शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हजार रुपये द्या अन् रेशनकार्ड न्या !

By admin | Updated: October 16, 2015 02:26 IST

गोरगरिबांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशनकार्ड दिले जातात. मात्र यवतमाळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पैसे दिल्याशिवाय राशनकार्ड दिले जात नाही.

नियमांची पायमल्ली : पैसे देऊ न शकणाऱ्या नागरिकांना दोन वर्षे मारावे लागतात हेलपाटेहिवरी : गोरगरिबांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशनकार्ड दिले जातात. मात्र यवतमाळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पैसे दिल्याशिवाय राशनकार्ड दिले जात नाही. हजार रुपये द्या आणि रेशनकार्ड न्या, असा अलिखित नियमच या कार्यालयाने सुरू केला आहे.यवतमाळ तालुक्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांसह अनेकजण या गैरप्रकारात सामील आहेत. राशनकार्ड नसल्यामुळे स्वस्त धान्यापासून अनेकांना वंचित राहावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेला रेशनकार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. परंतु पैसे दिल्याशिवाय सहजासहजी रेशनकार्ड दिले जात नाही, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना हेही त्याचेच एक कारण असल्याचे सांगितले जाते. बहुतांश शेतकऱ्यांकडे आपले रेशनकार्डच नाही. त्यामुळे नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळविला आहे. काहींनी आपल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडेही विचारपूस सुरू केली आहे. परंतु या दोन्ही ठिकाणी गोरगरीब जनतेची फसवणूक केली जात आहे. ७०० रुपये ते एक हजार रुपयांपर्यंत मागणी केली जात आहे. एवढे पैसे मोजल्यास संबंधित व्यक्तीला एक किंवा दोनच दिवसात रेशनकार्ड दिले जाते. परंतु पैसे न देणाऱ्या व्यक्तीला तब्बल दोन वर्षे वाट पाहायला लावली जाते. शासनाचे अधिकारी गोरगरिबांची पिळवणूक करीत असल्याचे यावरून दिसते.(वार्ताहर)