शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गोरगरिबांचे धान्य बेपत्ता

By admin | Updated: October 11, 2014 02:19 IST

धान्य घोटाळ्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या महागाव तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था अद्यापही सुधरायला तयार नाही.

महागाव : धान्य घोटाळ्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या महागाव तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था अद्यापही सुधरायला तयार नाही. सणासुदीच्या काळात गोरगरिबांचे धान्य बेपत्ता झाले असून उमरखेड आणि पुसद तालुक्यातील दुकानांना जोडलेल्या गावांमध्ये तर कधी धान्य वितरण होते हा संशोधनाचा विषय आहे. सणासुदीच्या काळात तर सोडा नियमितही महागाव तालुक्यातून साखर हद्दपार झाल्याचे दिसून येते. या प्रकारावर कुणाचाही अंकुश नसल्याने गोरगरीब धान्यापासून वंचित राहात आहे. महागाव तालुक्यात २९ हजार राशन कार्डधारक आहे. ११६ दुकानांमधून स्वस्त धान्याचे वितरण केले जायचे. बीपीएल, एपीएल आणि अंत्योदय योजनेंतर्गत गहू, तांदूळ, साखर व इतर साहित्य वितरित होत होते. परंतु महागाव तालुक्यात २०११-१२ मध्ये १ कोटी ५८ लाख रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आला. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तर ९२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यानंतर रद्द झालेली दुकाने उमरखेड आणि पुसद तालुक्यातील दुकानदारांना जोडण्यात आले. या दुकानदारांनी गावात आणून धान्य वितरण करावे, असा दंडक घालून देण्यात आला. परंतु थोडेफार धान्य गावात पाठवायचे आणि इतर धान्य काळ्या बाजारात विकायचे असाच प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. नेमके धान्य वितरणासाठी कधी येते आणि कोण वितरित करतो हेही कळत नाही. विशेष म्हणजे धान्य वितरणासाठी आल्यानंतर ग्रामपंचायतला सूचना देऊन दवंडी देणे गरजेचे आहे. मात्र असा कोणताही प्रकार होत नाही. दुपारच्या वेळी मजूर आणि शेतकरी शेतात गेल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेऊन येतात आणि वितरण केल्याचा देखावा करतात. विशेष म्हणजे उमरखेड आणि पुसद तालुक्यातील काही दुकानदारांनी तर आपले डमी वितरक नेमल्याची माहिती आहे. याबाबत अनेकांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या. परंतु कोणतीही उपाययोजना झाली नाही. याबाबत तहसील प्रशासनाशी संपर्क साधला असता ग्रामपंचायती किंंवा सोसायट्यांनी ठराव दिल्यास त्यांना धान्य वितरणाची परवानगी मिळू शकते. परंतु यासाठी कुणी पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले. तहसील प्रशासनाने नवीन धान्य दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण पुढे करीत परवानगी नाकारली. त्यामुळे बाहेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवरच अवलंबून राहावे लागत आहे आणि ते नियमितपणे धान्याचे वितरण करीत नसल्याचा अनुभव आहे. महागाव तालुक्यातील गोरगरिबांना साखर तर कधी पहायला मिळाली नाही. धान्य येते परंतु साखर हद्दपार झाल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराचा परिणाम मात्र गोरगरिबांवर होत आहे. (तालुका प्रतिनिधी)