शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

शासकीय कर्मचारी मतदानाबाबत उदासीन

By admin | Updated: May 22, 2014 01:31 IST

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने मतदारांमध्ये जनजागृती करताना त्याची सुरुवात आपल्या शासकीय कर्मचार्‍यांपासून केली.

यवतमाळ : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने मतदारांमध्ये जनजागृती करताना त्याची सुरुवात आपल्या शासकीय कर्मचार्‍यांपासून केली. परंतु लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला त्यात यश येऊ शकले नाही. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात १२ हजार कर्मचार्‍यांपैकी केवळ दोन हजार ६३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आधी आपल्या कर्मचार्‍यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी आयोगाने सोपविली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आणि संधी मिळेल तेव्हा मतदानाच्या हक्काबाबत शासकीय कर्मचार्‍यांचे ‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर प्रत्येक विभाग प्रमुखांना आपल्या कर्मचार्‍यांचे मतदान करून घेण्याबाबत जबाबदारी दिली. मात्र त्यानंतरही प्रशासनाला अपेक्षेनुसार त्यात यश आलेले नाही. २00९ च्या तुलनेत पोस्टल बॅलेटची संख्या मात्र दुप्पट झाली आहे. तरुण मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती झाली असली तरी शासकीय कर्मचार्‍यांमध्ये हा हक्क रुजविण्यात प्रशासन कमी पडले, असेच म्हणावे लागेल.

लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय कर्मचार्‍यांना अर्ज देण्यात आले होते. मतदान पोस्टल बॅटेलद्वारे करायचे की ईलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटद्वारे याबाबत विचारणा करण्यात आली होती. मतदानाच्या वेळी यवतमाळ-वाशिममध्ये ११ ते १२ हजार शासकीय कर्मचार्‍यांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यांच्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पोस्टल बॅलेट पाठविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ दोन हजार ६३ कर्मचार्‍यांनीच मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत नवृत्त साखर आयुक्त आणि सेवानवृत्त आयपीएस अधिकारी रिंगणात होते. त्यामुळे शासकीय कर्मचार्‍यांचा कल त्यांच्याकडे राहील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात बसपा व भारिप-बमसंचे उमेदवार असलेल्या या नवृत्त अधिकार्‍यांना अनुक्रमे केवळ ८६ व २८ मते पडली. शासकीय कर्मचार्‍यांचा कलही शिवसेनेकडेच सर्वाधिक राहिला. सेना उमेदवाराच्या अर्धीही मते पोस्टल बॅलेटमधून काँग्रेसला मिळाली नाही. १४ उमेदवारांना तर शासकीय कर्मचार्‍यांनी स्पष्टपणे नाकारले. शासकीय कर्मचार्‍यांनी एक तर अर्ज भरुन परत आणले नाही आणि ज्यांनी अर्ज आणले त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडून पोस्टल बॅलेटची उचल केली नाही. यावरून त्यांची उदासीनता स्पष्ट होते. (प्रतिनिधी)