वास्तूची दुरूस्ती कोण करणार, हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून निधी नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहे. सध्या कसा तरी समितीचा गाडा हाकला जात आहे. मात्र या समितीचे अस्तित्त्वच आता धोक्यात सापडले. त्यामुळे शेतकरीही त्रस्त आहे.