शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

माळपठार शेतीला इसापूर धरणातून पाणी द्या

By admin | Updated: January 31, 2015 23:28 IST

सततची नापिकी व दुष्काळामुळे पुसद तालुका होरपळत आहे. त्यातच तालुक्यातील वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या माळपठारावरील शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून,

पुसद : सततची नापिकी व दुष्काळामुळे पुसद तालुका होरपळत आहे. त्यातच तालुक्यातील वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या माळपठारावरील शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून, येथील शेतीला लगतच्या इसापूर धरणातून पाणी द्यावे व सिंचनाची व्यवस्था करावी, जेणे करून रबी हंगामाचा आधार शेतकऱ्यांना मिळेल यासाठी पुसद तालुक्यातील माळपठारावरील ४३ गावांतील शेतकऱ्यांचा मेळावा खंडाळा येथे पार पडला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.के. आडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून के.जी. चव्हाण होते. मेळाव्याचे आयोजक एम.जी. चव्हाण, हरिभाऊ वाढवे, सदाशिवराव नाईक, परशराम चव्हाण, एम.आर. राठोड, सुरेश राठोड उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी इसापूर धरणातील ‘बॅक वॉटर’ उपसा सिंचन योजनेव्दारे माळपठारावरील शेतीला पाणी देण्यात यावे, असा सूर लावून धरला. या शेतकरी मेळाव्यात खंडाळा, पन्हाळा, म्हैसाळा, माळआसोली, इनापूर आदी गावांसह तब्बल ४३ गावांतील कास्तकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ४३ गावातील नागरिकांची एक केंद्रीय कृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून शासनदरबारी गाऱ्हाणे मांडण्यात येणार असून, शासनाचे लक्ष वेधण्यात येईल व माळपठारावरील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. या मेळाव्यासाठी एम.जी. चव्हाण, संतोष चव्हाण, अंकुश राठोड, जीवनजी आडे, शामराव मारकड, शिवाजी ढोक, चोखला जाधव, उल्हास हाके, धनसिंग राठोड, दत्तराव झिंगराजी, भीमराव नत्थुजी, काशिनाथ जाधव, राहुल इंदोरिया, सखाराम बुरकुले, परशराम भरकाडे आदींनी पुढाकार घेतला. आता काय निर्णय लागतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)