शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शासकीय रुग्णालय परिसराने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

रुग्णालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुरेंद्र पाल या शिकाऊ डॉक्टरचा खून झाल्यानंतर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मध्यंतरी मेडिकल चौक ते नंदूरकर महाविद्यालय या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यानंतर गुरुवारी पिंपळगाव रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रुग्णालय ते नंदूरकर महाविद्यालय मार्गावरील अतिक्रमण हटविल्यानंतर गुरुवारी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पिंपळगाव रोडवरील अतिक्रमणावरही प्रशासनाने हातोडा घातला. अतिक्रमण हटविल्याने शासकीय रुग्णालयाने आता मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान ही मोहीम राबविताना दुजाभाव केला जात असल्याचीही अनेकांची भावना असल्याचे निवेदन गुरुवारी वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.  दारव्हा नाका, दर्डानगरसह, शारदा चौक ते बसस्थानक, बसस्थानक ते आर्णी नाका, बसस्थानक ते दारव्हा नाका, रेल्वे क्राॅसिंग येथील अतिक्रमण कधी हटविणार असा प्रश्न उपस्थित केला. 

यवतमाळ : गुरुवारी सकाळपासूनच प्रशासनाने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पिंपळगाव रोडवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण हटविल्याने शासकीय रुग्णालयाने मोकळा श्वास घेतला. रुग्णालयात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या सुरेंद्र पाल या शिकाऊ डॉक्टरचा खून झाल्यानंतर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. मध्यंतरी मेडिकल चौक ते नंदूरकर महाविद्यालय या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यानंतर गुरुवारी पिंपळगाव रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.  पथक दाखल झाल्यानंतर अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. या मोहिमेमुळे या मार्गावर दिवसभर गोंधळाची स्थिती होती.   दरम्यान, ॲड. जयसिंह चव्हाण, ॲड. अजय डाखोरे, ॲड. नरेंद्र मेश्राम, ॲड. भारती मेश्राम, ॲड. ए. तगाले, किशोर भवते, गजानन वानखेडे, संदेश भगत, मधुकर पेंदाम, ॲड. एस. व्ही. आठवले, ॲड. सचिन बोबडे, ॲड. राम शेंडे यांच्यासह वकिलांनी गुरुवारी  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून प्रशासनाने अतिक्रमण हटविताना दुजाभाव करू नये, अशी मागणी   केली आहे. अतिक्रमण हटावची कारवाई करताना अनेक ठिकाणी दृश्यस्वरूपात असलेले अतिक्रमण काढण्यात येत नसल्याकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेध. या प्रकारामुळे गोरगरिबात  अस्वस्थता व अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. नियमानुसार सरसकट सर्वांचेच अतिक्रमण काढण्याची मागणी त्यांनी केली. 

शहरातील अनेक मार्ग अतिक्रमणाने केले गिळंकृत

- दारव्हा नाका दर्डानगर चौकापासून थेट लोहारापर्यंत असलेल्या महामार्गाला लागूनचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे. या बरोबरच त्यावर हातगाडे, शोरूम, कार्यालये, कुंपण व दुकाने थाटण्यात आली आहेत. मेनलाईनमध्ये अस्थायी स्वरूपात उभे केलेले दुकानाचे अनेक शेड आहेत. यावरही कारवाई करण्याची गरज आहे. तीच परिस्थिती गोदणी मार्गावरील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरातील येथेही मोठ्या प्रमाणात अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहे. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैशालीनगर ते जय विजय चौकापर्यंतही मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या जागेवर दुकाने व शेड थाटण्यात आली आहेत. रुग्णालय परिसरातील गोरगरिबांची अतिक्रमणे हटवितानाच या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप वकिलांनी निवेदनात केला आहे.

मेडिकल परिसरात डाॅक्टरचा खून झाला. यानंतर खुनाच्या प्रयत्नाची घटना घडली. यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अतिदक्षता म्हणून या ठिकाणावर कारवाई करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नाही. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल.      - माधुरी मडावी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, यवतमाळ. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण