शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचारी मतदानाबाबत उदासीन

By admin | Updated: May 22, 2014 01:31 IST

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने मतदारांमध्ये जनजागृती करताना त्याची सुरुवात आपल्या शासकीय कर्मचार्‍यांपासून केली.

यवतमाळ : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने मतदारांमध्ये जनजागृती करताना त्याची सुरुवात आपल्या शासकीय कर्मचार्‍यांपासून केली. परंतु लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला त्यात यश येऊ शकले नाही. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात १२ हजार कर्मचार्‍यांपैकी केवळ दोन हजार ६३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आधी आपल्या कर्मचार्‍यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी आयोगाने सोपविली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आणि संधी मिळेल तेव्हा मतदानाच्या हक्काबाबत शासकीय कर्मचार्‍यांचे ‘ब्रेन वॉश’ करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर प्रत्येक विभाग प्रमुखांना आपल्या कर्मचार्‍यांचे मतदान करून घेण्याबाबत जबाबदारी दिली. मात्र त्यानंतरही प्रशासनाला अपेक्षेनुसार त्यात यश आलेले नाही. २00९ च्या तुलनेत पोस्टल बॅलेटची संख्या मात्र दुप्पट झाली आहे. तरुण मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती झाली असली तरी शासकीय कर्मचार्‍यांमध्ये हा हक्क रुजविण्यात प्रशासन कमी पडले, असेच म्हणावे लागेल.

लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय कर्मचार्‍यांना अर्ज देण्यात आले होते. मतदान पोस्टल बॅटेलद्वारे करायचे की ईलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटद्वारे याबाबत विचारणा करण्यात आली होती. मतदानाच्या वेळी यवतमाळ-वाशिममध्ये ११ ते १२ हजार शासकीय कर्मचार्‍यांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यांच्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पोस्टल बॅलेट पाठविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ दोन हजार ६३ कर्मचार्‍यांनीच मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत नवृत्त साखर आयुक्त आणि सेवानवृत्त आयपीएस अधिकारी रिंगणात होते. त्यामुळे शासकीय कर्मचार्‍यांचा कल त्यांच्याकडे राहील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात बसपा व भारिप-बमसंचे उमेदवार असलेल्या या नवृत्त अधिकार्‍यांना अनुक्रमे केवळ ८६ व २८ मते पडली. शासकीय कर्मचार्‍यांचा कलही शिवसेनेकडेच सर्वाधिक राहिला. सेना उमेदवाराच्या अर्धीही मते पोस्टल बॅलेटमधून काँग्रेसला मिळाली नाही. १४ उमेदवारांना तर शासकीय कर्मचार्‍यांनी स्पष्टपणे नाकारले. शासकीय कर्मचार्‍यांनी एक तर अर्ज भरुन परत आणले नाही आणि ज्यांनी अर्ज आणले त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडून पोस्टल बॅलेटची उचल केली नाही. यावरून त्यांची उदासीनता स्पष्ट होते. (प्रतिनिधी)