शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शासकीय बाजार समिती डबघाईस

By admin | Updated: July 15, 2015 03:07 IST

वणी तालुक्याची ओळख कापूस उत्पादक तालुका म्हणून आहे. येथे ६० एकर जागा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली.

आसिफ शेख  वणीवणी तालुक्याची ओळख कापूस उत्पादक तालुका म्हणून आहे. येथे ६० एकर जागा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. मात्र आता ही बाजार समितीच डबघाईस आली आहे. कोट्यवधींची मालमत्ता असूनही समिती आर्थिक अडचणीत आहे. समितला उत्पन्न मिळवून देणारे तब्बल १०८ गाळेही धूळखात पडले आहे. वणी तालुक्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस पिकासाठी हा तालुका सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथे आजूबाजूच्या तालुक्यातीलच नव्हे, तर बाहेर जिल्ह्यातील कापूसही पूर्वी विक्रीस येत होता. पूर्वी कापसाच्या हंगामात या बाजार समितीत पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती. आंध्रप्रदेश, तेलंगणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर व अन्य ठिकाणाहून कापसाच्या खरेदीसाठी मोठे व्यापारी या समितीत येत होते. या समितीत कापसाच्या भावासंदर्भात मोठे आंदोलनही झाले होते. त्यात एक शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात ठारही झाला होता. त्यावेळी ही बाजार समिती राज्यात प्रसिद्धीस आली होती. मात्र आज हिच बाजार समिती आर्थिक अडचणीत सापडली आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला देणारी समिती आता अखेरच्या घटका मोजत आहे. शासनाचे आर्थिक धोरण, खासगी बाजार समितीमुळे या शासकीय बाजार समितीचे अस्तित्त्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे खरे मित्र अडते व व्यापाऱ्यांनी या समितीकडे पाठ फिरविल्याने बाजार समिती डबघाईस येत आहे. खासगी बाजार समितीसोबत स्पर्धा असल्याने ‘सेस‘ कमी करण्यात आला. परिणामी आता समितीचा नफाही आटला आहे.येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीला पुढील वर्षी २०१६ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहे. या समितीत सध्या १०४ व्यापारी, अडते, ६८ सहकारी संस्थाचे ८०७ सदस्य, वसंत जिनिंग व सहकारी खरेदी विक्री संस्थेचे ३५ सभासद आहे. त्याचबरोबर १०१ गावांमधील ७११ सभासद आहेत. सुरू वर्षात या बाजार समितीला एक कोटी एक लाख उत्पन्न प्राप्त झाले. मात्र तरीही समिती आर्थिक अडचणीत का सापडली, हा मोठा प्रश्न आहे. या बाजार समितीसाठी दुमजली वास्तू उभारण्यात आली आहे. त्यातील दुसरा मजला सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. काही खोलीमधील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहे. त्याचबरोबर रेकॉर्ड रूमचीही अवस्था दयनीय झाली आहे. वास्तू जीर्ण झाल्याने तेथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहे. बाजार समितीकडे निधी नसल्याने या वास्तूची दुरूस्ती कोण करणार, हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून निधी नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहे. सध्या कसा तरी समितीचा गाडा हाकला जात आहे. मात्र या समितीचे अस्तित्त्वच आता धोक्यात सापडले. त्यामुळे शेतकरीही त्रस्त आहे.