शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कशाचे अच्छे दिन? इथे हाताला काम नाही, राशनही भेटत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आमच्याकडे हाताला काम नाही, पोटभर भाकर नाही अशी सगळी परिस्थिती आहे. आम्ही स्वत: काम करतो, घरच्या बायका-पोरं भिक्षा मागतात. काहीजण लोखंड गोळा करतात. यानंतरही पोटभर अन्न मिळत नाही. अशी सगळी अवस्था आहे. कशाचे अच्छे दिन आले, आमचे तर वाईटच दिवस. आठवड्यात दोन दिवस हाताला काम मिळते. इतर दिवस मोलमजुरीसाठी फिरूनही कोणी उभे करीत नाही. अशा परिस्थितीत पोट तर भरावेच लागते. घरच्या मंडळींकडून गावभर फिरून दोन पैसे जमा होतात. त्यातच लेकरं आणि आम्ही जगतो आहे. आमच्या झोपडीत अंधार आहे. राशन भेटत नाही. शासनाच्या योजना माहीत नाही. घर देतो म्हणाले, पण आमच्याजवळ जागा नाही. अशा परिस्थितीत घर कुठून बांधू, असा प्रश्न आहे. किमान हाताला काम असले तर माणसाला चिंता राहत नाही. मात्र कामावर गेल्यावर दोन दिवस हाताला काम लागते, इतर दिवस प्रतीक्षाच करावी लागते. यामुळे आमची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. पोरांना शाळेतून मिळणारे तांदूळही बंद झाले. स्काॅलरशिपचे पैसेही येत नाही. लाॅकडाऊनने तर पोरं कोणत्या वर्गात गेले, हेपण कळले नाही. 

आठवड्यात ४०० रुपये हातात  

आमच्या कुटुंबात सात लोक आहे. चार पोरी, एक पोरगा आणि आम्ही दोघं असा सगळा परिवार आहे. दोन दिवस माझ्या मजुरीचे पैसे येतात, इतर दिवस घरची मंडळी भिक्षा मागून पैसे गोळा करतात.         - किरण हातागडे 

मला १२ वर्षं झाले. मी आजही मागूनच खात आहे. माझे पती काम करीत नाही. सगळे काम माझ्याकडेच आहे. कुणी मजुरी देत नाही. यामुळे भिक्षा मागावी लागते. यावरच कुटुंब चालते आहे.     - कविता रवी नाडे 

आम्ही भंगार विकून जे काही पैसे येतील, त्यातच कुटुंब चालविण्याचा प्रयत्न करतो. घरातील सगळे जण भंगार वेचण्यासाठी सकाळपासूनच जातात. हाताला मजुरी भेटत नाही. भंगारातून जी काही रक्कम जमा होईल, त्यातच राशनपाणी विकत आणावे लागते. आम्हाला मोफतचे धान्य आणि रेशन दुकानातील धान्य अजूनपर्यंत मिळालेले नाही. कुठलेही घरदार नाही. खुल्या मैदानात झोपड्या बांधून आम्ही राहतो आहे. नालीच्या बांधकामात आमचे घर तुटले. तेव्हापासून परिवार उघड्यावर आला आहे.     - सुनील गोकुळ हातागडे

मजुरांच्या अडचणी कायकामगार चौकात सकाळी शेकडो मजूर उभे असतात. यातील मोजक्याच मजुरांच्या हाताला काम मिळते. यामुळे कामावर डबे घेऊन पोहोचलेल्या मजुराला काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. अनेकजण याच ठिकाणी बसून काम मिळण्याची प्रतीक्षा करतात.

काम मिळाले तरच किराणाआठवड्यात दोन ते तीन दिवस काम मिळते. इतर दिवस मात्र इतर ठिकाणी फिरून मजुरी कमवावी लागते. मात्र मजुरी नसेल तर किराणा कुठून आणायचा, हाही प्रश्न आहे. शिवाय अनेकांना रेशन दुकानातील धान्यही मिळत नाही. अनेकांचे नवीन रेशनचे पुस्तकही विभागातून गहाळ झाले. 

बायका-पोरं भीक्षा आणि भंगारावर जगतातहाताला दोन दिवसच काम मिळत असल्याने इतर दिवशी काय करायचे, हा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत घरातील लहान, मोठ्यांसह सगळे जण गावभर फिरून भीक्षा गोळा करतात, तर काही जण भंगार जमा करून ते विकतात. यातून हातात पडलेल्या पैशातून आवश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. पैसे नसतील तर कामही बाकी राहते.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड