शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

कशाचे अच्छे दिन? इथे हाताला काम नाही, राशनही भेटत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आमच्याकडे हाताला काम नाही, पोटभर भाकर नाही अशी सगळी परिस्थिती आहे. आम्ही स्वत: काम करतो, घरच्या बायका-पोरं भिक्षा मागतात. काहीजण लोखंड गोळा करतात. यानंतरही पोटभर अन्न मिळत नाही. अशी सगळी अवस्था आहे. कशाचे अच्छे दिन आले, आमचे तर वाईटच दिवस. आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. किमान हाताला काम असले तर माणसाला चिंता राहत नाही. मात्र कामावर गेल्यावर दोन दिवस हाताला काम लागते, इतर दिवस प्रतीक्षाच करावी लागते. यामुळे आमची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. पोरांना शाळेतून मिळणारे तांदूळही बंद झाले. स्काॅलरशिपचे पैसेही येत नाही. लाॅकडाऊनने तर पोरं कोणत्या वर्गात गेले, हेपण कळले नाही. 

आठवड्यात ४०० रुपये हातात  

आमच्या कुटुंबात सात लोक आहे. चार पोरी, एक पोरगा आणि आम्ही दोघं असा सगळा परिवार आहे. दोन दिवस माझ्या मजुरीचे पैसे येतात, इतर दिवस घरची मंडळी भिक्षा मागून पैसे गोळा करतात.         - किरण हातागडे 

मला १२ वर्षं झाले. मी आजही मागूनच खात आहे. माझे पती काम करीत नाही. सगळे काम माझ्याकडेच आहे. कुणी मजुरी देत नाही. यामुळे भिक्षा मागावी लागते. यावरच कुटुंब चालते आहे.     - कविता रवी नाडे 

आम्ही भंगार विकून जे काही पैसे येतील, त्यातच कुटुंब चालविण्याचा प्रयत्न करतो. घरातील सगळे जण भंगार वेचण्यासाठी सकाळपासूनच जातात. हाताला मजुरी भेटत नाही. भंगारातून जी काही रक्कम जमा होईल, त्यातच राशनपाणी विकत आणावे लागते. आम्हाला मोफतचे धान्य आणि रेशन दुकानातील धान्य अजूनपर्यंत मिळालेले नाही. कुठलेही घरदार नाही. खुल्या मैदानात झोपड्या बांधून आम्ही राहतो आहे. नालीच्या बांधकामात आमचे घर तुटले. तेव्हापासून परिवार उघड्यावर आला आहे.     - सुनील गोकुळ हातागडे

मजुरांच्या अडचणी कायकामगार चौकात सकाळी शेकडो मजूर उभे असतात. यातील मोजक्याच मजुरांच्या हाताला काम मिळते. यामुळे कामावर डबे घेऊन पोहोचलेल्या मजुराला काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. अनेकजण याच ठिकाणी बसून काम मिळण्याची प्रतीक्षा करतात.

काम मिळाले तरच किराणाआठवड्यात दोन ते तीन दिवस काम मिळते. इतर दिवस मात्र इतर ठिकाणी फिरून मजुरी कमवावी लागते. मात्र मजुरी नसेल तर किराणा कुठून आणायचा, हाही प्रश्न आहे. शिवाय अनेकांना रेशन दुकानातील धान्यही मिळत नाही. अनेकांचे नवीन रेशनचे पुस्तकही विभागातून गहाळ झाले. 

बायका-पोरं भीक्षा आणि भंगारावर जगतातहाताला दोन दिवसच काम मिळत असल्याने इतर दिवशी काय करायचे, हा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत घरातील लहान, मोठ्यांसह सगळे जण गावभर फिरून भीक्षा गोळा करतात, तर काही जण भंगार जमा करून ते विकतात. यातून हातात पडलेल्या पैशातून आवश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. पैसे नसतील तर कामही बाकी राहते.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड