शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
2
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
3
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
4
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
5
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
6
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
7
New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
8
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
9
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
10
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
11
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
12
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
13
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
14
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
15
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
16
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
17
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने
18
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
19
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
20
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गोरसेनेची दारव्हा येथे आरोग्य चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:54 IST

ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून सर्व लहानथोरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यासाठी तसेच आरोग्याविषयी जनजागृती व्हावी,...

ठळक मुद्देस्तुत्य उपक्रम : औषधोपचार, जनजागृतीत महत्त्वाचे योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून सर्व लहानथोरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यासाठी तसेच आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, याकरिता तालुक्यात गोरसिक वाडी व गोरसेना या सामाजिक संघटनेच्यावतीने आरोग्य चळवळ उभी केली आहे.तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र येथे वेळेत व व्यवस्थित औषधोपचार होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. तसेच लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता जनजागृती होताना दिसत नाही. त्यामुळे केवळ माहिती नाही म्हणूनही अनेकदा नागरिक रोगाला निमंत्रण देतात. दूषित पाणी, वातावरण यामुळे साथीचे आजार पसरतात. प्रकृती बिघडली की मग शासकीय रुग्णालय गाठले जाते. परंतु तिथे व्यवस्थित औषधोपचार होत नाही. त्यामुळे लोकांना महागड्या खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, असे चित्र आज प्रत्येक खेड्यापाड्यात पहायला मिळते.हे चित्र कुठेतरी बदलावे, रुग्णावर गावातच औषधापेचार व्हावा तसेच अनेक आजारांना जागरूकता ठेवून पायबंद घातला जावा यासाठी गोरसिकवाडी व गारसेना या सामाजिक संघटनांनी विडा उचलला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होत नाही, लहान मुलांमध्ये असणारे कुपोषणाचे प्रमाण तसेच अनेक आजाराबद्दल असणारे समज-गैरसमज आदी बाबी या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत तळेगाव, चिखली, साजेगाव, भांडेगाव, डोल्हारी देवी, घाटकिन्ही आदी गावात शिबिर पार पडली आहे.बालरोगतज्ज्ञ डॉ.मनोज राठोड, डॉ.अमर चावके, डॉ.किरण चव्हाण, रितेश गांधी, राजू बांते आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी गोरसिकवाडीचे जिल्हा संयोजक देवानंद चव्हाण, तालुका संयोजक मनोज चव्हाण, तालुका प्रमुख किशोर पालत्या, रवी जाधव आदींचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.आरोग्य विषयात ग्रामीण भागात विदारक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी आमच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर करीत आम्ही खारीचा वाटा उचलत आहो.- डॉ. मनोज राठोड,बालरोगतज्ज्ञ, दारव्हा