शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कशाचे अच्छे दिन? इथे हाताला काम नाही, राशनही भेटत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आमच्याकडे हाताला काम नाही, पोटभर भाकर नाही अशी सगळी परिस्थिती आहे. आम्ही स्वत: काम करतो, घरच्या बायका-पोरं भिक्षा मागतात. काहीजण लोखंड गोळा करतात. यानंतरही पोटभर अन्न मिळत नाही. अशी सगळी अवस्था आहे. कशाचे अच्छे दिन आले, आमचे तर वाईटच दिवस. आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. किमान हाताला काम असले तर माणसाला चिंता राहत नाही. मात्र कामावर गेल्यावर दोन दिवस हाताला काम लागते, इतर दिवस प्रतीक्षाच करावी लागते. यामुळे आमची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. पोरांना शाळेतून मिळणारे तांदूळही बंद झाले. स्काॅलरशिपचे पैसेही येत नाही. लाॅकडाऊनने तर पोरं कोणत्या वर्गात गेले, हेपण कळले नाही. 

आठवड्यात ४०० रुपये हातात  

आमच्या कुटुंबात सात लोक आहे. चार पोरी, एक पोरगा आणि आम्ही दोघं असा सगळा परिवार आहे. दोन दिवस माझ्या मजुरीचे पैसे येतात, इतर दिवस घरची मंडळी भिक्षा मागून पैसे गोळा करतात.         - किरण हातागडे 

मला १२ वर्षं झाले. मी आजही मागूनच खात आहे. माझे पती काम करीत नाही. सगळे काम माझ्याकडेच आहे. कुणी मजुरी देत नाही. यामुळे भिक्षा मागावी लागते. यावरच कुटुंब चालते आहे.     - कविता रवी नाडे 

आम्ही भंगार विकून जे काही पैसे येतील, त्यातच कुटुंब चालविण्याचा प्रयत्न करतो. घरातील सगळे जण भंगार वेचण्यासाठी सकाळपासूनच जातात. हाताला मजुरी भेटत नाही. भंगारातून जी काही रक्कम जमा होईल, त्यातच राशनपाणी विकत आणावे लागते. आम्हाला मोफतचे धान्य आणि रेशन दुकानातील धान्य अजूनपर्यंत मिळालेले नाही. कुठलेही घरदार नाही. खुल्या मैदानात झोपड्या बांधून आम्ही राहतो आहे. नालीच्या बांधकामात आमचे घर तुटले. तेव्हापासून परिवार उघड्यावर आला आहे.     - सुनील गोकुळ हातागडे

मजुरांच्या अडचणी कायकामगार चौकात सकाळी शेकडो मजूर उभे असतात. यातील मोजक्याच मजुरांच्या हाताला काम मिळते. यामुळे कामावर डबे घेऊन पोहोचलेल्या मजुराला काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. अनेकजण याच ठिकाणी बसून काम मिळण्याची प्रतीक्षा करतात.

काम मिळाले तरच किराणाआठवड्यात दोन ते तीन दिवस काम मिळते. इतर दिवस मात्र इतर ठिकाणी फिरून मजुरी कमवावी लागते. मात्र मजुरी नसेल तर किराणा कुठून आणायचा, हाही प्रश्न आहे. शिवाय अनेकांना रेशन दुकानातील धान्यही मिळत नाही. अनेकांचे नवीन रेशनचे पुस्तकही विभागातून गहाळ झाले. 

बायका-पोरं भीक्षा आणि भंगारावर जगतातहाताला दोन दिवसच काम मिळत असल्याने इतर दिवशी काय करायचे, हा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत घरातील लहान, मोठ्यांसह सगळे जण गावभर फिरून भीक्षा गोळा करतात, तर काही जण भंगार जमा करून ते विकतात. यातून हातात पडलेल्या पैशातून आवश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. पैसे नसतील तर कामही बाकी राहते.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड