शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

गोरसेनेची दारव्हा येथे आरोग्य चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:54 IST

ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून सर्व लहानथोरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यासाठी तसेच आरोग्याविषयी जनजागृती व्हावी,...

ठळक मुद्देस्तुत्य उपक्रम : औषधोपचार, जनजागृतीत महत्त्वाचे योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून सर्व लहानथोरांची आरोग्य तपासणी केल्यानंतर औषधोपचार करण्यासाठी तसेच आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, याकरिता तालुक्यात गोरसिक वाडी व गोरसेना या सामाजिक संघटनेच्यावतीने आरोग्य चळवळ उभी केली आहे.तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र येथे वेळेत व व्यवस्थित औषधोपचार होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. तसेच लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी याकरिता जनजागृती होताना दिसत नाही. त्यामुळे केवळ माहिती नाही म्हणूनही अनेकदा नागरिक रोगाला निमंत्रण देतात. दूषित पाणी, वातावरण यामुळे साथीचे आजार पसरतात. प्रकृती बिघडली की मग शासकीय रुग्णालय गाठले जाते. परंतु तिथे व्यवस्थित औषधोपचार होत नाही. त्यामुळे लोकांना महागड्या खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, असे चित्र आज प्रत्येक खेड्यापाड्यात पहायला मिळते.हे चित्र कुठेतरी बदलावे, रुग्णावर गावातच औषधापेचार व्हावा तसेच अनेक आजारांना जागरूकता ठेवून पायबंद घातला जावा यासाठी गोरसिकवाडी व गारसेना या सामाजिक संघटनांनी विडा उचलला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होत नाही, लहान मुलांमध्ये असणारे कुपोषणाचे प्रमाण तसेच अनेक आजाराबद्दल असणारे समज-गैरसमज आदी बाबी या संघटनेच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनास आल्यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत तळेगाव, चिखली, साजेगाव, भांडेगाव, डोल्हारी देवी, घाटकिन्ही आदी गावात शिबिर पार पडली आहे.बालरोगतज्ज्ञ डॉ.मनोज राठोड, डॉ.अमर चावके, डॉ.किरण चव्हाण, रितेश गांधी, राजू बांते आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी गोरसिकवाडीचे जिल्हा संयोजक देवानंद चव्हाण, तालुका संयोजक मनोज चव्हाण, तालुका प्रमुख किशोर पालत्या, रवी जाधव आदींचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.आरोग्य विषयात ग्रामीण भागात विदारक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी आमच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा वापर करीत आम्ही खारीचा वाटा उचलत आहो.- डॉ. मनोज राठोड,बालरोगतज्ज्ञ, दारव्हा